शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांवर येणार प्रशासक राजवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 01:42 IST

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सुमारे १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर २२ एप्रिलनंतर प्रशासकीय राजवट येणार आहे. या संंबंधीचे आदेश राज्याच्या सहकार सचिवांनी काढले असून राज्यभरातील जिल्हा उपनिबंधकांनी संबंधित बाजार समित्यांवर प्रशासकांची नियुक्ती करावी, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सहकार सचिवांनी दिले आदेश

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सुमारे १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर २२ एप्रिलनंतर प्रशासकीय राजवट येणार आहे. या संंबंधीचे आदेश राज्याच्या सहकार सचिवांनी काढले असून राज्यभरातील जिल्हा उपनिबंधकांनी संबंधित बाजार समित्यांवर प्रशासकांची नियुक्ती करावी, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्यात एकूण १७ कृषी उत्पन्न बाजार समित्या असून त्यांच्या संचालक मंडळाची मुदत गतवर्षी संपली आहे. मात्र, मागील वर्षी असलेल्या कोविडच्या संकटामुळे या बाजार समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यासंदर्भात शासनाने वेळोवेळी आदेश पारित केले आहेत. आता बाजार समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग सुकर होत असतानाच ग्रामपंचायती व सोसायट्यांच्या निवडणुका झाल्याशिवाय बाजार समित्यांच्या निवडणुका घेऊ नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. त्यानुसार बाजार समित्यांचे कार्यरत संचालक मंडळ व प्रशासक यांना २१ जानेवारीच्या आदेशान्वये २३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याच आदेशाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर देण्यात आलेल्या आदेशान्वये बाजार समित्यांमध्ये कार्यरत संचालक मंडळाला २२ एप्रिल २०२२ च्या पुढे मुदतवाढ देणे शक्य होणार नाही. अशी शासनाची खात्री झाल्यानंतर पणन अधिनियम १९६३ मधील तरतुदीनुसार जिल्हा उपनिबंधकांनी संचालक मंडळाची निवडणूक होईपर्यंत बाजार समित्यांवर प्रशासकांची नियुक्ती करावी, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या बाजार समित्यांचा मुदतवाढीचा कालावधी पूर्ण झालेला नाही, अशा बाजार समित्यांना त्यातून वगळण्यात यावे, असेही या आदेशात म्हटले आहे. लासलगाव बाजार समितीची मुदत संपण्यास अद्याप एक महिन्याचा कालावधी शिल्लक असल्याने या बाजार समितीबाबत काय निर्णय होतो, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

चौकट-

जिल्ह्यातील सटाणा, नामपूर, उमराणे या तीन बाजार समित्या सोडून सर्व बाजार समित्यांवर प्रशासकांची नियुक्ती होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. नाशिक बाजार समितीचा कारभार यापूर्वीच प्रशासकांच्या हाती गेला आहे. उर्वरित बाजार समित्यांवर कोणाची प्रशासक म्हणून वर्णी लागते, याकडे बाजार समित्यांमधील घटकांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकारAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती