शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
2
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
3
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
4
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
5
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
6
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
7
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
8
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
9
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
10
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना
11
Share Market Today: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २७० अंकांनी वधारला; Nifty २४,९४२ च्या पार, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
12
VIDEO: भारताला विजयी केल्यावर जेमिमा रॉड्रिग्जची वडिलांना घट्ट मिठी, बाप-लेकीला भावना अनावर
13
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
14
मंदिरातून झाली 'मदिरा दान'ची घोषणा! आज सकाळपासूनच देशी दारूचा ठेक्यावर उसळली गर्दी, १० ची दिली होती वेळ...
15
₹५ लाखांचं बनतील ₹५० कोटी; ५ स्टेप फॉर्म्युला जो तुम्हाला देईल फायनान्शिअल फ्रीडम आणि अनस्टॉबेल ग्रोथ
16
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
17
Sushant Singh Rajput : सुशांत सिंह राजपूतची हत्या? बहीण श्वेता कीर्तीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, "२ लोकांनी..."
18
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
19
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
20
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड

विकासकामांचा दर्जा न राखणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:08 IST

पंचायत समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध योजनांच्या विकासकामांचा दर्जा न राखल्यास संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सभापती प्रवीण गायकवाड यांनी दिला.

ठळक मुद्देप्रवीण गायकवाड : येवला पंचायत समितीत आढावा बैठक

येवला : पंचायत समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध योजनांच्या विकासकामांचा दर्जा न राखल्यास संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सभापती प्रवीण गायकवाड यांनी दिला.पंचायत समितीच्या सभागृहात गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर शिवसेना गटप्रमुख मंगेश भगत, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मोहन शेलार, अनिता काळे, कविता आठसेरे, आशा साळवे, उपसभापती लक्ष्मीबाई गरूड, नम्रता जगताप, गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख, सहायक गटविकास अधिकारी ए. ए. शेख होते.बैठकीत विविध विभागांची माहिती घेण्यात आली. समाज कल्याण विभागाचा आढावा घेत असताना दलितवस्तीच्या कामासंदर्भात आलेल्या तक्र ारींवरून गायकवाड यांनी अधिकारी व बांधकाम ठेकेदारांना धरेवर धरले. प्रस्ताव दाखल करताना ठेकेदार हातोहात प्रस्ताव दाखल करतात. पंचायत समितीमध्ये याची कुठलीही माहिती नसते. त्यामुळे यापुढे येणारे प्रस्ताव पंचायत समितीच्या मासिक सभेत ठेवून पुढे जिल्हा परिषदेला पाठवण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. दलितवस्तीतील विकासकामांचीही चौकशी करण्यात येणार असून, गुणवत्ताशून्य सर्व कामांची चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करण्याचा इशारा गायकवाड यांनी यावेळी दिला. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत येणाºया कृती आराखड्यामध्ये गाळ काढण्याचे काम हाती घेण्यासाठी लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या. शिक्षण विभागाचा आढावा घेताना विद्यार्थ्यांची गुणवत्ता न सुधारल्यास संबंधित शिक्षकावर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले.घरकुल योजनांसाठी प्रस्तावाचे आवाहनसद्य:स्थितीत सुरू असलेली कामे व पूर्ण झालेली कामे यामध्ये दलितवस्तीत भौतिक गोष्टी करण्यासाठी ठरवून दिलेल्या प्राधान्यक्रमाने कामे करण्यात आलेली नसतील तर या सर्व कामांची चौकशी करून कारवाई करणार येईल. ज्या गावांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू होते त्या गावांना पाण्याच्या सोयीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. रमाई योजनेंतर्गत चालू वर्षी ३००, तर शबरी घरकुल योजनेतून २७ घरकुले होणार आहेत. ज्या गावांना लक्ष्य दिले आहे त्याप्रमाणे पंचायत समितीमध्ये प्रस्ताव दाखल करावे, असे आवाहन सभापती गायकवाड यांनी केले.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समिती