शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

उपक्रम : शेतकºयांचा माल थेट ग्राहकांपर्यंत; मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन, ग्राहकांचा उत्स्फू र्त प्रतिसाद शेतकºयांचा पहिला आठवडे बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:39 IST

शेताच्या बांधावरून शेतकºयांमार्फत विना मध्यस्थ थेट ग्राहकांच्या पिशवीपर्यंत शेतमाल उपलब्ध झाला आहे.

ठळक मुद्देबाजाराला ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसादसेंद्रिय शेतमाल विक्रीसाठी उपलब्ध शेतमाल विक्र ी करण्यासाठी परवानगी

पंचवटी : शेताच्या बांधावरून शेतकºयांमार्फत विना मध्यस्थ थेट ग्राहकांच्या पिशवीपर्यंत शेतमाल उपलब्ध झाला आहे. राज्य कृषी पणन मंडळ व नाशिक पंचवटी पांजरापोळ यांच्या संयुक्त प्रयत्नाने शासनाच्या संत सावता माळी शेतकरी आठवडे बाजार अभियानांतर्गत शहरातील मखमलाबाद-हनुमानवाडी रस्त्यावरील पांजरापोळच्या जागेत ‘शेतकरी आठवडे बाजार’ भरविण्यात आला. आता हा बाजार दर शुक्रवारी भरणार आहे. या पहिल्याच आठवडे बाजाराला ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.मखमलाबाद रोडवरील पांजरापोळच्या जागेवर संत सावता माळी अभियानाच्या माध्यमातून आठवडे बाजाराचा शुभारंभ झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक दिग्विजय अहेर, आत्मा संस्थेचे कैलास शिरसाठ, कळवणचे उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, राजेश अय्यर, बी. सी. देशपांडे आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी पांजरापोळ संस्थेचे विश्वस्त गोपाल जवेरी म्हणाले की, या उपक्रमामुळे माणुसकीच्या भावनेतून शेतकºयांना मदत मिळणार आहे. शेतकºयांनी सेंद्रिय शेतमाल विक्रीसाठी उपलब्ध करून द्यावा व ग्राहकांनी शेतकºयांकडून शेतमाल खरेदी करून शेतकºयांना पाठबळ द्यावे, असे प्रतिपादन पांजरापोळ संस्थेचे विश्वस्त गोपाल जवेरी यांनी केले आहे. राज्य शासनाने राबविलेल्या योजनेचे चांगले उद्दिष्ट आहे. आज शेतकरी विविध अडचणीतून मार्ग काढून उपजीविका करीत आहे. शेतकरी टिकविणे ही काळाची गरज असल्याने शेतकºयांना पाठबळ दिले पाहिजे, असे ते म्हणाले.या शेतकरी आठवडे बाजारात केवळ शेतकºयांनाच शेतमाल विक्र ी करण्यासाठी परवानगी दिली आहे तसेच ११ ते २० शेतकºयांनी गट तयार करून पणन मंडळाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. याशिवाय पांजरपोळ कोणतेच शुल्क आकारणार नाही. यावेळी पांजरपोळचे व्यवस्थापक सागर आगळे, तुषार पालेजा, हेमराज राजपूत, विठ्ठल आगळे, प्रकाश झांबरे, उदय जोशी आदी उपस्थित होते. दर शुक्रवारी बाजार भरेल; परंतु शुक्र वार पाठोपाठ शनिवार, रविवारच्या दिवशीही बाजार भरविल्यास ग्राहकांना ताजा भाजीपाला मिळेल त्यामुळे संयोजकांनी याचा विचार करावा, अशी मागणी यावेळी उपस्थित नागरिकांनी केली.