शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

विकासकामांचा दर्जा न राखणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:08 IST

पंचायत समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध योजनांच्या विकासकामांचा दर्जा न राखल्यास संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सभापती प्रवीण गायकवाड यांनी दिला.

ठळक मुद्देप्रवीण गायकवाड : येवला पंचायत समितीत आढावा बैठक

येवला : पंचायत समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध योजनांच्या विकासकामांचा दर्जा न राखल्यास संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सभापती प्रवीण गायकवाड यांनी दिला.पंचायत समितीच्या सभागृहात गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर शिवसेना गटप्रमुख मंगेश भगत, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मोहन शेलार, अनिता काळे, कविता आठसेरे, आशा साळवे, उपसभापती लक्ष्मीबाई गरूड, नम्रता जगताप, गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख, सहायक गटविकास अधिकारी ए. ए. शेख होते.बैठकीत विविध विभागांची माहिती घेण्यात आली. समाज कल्याण विभागाचा आढावा घेत असताना दलितवस्तीच्या कामासंदर्भात आलेल्या तक्र ारींवरून गायकवाड यांनी अधिकारी व बांधकाम ठेकेदारांना धरेवर धरले. प्रस्ताव दाखल करताना ठेकेदार हातोहात प्रस्ताव दाखल करतात. पंचायत समितीमध्ये याची कुठलीही माहिती नसते. त्यामुळे यापुढे येणारे प्रस्ताव पंचायत समितीच्या मासिक सभेत ठेवून पुढे जिल्हा परिषदेला पाठवण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. दलितवस्तीतील विकासकामांचीही चौकशी करण्यात येणार असून, गुणवत्ताशून्य सर्व कामांची चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करण्याचा इशारा गायकवाड यांनी यावेळी दिला. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत येणाºया कृती आराखड्यामध्ये गाळ काढण्याचे काम हाती घेण्यासाठी लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या. शिक्षण विभागाचा आढावा घेताना विद्यार्थ्यांची गुणवत्ता न सुधारल्यास संबंधित शिक्षकावर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले.घरकुल योजनांसाठी प्रस्तावाचे आवाहनसद्य:स्थितीत सुरू असलेली कामे व पूर्ण झालेली कामे यामध्ये दलितवस्तीत भौतिक गोष्टी करण्यासाठी ठरवून दिलेल्या प्राधान्यक्रमाने कामे करण्यात आलेली नसतील तर या सर्व कामांची चौकशी करून कारवाई करणार येईल. ज्या गावांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू होते त्या गावांना पाण्याच्या सोयीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. रमाई योजनेंतर्गत चालू वर्षी ३००, तर शबरी घरकुल योजनेतून २७ घरकुले होणार आहेत. ज्या गावांना लक्ष्य दिले आहे त्याप्रमाणे पंचायत समितीमध्ये प्रस्ताव दाखल करावे, असे आवाहन सभापती गायकवाड यांनी केले.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समिती