शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार दोन महिन्यांत मुंबई-नागपूर समृद्धीसाठी जागेचे संपादन : मोपलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 01:35 IST

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जागा देण्यास शेतकºयांचा विरोध मावळत चालल्याने दोन महिन्यांत जागेचे संपादन होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसमृद्धी महामार्गाच्या कामाला गती कामाचा अधिकाºयांकडून आढावा जमिनीसाठी शेतकºयांनी संमती

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जागा देण्यास शेतकºयांचा विरोध मावळत चालल्याने येत्या दोन महिन्यांत राज्यातील जागेचे संपादन पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार असून, त्यासाठी रस्ते महामंडळाची सज्जता झाली आहे. आगामी तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण केला जाईल, अशी माहिती महाराष्टÑ रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष राधाकृष्ण मोपलवार यांनी दिली आहे.दोन दिवसांपूर्वी रस्ते विकास महामंडळाचा पदभार पुन्हा स्वीकारल्यानंतर लगेचच मोपलवार यांनी समृद्धी महामार्गाच्या कामाला गती दिली असून, शुक्रवारी त्यांनी नाशिक जिल्ह्णाला भेट देऊन नाशिक व नगर जिल्ह्णातील समृद्धी कामाचा अधिकाºयांकडून आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी उपरोक्त माहिती दिली. ते म्हणाले, राज्यात ३९२ गावांमध्ये ८४३१ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार असून, त्यापैकी ३११३ हेक्टर जमीन म्हणजे ३७ टक्के जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यापोटी २८०० हजार कोटी रुपये मोबदला शेतकºयांना देण्यात आला आहे. आणखी ४७९९ हेक्टर जमिनीसाठी शेतकºयांनी संमती दिली आहे. शेतकºयांमध्ये जमिनीचा मोबदला मिळण्याबाबत असलेला संभ्रम दूर होऊ लागल्याने ते स्वत:हून जमीन देण्याची तयारी दर्शवित असून, काही ठिकाणी किरकोळ विरोध होत असला तरी, त्यांच्याशी संवाद साधून व त्यांचे प्रश्न समजावून घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतकºयाच्या बॅँक खात्यावरच पैसे जमा होत असल्यामुळे त्यांचा विश्वास बसू लागल्याची माहितीही त्यांनी दिली. येत्या दोन महिन्यांत समृद्धीसाठी संपूर्ण जमीन संपादित करण्याच्या सूचना अधिकाºयांना देण्यात आल्या असून, त्यानंतर तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना मोपलवार म्हणाले की, मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे अवघ्या दोन वर्षांत पूर्ण करण्यात आला होता. ते पाहता, रस्ते विकास महामंडळाची सारी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून, मुदतीत प्रकल्प पूर्ण होण्यात कोणतीही अडचण येणार नाही. यावेळी जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन, उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, महेश पाटील, राहुल पाटील यांच्यासह नगर जिल्ह्णाचे अधिकारी उपस्थित होते.नाशिक कनेक्टिंगच्या सूचनामुख्यमंत्री फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाला नाशिक कनेक्ट करण्याचे ठरविले असल्याने नेमक्या कोणत्या ठिकाणी रस्ता कनेक्ट करता येईल याचा आराखडा तयार करण्याचे आदेश मोपलवार यांनी जिल्हाधिकाºयांना दिले आहेत. या आराखड्यानंतर समिती पाहणी करून ते निश्चित करेल.