शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

उदरनिर्वाहासाठी आदिवासींचे जथ्थे गिरणारे येथे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 11:49 IST

गिरणारे व जवळील क्षेत्र बागायती शेती असल्याने बहुतांश मजुर येथे मजुरी साठी येत आहे. आदिवासीबहूल भागात जगण्याच्या साधनांवरच प्रचंड ताण निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देगिरणारे व जवळील क्षेत्र बागायती शेती असल्याने बहुतांश मजुर येथे मजुरी साठी येत आहे. आदिवासीबहूल भागात जगण्याच्या साधनांवरच प्रचंड ताण निर्माण झाला आहे.
नाशिक : शेतीची कामे संपल्यानंतर पोटा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ञ्यंबक तालुक्यातील विविध गाव, पाड्यांवरील आदिवासींचे जथ्थे गिरणारे येथे दाखल झाले आहेत. तालुक्यात तांदुळ प्रमुख पिक असताना यंदा उत्पादनात वाढ झाली असली तरी शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळत नसल्याने आदिवासींचे मोठयÞा प्रमाणावर रोजगारासाठी स्थलांतर सुरू झाले. शिवाय हे काम केवळ तीनच महिने असल्याने उरलेल्या ९ महिन्यात करायचे काय असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. गिरणारे व जवळील क्षेत्र बागायती शेती असल्याने बहुतांश मजुर येथे मजुरी साठी येत आहे. आदिवासीबहूल भागात जगण्याच्या साधनांवरच प्रचंड ताण निर्माण झाला आहे. उपजिविकेसाठी शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांना आता रोजगारासाठी स्थलांतरित व्हावे लागत आहे. अनेक गावात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) कामे असताना या लोकांना आपला संसाराचा गाडा ओढण्यासाठी खेड्यातुन बाहेर पडावे लागते. या आदिवासी मजुरांना आता शहरी भागात धाव घेण्यावाचून पर्याय उरलेला नाही. गावात कामे उपलब्ध नसणे, वेळेवर मजुरी न मिळणे, मुलभूत सोयीसुविधाही न मिळणे अशा अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागत आहे. त्यातच सरकारी अनास्थेचे दुष्परिणाम देखील आदिवासींना जाणवू लागले आहे. ग्रामीण भागात काम न मिळाल्यास ते नाशिकसारख्या मोठ्या शहरात बांधकाम, कंपन्या, रस्ते अशा मिळेल त्या ठिकाणी काम करत आहेत.
टॅग्स :Nashikनाशिक