शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील असणाऱ्या सरकारला जाब विचारणार: आदित्य ठाकरे

By धनंजय वाखारे | Updated: September 16, 2023 17:32 IST

निफाड तालुक्यातील भेंडाळी येथे दुष्काळी परिस्थितीची पाहणी करताना साधला शेतकऱ्यांची संवाद

एस. बी. कमानकर, सायखेडा ( नाशिक):  दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली असतांना सरकार कोणतेही उपाययोजना करत नाही, पीक विमा कंपनीने पिके वाया जाऊनही अजून शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई देत नाही, सलग एकवीस दिवस पाऊस पडला नाही तर कोणतेही पीक हातात येत नाही हे  प्रशासनाला माहिती आहे. आज अनेक दिवसांपासून पाऊस उघडलेला आहे.पीक पंचनामे  अजूनही सुरु नसल्याने सरकार शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील आहे. या सरकारला शेतकऱ्याबद्दल कोणतीही सकारात्मक भावना नाही शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी  सरकारला आम्ही विरोधी पक्ष म्हणून जाब विचारू आणि शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केले निफाड तालुक्यातील भेंडाळी येथे दुष्काळ परिस्थितीची पहाणी करतांना  व शेतकऱ्यांसोबत संवाद साधतांना दिले.

यावेळी माजी आमदार अनिल कदम, देवळालीचे माजी आमदार योगेश घोलप, जिल्हा अध्यक्ष विक्रम रंधवे, तालुका अध्यक्ष सुधीर कराड, आशिष शिंदे भाऊसाहेब कमानकर,शरद खालकर,  खंडू बोडके, शरद कुटे, अशपाक शेख दिलीप कदम रामदास खालकर, श्याम खालकर यासह  परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

निफाड तालुक्यातील अनेक गावात जून महिन्यानंतर पाऊस पडलेला नाही शेतकऱ्यानी शेतात लागवड केलेले खरीप हंगामातील पिके वाया गेली आहे, विकत पाणी घेऊन पिकवलेली टमाटे भाजीपाला कवडीमोल भावात विकावा लागत आहे खर्च सुद्धा वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे मात्र शासन या संदर्भात कोणतेही पाऊल उचलतांना दिसत नसल्याने युवा नेते आदित्य ठाकरे यांनी दुष्काळी भागाचा पहाणी दौरा केला. निफाड तालुक्यातील दक्षिण भागातील भेंडाळी परिसरात मोठा दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ठाकरे यांनी संवाद साधला. शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या व्यथा मांडल्या. संजय कमानकर यांच्या टमाटे आणि प्रवीण कमानकर यांची सोयाबीन पावसा अभावी पूर्णपणे वाया गेली असल्याची प्रत्यक्ष पहाणी ठाकरे यांनी केली.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरे