शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील असणाऱ्या सरकारला जाब विचारणार: आदित्य ठाकरे

By धनंजय वाखारे | Updated: September 16, 2023 17:32 IST

निफाड तालुक्यातील भेंडाळी येथे दुष्काळी परिस्थितीची पाहणी करताना साधला शेतकऱ्यांची संवाद

एस. बी. कमानकर, सायखेडा ( नाशिक):  दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली असतांना सरकार कोणतेही उपाययोजना करत नाही, पीक विमा कंपनीने पिके वाया जाऊनही अजून शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई देत नाही, सलग एकवीस दिवस पाऊस पडला नाही तर कोणतेही पीक हातात येत नाही हे  प्रशासनाला माहिती आहे. आज अनेक दिवसांपासून पाऊस उघडलेला आहे.पीक पंचनामे  अजूनही सुरु नसल्याने सरकार शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील आहे. या सरकारला शेतकऱ्याबद्दल कोणतीही सकारात्मक भावना नाही शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी  सरकारला आम्ही विरोधी पक्ष म्हणून जाब विचारू आणि शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केले निफाड तालुक्यातील भेंडाळी येथे दुष्काळ परिस्थितीची पहाणी करतांना  व शेतकऱ्यांसोबत संवाद साधतांना दिले.

यावेळी माजी आमदार अनिल कदम, देवळालीचे माजी आमदार योगेश घोलप, जिल्हा अध्यक्ष विक्रम रंधवे, तालुका अध्यक्ष सुधीर कराड, आशिष शिंदे भाऊसाहेब कमानकर,शरद खालकर,  खंडू बोडके, शरद कुटे, अशपाक शेख दिलीप कदम रामदास खालकर, श्याम खालकर यासह  परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

निफाड तालुक्यातील अनेक गावात जून महिन्यानंतर पाऊस पडलेला नाही शेतकऱ्यानी शेतात लागवड केलेले खरीप हंगामातील पिके वाया गेली आहे, विकत पाणी घेऊन पिकवलेली टमाटे भाजीपाला कवडीमोल भावात विकावा लागत आहे खर्च सुद्धा वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे मात्र शासन या संदर्भात कोणतेही पाऊल उचलतांना दिसत नसल्याने युवा नेते आदित्य ठाकरे यांनी दुष्काळी भागाचा पहाणी दौरा केला. निफाड तालुक्यातील दक्षिण भागातील भेंडाळी परिसरात मोठा दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ठाकरे यांनी संवाद साधला. शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या व्यथा मांडल्या. संजय कमानकर यांच्या टमाटे आणि प्रवीण कमानकर यांची सोयाबीन पावसा अभावी पूर्णपणे वाया गेली असल्याची प्रत्यक्ष पहाणी ठाकरे यांनी केली.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरे