शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

जकात बंद झाल्याने आडगाव ट्रक टर्मिनल ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 01:40 IST

काही वर्षांपूर्वी पाय ठेवायलाही जागा नसलेले आडगाव जकात नाका येथील ट्रक टर्मिनल आज ओस पडले आहे. कोट्यवधी रु पये खर्च करून सर्वसुविधांयुक्त वास्तु मोडकळीत निघण्याची भीती निर्माण झाली असून, मद्यपी व जुगाऱ्यांचा अड्डा बनली आहे. पूर्वीच्या काळी व्यवसाय करण्यासाठी येथे स्पर्धा असायची. लाखो रु पयांची उलाढाल होत असे पण जकात बंद झाल्यापासून आज हा परिसर ओकाबोका झालेला पहायला मिळत आहे.

आडगाव : काही वर्षांपूर्वी पाय ठेवायलाही जागा नसलेले आडगाव जकात नाका येथील ट्रक टर्मिनल आज ओस पडले आहे. कोट्यवधी रु पये खर्च करून सर्वसुविधांयुक्त वास्तु मोडकळीत निघण्याची भीती निर्माण झाली असून, मद्यपी व जुगाऱ्यांचा अड्डा बनली आहे. पूर्वीच्या काळी व्यवसाय करण्यासाठी येथे स्पर्धा असायची. लाखो रु पयांची उलाढाल होत असे पण जकात बंद झाल्यापासून आज हा परिसर ओकाबोका झालेला पहायला मिळत आहे. रस्ते, पाणी, बांधकाम क्षेत्र व पार्किंगसाठी प्रशस्त जागा आणि मुंबई-आग्रा महामार्गाला लागून असलेल्या या वास्तुचा पर्यायी वापर करणे गरजेचे असल्याचे मत आता येथील नागरिक व्यक्त करू लागले आहेत. त्यामुळे प्रशासनाने या भव्य वास्तुचा सुयोग्य वापर करावा जेणेकरून येथील विकासाला चालना मिळेल व रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल. आज ट्रक टर्मिनलच्या आजूबाजूच्या परिसरात अनेक ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी बस्तान बसवले असून, ट्रान्सपोर्टनगर म्हणूनच एक वेगळी ओळख तयार झाली आहे. त्यामुळे मालवाहतूक गाड्यांचीदेखील नेहमीच वर्दळ असते. ट्रान्सपोर्ट व्यवसायाला पूरक व्यवसायासाठी या ट्रक टर्मिनलचा वापर होऊ शकतो. याशिवाय शहर परिसरात महामार्गाजवळ असलेले गॅरेज, वर्कशॉप व्यावसायिकांना या ठिकाणी आणण्यासाठी प्रयत्न केल्यास मनपाच्या उत्पन्नात भर पडेल आणि व्यवसायवृद्धीला फायदा होईल. याशिवाय महामार्गावर सर्व्हिस रोडवर अनेक ट्रान्सपोर्ट व गॅरेज व्यावसायिकांमुळे अवजड वाहने रस्त्याच्या कडेला उभी असतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. या व्यासायिकांना त्याठिकाणी सोयीची जागा उपलब्ध झाल्यास वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल. या ठिकाणी कृषी व्यवसायाला पूरक असा उद्योगदेखील सुरू करता येणे शक्य आहे. त्यामुळे प्रशासनाने ओस पडलेल्या ट्रक टर्मिनलच्या वास्तुचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करावे जेणेकरून ही वास्तु वापरात येईल व उत्पन्नात भर पडेल, अशा सूचना नागरिकांनी केल्या आहेत. ट्रक टर्मिनल येथे उपाहारगृह, सुविधा गाळे म्हणजेच दवाखाना, किराणा, व इतर व्यवसायासाठी उभारण्यात आले होते. यातील अनेक गाळे आज रिक्तच आहे.शेजारील जागेवर आरक्षण कायममहानगरपालिकेने १८ ते २२ एकर जागा ट्रक टर्मिनलसाठी विकास आराखड्यात आरक्षित केलेली आहे. त्यापैकी ५ ते ८ एकर जागेवर ट्रक टर्मिनल उभे केले. उर्वरित ठिकाणी ट्रक टर्मिनल उभे केले नसले तरी आरक्षण कायम ठेवले. यावेळी जागा मालकांनी विकास आराखड्याच्या मंजुरीपूर्वी हरकती नोंदविल्या होत्या. शिवाय हरकतींवर झालेल्या सुनावणी दरम्यान कमिटीच्या तज्ज्ञ सदस्यांनी नागपूर महानगरपालिकेत अशी आरक्षणे हटविली असून, जागा विकसित करण्यासाठी परवानगी दिली असल्याचे सांगण्यात आले आहे, असे सांगून २० वर्षांत आरक्षण असूनही जागा ताब्यात घेतल्या नाही शिवाय नवीन विकास आराखड्यातून आरक्षण हटविले नाही. त्यामुळे परिसराच्या विकासाला चालना मिळत नाही, अशी खंत जागा मालकांनी व्यक्त केली आहेजागा मालकांवर अन्यायमहामार्गालगत असलेल्या इतर जागेला सोन्यासारखी किंमत असूनही आरक्षणामुळे येथील जागांची किंमत कवडीमोल ठरली आहे. त्यामुळे ‘आई जेऊ घालत नाही आणि बाप भीक मागू देत नाही’ अशी गत येथील जागा मालकांची झाली आहे. महानगरपालिका पैसे नसल्याचे कारण पुढे करत या जमिनी ताब्यात घेत नाही आणि विकसित करायला परवानगीही देत नाही. त्यामुळे येथील जागामालक कात्रीत सापडले आहे. जागा विकसित होत नसल्याने महानगर पालिकेच्या घरपट्टी व इतर माध्यमातून मिळणाºया उत्पन्नातदेखील घट होत आहे . या परिसराचा विकास त्यामुळे खुंटला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका