शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

उपक्रम : शेतकºयांचा माल थेट ग्राहकांपर्यंत; मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन, ग्राहकांचा उत्स्फू र्त प्रतिसाद शेतकºयांचा पहिला आठवडे बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:39 IST

शेताच्या बांधावरून शेतकºयांमार्फत विना मध्यस्थ थेट ग्राहकांच्या पिशवीपर्यंत शेतमाल उपलब्ध झाला आहे.

ठळक मुद्देबाजाराला ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसादसेंद्रिय शेतमाल विक्रीसाठी उपलब्ध शेतमाल विक्र ी करण्यासाठी परवानगी

पंचवटी : शेताच्या बांधावरून शेतकºयांमार्फत विना मध्यस्थ थेट ग्राहकांच्या पिशवीपर्यंत शेतमाल उपलब्ध झाला आहे. राज्य कृषी पणन मंडळ व नाशिक पंचवटी पांजरापोळ यांच्या संयुक्त प्रयत्नाने शासनाच्या संत सावता माळी शेतकरी आठवडे बाजार अभियानांतर्गत शहरातील मखमलाबाद-हनुमानवाडी रस्त्यावरील पांजरापोळच्या जागेत ‘शेतकरी आठवडे बाजार’ भरविण्यात आला. आता हा बाजार दर शुक्रवारी भरणार आहे. या पहिल्याच आठवडे बाजाराला ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.मखमलाबाद रोडवरील पांजरापोळच्या जागेवर संत सावता माळी अभियानाच्या माध्यमातून आठवडे बाजाराचा शुभारंभ झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक दिग्विजय अहेर, आत्मा संस्थेचे कैलास शिरसाठ, कळवणचे उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, राजेश अय्यर, बी. सी. देशपांडे आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी पांजरापोळ संस्थेचे विश्वस्त गोपाल जवेरी म्हणाले की, या उपक्रमामुळे माणुसकीच्या भावनेतून शेतकºयांना मदत मिळणार आहे. शेतकºयांनी सेंद्रिय शेतमाल विक्रीसाठी उपलब्ध करून द्यावा व ग्राहकांनी शेतकºयांकडून शेतमाल खरेदी करून शेतकºयांना पाठबळ द्यावे, असे प्रतिपादन पांजरापोळ संस्थेचे विश्वस्त गोपाल जवेरी यांनी केले आहे. राज्य शासनाने राबविलेल्या योजनेचे चांगले उद्दिष्ट आहे. आज शेतकरी विविध अडचणीतून मार्ग काढून उपजीविका करीत आहे. शेतकरी टिकविणे ही काळाची गरज असल्याने शेतकºयांना पाठबळ दिले पाहिजे, असे ते म्हणाले.या शेतकरी आठवडे बाजारात केवळ शेतकºयांनाच शेतमाल विक्र ी करण्यासाठी परवानगी दिली आहे तसेच ११ ते २० शेतकºयांनी गट तयार करून पणन मंडळाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. याशिवाय पांजरपोळ कोणतेच शुल्क आकारणार नाही. यावेळी पांजरपोळचे व्यवस्थापक सागर आगळे, तुषार पालेजा, हेमराज राजपूत, विठ्ठल आगळे, प्रकाश झांबरे, उदय जोशी आदी उपस्थित होते. दर शुक्रवारी बाजार भरेल; परंतु शुक्र वार पाठोपाठ शनिवार, रविवारच्या दिवशीही बाजार भरविल्यास ग्राहकांना ताजा भाजीपाला मिळेल त्यामुळे संयोजकांनी याचा विचार करावा, अशी मागणी यावेळी उपस्थित नागरिकांनी केली.