शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
4
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
5
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
6
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
7
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
8
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
9
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
10
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
11
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
12
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
13
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
14
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
15
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
16
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
17
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
18
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
19
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
20
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार

उदरनिर्वाहासाठी आदिवासींचे जथ्थे गिरणारे येथे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 11:49 IST

गिरणारे व जवळील क्षेत्र बागायती शेती असल्याने बहुतांश मजुर येथे मजुरी साठी येत आहे. आदिवासीबहूल भागात जगण्याच्या साधनांवरच प्रचंड ताण निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देगिरणारे व जवळील क्षेत्र बागायती शेती असल्याने बहुतांश मजुर येथे मजुरी साठी येत आहे. आदिवासीबहूल भागात जगण्याच्या साधनांवरच प्रचंड ताण निर्माण झाला आहे.
नाशिक : शेतीची कामे संपल्यानंतर पोटा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ञ्यंबक तालुक्यातील विविध गाव, पाड्यांवरील आदिवासींचे जथ्थे गिरणारे येथे दाखल झाले आहेत. तालुक्यात तांदुळ प्रमुख पिक असताना यंदा उत्पादनात वाढ झाली असली तरी शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळत नसल्याने आदिवासींचे मोठयÞा प्रमाणावर रोजगारासाठी स्थलांतर सुरू झाले. शिवाय हे काम केवळ तीनच महिने असल्याने उरलेल्या ९ महिन्यात करायचे काय असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. गिरणारे व जवळील क्षेत्र बागायती शेती असल्याने बहुतांश मजुर येथे मजुरी साठी येत आहे. आदिवासीबहूल भागात जगण्याच्या साधनांवरच प्रचंड ताण निर्माण झाला आहे. उपजिविकेसाठी शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांना आता रोजगारासाठी स्थलांतरित व्हावे लागत आहे. अनेक गावात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) कामे असताना या लोकांना आपला संसाराचा गाडा ओढण्यासाठी खेड्यातुन बाहेर पडावे लागते. या आदिवासी मजुरांना आता शहरी भागात धाव घेण्यावाचून पर्याय उरलेला नाही. गावात कामे उपलब्ध नसणे, वेळेवर मजुरी न मिळणे, मुलभूत सोयीसुविधाही न मिळणे अशा अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागत आहे. त्यातच सरकारी अनास्थेचे दुष्परिणाम देखील आदिवासींना जाणवू लागले आहे. ग्रामीण भागात काम न मिळाल्यास ते नाशिकसारख्या मोठ्या शहरात बांधकाम, कंपन्या, रस्ते अशा मिळेल त्या ठिकाणी काम करत आहेत.
टॅग्स :Nashikनाशिक