शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

प्रशासनाकडून भाविकांना त्रास होऊ नये

By admin | Updated: September 12, 2015 23:02 IST

शंकराचार्य नरेंद्रानंद सरस्वतींची मागणी

त्र्यंबकेश्वर : रविवारी होणाऱ्या दुसऱ्या शाहीस्नानाच्या पर्वणीला देशभरातून आस्था, विश्वास आणि श्रद्धा ठेवून येणाऱ्या भाविकांना प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, अशी मागणी सुमेरूपीठाचे शंकराचार्य नरेंद्रानंद सरस्वती यांनी केली आहे.प्रशासनाकडून योग्य मार्गदर्शन व मदत मिळाली तरच भाविकांचा कुंभमेळ्यावरचा विश्वास दृढ होऊ शकेल. भाविकांनीही नियमांचे पालन करून, शिस्त पाळून कुंभनगरीचे पावित्र्य जपावे, असे आवाहन शंकराचार्यांनी केले आहे.पहिल्या शाहीस्नानादरम्यान भाविकांना जसा त्रास झाला, तसा त्रास दुसऱ्या शाहीस्नानादरम्यान होणार नाही याची काळजी पोलीस प्रशासनाने घ्यावी.देशभरातून भाविक कुंभमेळ्यासाठी, स्नान, दर्शन करण्यासाठी, साधुसंतांचे विचार ऐकण्यासाठी येत असतात. असे असताना स्थानिक पोलीस, इतर प्रशासनाकडून त्यांना त्रास झाला तर त्यांच्या मनात शंकेचे गोंधळाचे वातावरण तयार होते. ते होऊ नये यासाठी प्रशासनाने काळजी घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच पर्यावरणासंदर्भात जगभर जी चिंता व्यक्त केली जात आहे तिला ‘खारूताईचा वाटा’ या न्यायाने कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या प्रत्येकाने एक तरी झाड लावावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. (प्रतिनिधी)