शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

येवल्यात मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 18:12 IST

येवला : तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी, (दि. १८) मतमोजणी होत असून, प्रशासकीय पातळीवर मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान, येवला तालुक्यातील राजकारणात महत्त्वाच्या ठरणार्‍या नगरसूल, मुखेड, पाटोदा, अंदरसूल या प्रमुख ग्रामपंचायतींसह राजापूर, अंगणगाव, बोकटे या चर्चित ग्रामपंचायत निकालांकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.

ठळक मुद्दे१००९ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार; निकालाबाबत उत्सुकता

येवला : तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी, (दि. १८) मतमोजणी होत असून, प्रशासकीय पातळीवर मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान, येवला तालुक्यातील राजकारणात महत्त्वाच्या ठरणार्‍या नगरसूल, मुखेड, पाटोदा, अंदरसूल या प्रमुख ग्रामपंचायतींसह राजापूर, अंगणगाव, बोकटे या चर्चित ग्रामपंचायत निकालांकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.सकाळी १० वाजता तहसील कार्यालयात मतमोजणीस सुरुवात होणार आहे. दहा टेबलवर एकाचवेळी मतमोजणी प्रक्रिया चालणार असून, मतमोजणीसठी ४० निवडणूक निर्णय अधिकारी, १० मतमोजणी पर्यवेक्षक, १० सहायक, २० मदतनीस कर्मचारी असणार आहेत.मतमोजणीच्या सात फेर्‍या होणार आहेत. पहिल्या फेरीत सातारे, मुखेड, सोमठाणदेश, धामणगाव, अंगणगाव, डोंगरगाव, कोटमगाव खुर्द, निमगाव मढ, अंदरसूल, देशमाने, दुसर्‍या फेरीत जळगाव नेऊर, नगरसूल, आंबेगाव, सायगाव, आहेरवाडी (लहित, जायदरे, हडप सावरगाव), खामगाव, नागडे, उंदिरवाडी, अनकुटे (सावखेडे), धामोडे, तिसर्‍या फेरीत मुरमी, खरवंडी, विसापूर, पन्हाळसाठे (पिंपळखुटे ३रे) , अनकाई, ठाणगाव, राजापूर, पिंपळखुटे बुद्रूक, तळवाडे (कौटखेडे), बाभुळगाव खुर्द, चौथ्या फेरीत पाटोदा, देवठाण, नांदुर, खिर्डीसाठे, गुजरखेडे, साताळी, ममदापूर, बोकटे, अंगुलगाव, महालखेडा (पाटोदा), पाचव्या फेरीत भाटगाव, नेऊरगाव, गणेशपुर, रेंडाळे (न्याहारखेडे बुद्रूक, खुर्द), खैरगव्हाण, धुळगाव, भारम, देवळाणे, वाघाळे, वडगाव बल्हे, सहाव्या फेरीत पिंपळगाव लेप, पुरणगाव, आडगाव रेपाळ, कोळगाव (वाईबोथी), विखरणी, एरंडगाव बुद्रूक, रहाडी, भुलेगाव, सत्यगाव, मातुलठाण, तर सातव्या फेरीत कोळम बुद्रूक ग्रामपंचायतीची मतमोजणी होणार आहे.पहिल्या पंधरा मिनिटांत पहिला निकाल हाती येईल, तर दुपारी १ वाजेपर्यंत संपूर्ण मतमोजणी पूर्ण होणार असल्याची माहिती तहसीलदार तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद हिले यांनी दिली. येवला तालुक्यातील ६९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यात ८ ग्रामपंचायतींसह १८९ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींसाठी ८४.३४ टक्के मतदान झाले. ४३ हजार ६३३ महिला व ५० हजार ९९२ पुरुष असे एकूण ९४ हजार ६२५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

६१ ग्रामपंचायतींच्या १८५ प्रभागाच्या ४६४ जागांसाठी १००९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहेत.

टॅग्स :ElectionनिवडणूकPoliticsराजकारण