शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आधार जोडा, अन्यथा रेशन नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 19:04 IST

पिंपळगाव बसवंत : रेशन दुकानांतील गैरव्यवहार टाळण्यासाठी शिधापत्रिका आणि रास्त भाव दुकाने बायोमेट्रिक प्रणाली तसेच आधार कार्डशी जोडण्याचा निर्णय सरकारकडून तीन वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. या निर्णयाचे कार्ड धारकांकडून स्वागत होत कुटुंब प्रमुखांसह सदस्यांचे देखील आधारकार्डच्या प्रत देण्यात आल्या होत्या. मात्र आता पुन्हा एकदा रेशन कार्डमधील सदस्यांच्या आधार कार्डचे सत्यापन (पडताळणी) करून घेणे सक्तीचे करण्यात आले आहे

ठळक मुद्देपुन्हा पडताळणी : कार्ड जमा करण्यासाठी गर्दी

पिंपळगाव बसवंत : रेशन दुकानांतील गैरव्यवहार टाळण्यासाठी शिधापत्रिका आणि रास्त भाव दुकाने बायोमेट्रिक प्रणाली तसेच आधार कार्डशी जोडण्याचा निर्णय सरकारकडून तीन वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. या निर्णयाचे कार्ड धारकांकडून स्वागत होत कुटुंब प्रमुखांसह सदस्यांचे देखील आधारकार्डच्या प्रत देण्यात आल्या होत्या. मात्र आता पुन्हा एकदा रेशन कार्डमधील सदस्यांच्या आधार कार्डचे सत्यापन (पडताळणी) करून घेणे सक्तीचे करण्यात आले आहेअन्यथा, रेशन मिळणार नसल्याचे रेशन दुकानदारांनी सांगितल्यावर नागरिक धास्तावले आहे. त्यामुळे रेशन धान्य दुकानांत आधार कार्ड जमा करण्यासाठी कार्ड धारकांची तारांबळ उडाली आहे.रेशनिंग व्यवस्थेतील दोष आणि गैरव्यवहारांबाबत सरकारकडे अनेक तक्रारी येत होत्या. त्यासाठी सरकारने रेशनिंग व्यवस्था अधिक पारदर्शक करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले. या माध्यमातून पात्र शिधापत्रिकाधारकांना शिधावस्तूंचे नियमित, विहित वेळेत आणि पारदर्शी पद्धतीने वितरण करण्यासाठी संगणकीय प्रणालीचा आधार घेण्यात आला. त्यानुसार, ई-केवायसी करण्यासह बायोमेट्रिक आणि पोर्टेबिलिटी पद्धतीचा अवलंब सुरू झाला. ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरण होऊ लागले. शिधावाटप अधिकाऱ्यांद्वारे वेळोवेळी करण्यात आलेल्या आवाहनामुळे शिधापत्रिका धारकांनी आपले व कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड, आपली जुनी शिधावाटपपत्रिका, बँकेचे पासबुक तसेच स्वत:चे छायाचित्र घेऊन अर्जदेखील भरून दिले होते. मात्र आता आधार पडताळणीसाठी शिधापत्रिकेवरील सर्वच सदस्यांचे आधार कार्ड रेशन कार्डसोबत पडताळणी केली जात आहेत.

याबाबत वारंवार जनजागृती करूनही सदस्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याने प्रत्येकाने आधार कार्डचे सत्यापन करून घेणे सक्तीचे आहे. अन्यथा रेशन मिळणार नाही व नावे वगळल्यास सर्वस्वी जबाबदारी संबंधित रेशन कार्ड धारकांची असेल, असा इशारा दिल्यावर नागरिकांची दुकानांवर तुडुंब गर्दी झाली आहे.कोटयापूर्वी रेशन कार्डला कुटुंब प्रमुखांचीच आधारची परत जोडण्यात आली होती मात्र यावेळी शासनाच्या निर्यायानुसार कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आधार कार्डची प्रत जोडणे अनिवार्य असल्याने नागरिकांनी लवकरात लवकर आधार कार्डच्या प्रति रेशन धान्य दुकानात जमा करावी.शरद घोरपडे, तहसीलदार, निफाडआम्ही तीन वर्षांपूवी रेशन धान्य दुकानात कुटुंबाप्रमुखासह सर्व सदस्यांची आधार कार्डची प्रत जमा केली होती मात्र यावेळी रेशन धान्य घेण्यासाठी गेलो असता पुन्हा आधारची प्रत मागण्यात आली. त्यामुळे आधारकार्डच्या किती प्रती जमा करायच्या, हेच कळत नाही प्रशासनाने या संदर्भात जनजागृती करणे गरजेचे आहे.- लाभार्थी, पिंपळगाव बसवंत.

टॅग्स :Governmentसरकारnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय