शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आदिवासी भागात आदिवासीच कर्मचारी राज्यपालांचा फतवा : यंत्रणेकडून आढावा

By admin | Updated: June 25, 2014 00:12 IST

आदिवासी भागात आदिवासीच कर्मचारी राज्यपालांचा फतवा : यंत्रणेकडून आढावा

नाशिक : आदिवासी भागात मूलभूत सोयी-सुविधा देण्याबरोबरच तेथील जनतेचे जीवनमान उंचाविण्याच्या दृष्टीने यापुढे आदिवासी भागात आवश्यक असलेल्या शासकीय खात्यांमध्ये आदिवासी कर्मचाऱ्यांचीच नियुक्ती करण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला आहे, त्यापार्श्वभूमीवर मंगळवारी राज्यपालांचे उपसचिव परिमलसिंह यांनी संबंधित यंत्रणांची बैठक घेऊन यापुढे या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी, अशा सूचना केल्या आहेत. विशेष करून तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, आरोग्यसेविका, अंगणवाडी सेविका, भूमापक, वन कर्मचारी, शिक्षक, कृषी सहायक अशा आदिवासींच्या जीवनमानाशी संबंधित असलेल्या शासकीय खात्यांचा समावेश आहे. आदिवासी दुर्गम भागात बिगर आदिवासी शासकीय कर्मचारी काम करण्यास धजावत नाहीत, परिणामी तेथील जनतेला योग्य त्या सुविधा व सोयी मिळण्यात अडचणीत निर्माण होतात. त्यामुळे अशा खात्यांमध्ये आदिवासी कर्मचाऱ्यांचीच भरती करून त्यांना तेथेच नेमणुका दिल्या जाव्यात, अशी सूचना राज्यपालांनी केली आहे. त्या अनुषंगाने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात बैठक घेण्यात आली. उपसचिव परिमलसिंह यांनी, सर्वच खात्यांमध्ये आदिवासी विभागात रिक्त असलेल्या पदांचा आढावा घेतला. यापुढे रिक्त पदांची भरती करताना, आदिवासी भागांसाठी आदिवासी कर्मचाऱ्यांनाच प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचना केल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते यांच्यासह संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते.