शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अन्नाची शपथ घेणारे अन् मिठी मारणारेच निघाले गद्दार; मंत्री भुसे यांचे नाव न घेता आदित्य ठाकरेंचा घणाघात 

By suyog.joshi | Updated: August 21, 2022 00:34 IST

मालेगावी संगमेश्वरातील दत्त मंदिर चौकात रात्री 9.30 वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. ठाकरे, म्हणाले, ज्यांच्या  प्रचाराला आलो.

मालेगाव - ज्यांच्यावर प्रेम केलं, ज्यांना मित्र समजलो, ज्यांनी मातोश्रीवर येऊन अन्नाची शपथ  घेतली. त्यांनीच गद्दारी केली, अशी घणाघाती टीका मंत्री दादा भुसे यांचे नाव न घेता युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली. ते शनिवारी शिवसंवाद यात्रेनिमित्त मालेगावी संगमेश्वरातील दत्त मंदिर चौकात आयोजित सभेत बोलत होते.मालेगावी संगमेश्वरातील दत्त मंदिर चौकात रात्री 9.30 वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. ठाकरे, म्हणाले, ज्यांच्या  प्रचाराला आलो. जिंकून आल्यावर मंत्रीपद दिले त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला. आमच्या घरी येऊन अन्नाचीची शपथ घेतली त्यांनीच पाठीत वार केला. आधी कृषी मंत्री पद होते आता कोणते खाते दिले ते मलाही आठवत नसल्याचे ठाकरे यांनी सांगितले. 

राज्यात बेईमानांचे सरकार आले आहे.  तात्पुरते मुख्यमंत्री आहेत. धनुष्यबाण हा शिवसेनेचाच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रेम, मंत्रीपदे दिले तरी त्यांचे पद हिसकाऊन चाळीस गद्दाराना काय मिळाले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ही वृत्ती भयानक आहे. राज्यात घाणेरडे राजकारण सुरु आहे. जिकडे  जायचे तिकडे पण ईडीच्या व  दबावापोटी पक्ष का सोडल्याची टीका ठाकरे यांनी केली. आमदारकीचा राजीनामा द्या. मध्यावधी निवडणुकींना सामोरे जा. 

राज्यात शेतकरी आत्महत्या करताहेत, राज्यात काही भागात  पूरस्थिती आहे. हे निर्लज्ज सरकार काहीच करत नाही. यांचे मंत्री कुठे फिरत नाहीत. महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री हवेत  विमान थांबवतात. मालेगावमध्ये परत येणार असेच प्रेम व आशीर्वाद असू द्या असे आवाहन  ठाकरे यांनी केले. शासन बेकायदेशीर असले तरी आपण शासनाचे नियम पाळू  वेळेवर सभा संपवू. तुमच्या प्रेम व बळावरच पुढे जाणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले  सभेनंतर मॉर्निंग स्टार चौकात  युवा सेना शाखेचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते  करण्यात आले.त्यानंतर त्यांचा ताफा नाशिककडे रवाना झाला. धुळ्याहून मालेगावी येतांना झोडगे, गिरणा पुलावर शिवसैनिक व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांचे स्वागत केले. सभेला आमदार नरेंद्र दराडे, प्रमोद शुक्ला, रामा मिस्तरी , राजाराम जाधव, कैलास तिसगे आदी उपस्थित होते.