शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेकडून कारवाई : सुमारे ३५० झोपड्या जमीनदोस्त, मोहिमेत अडथळा आणण्याचा प्रयत्न वडाळागावातील झोपडपट्टी हटविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 01:38 IST

न्यायालयाच्या निर्देशानुसार मागील महिन्यात वडाळा गावातील पांढरीआई ते मांगीरबाबा चौक या शंभर फुटी रस्त्यावरील धार्मिक स्थळ हटविण्यात आले,

ठळक मुद्दे३५० अनधिकृत झोपड्या हटविण्याची कारवाई संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान टळलेशंभर फुटी रस्ता बनवण्यात आला

इंदिरानगर : न्यायालयाच्या निर्देशानुसार मागील महिन्यात वडाळा गावातील पांढरीआई ते मांगीरबाबा चौक या शंभर फुटी रस्त्यावरील धार्मिक स्थळ हटविण्यात आले, परंतु रस्त्याच्या मधोमध असलेल्या अनधिकृत झोपड्यांबाबतचा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्याचीच दखल घेत महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने शनिवारी (दि.१६) सावित्रीबाई फुलेनगर लगत वसलेल्या झोपडपट्टीतील सुमारे ३५० अनधिकृत झोपड्या हटविण्याची कारवाई पोलीस बंदोबस्तात पार पाडली. दरम्यान, प्रत्येक झोपडी किंवा पक्क्या घरांवर जेसीबी चालवण्यापूर्वी ‘प्रथम आम्हाला घरकुल योजनेत घरकुल द्या, मगच जेसीबीचा पंजा मारा’ असे सांगत रहिवाशांनी मोहिमेस वारंवार अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर काही झोपडीधारकांनी कारवाईपूर्वीच स्वयंस्फूर्तीने झोपड्या काढून घेतल्याने त्यांचे संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान टळले. दरम्यान, येत्या सोमवारीही उर्वरित अतिक्रमण काढण्याची कारवाई केली जाणार असल्याची माहिती महापालिकेने दिली.दहा वर्षांपूर्वी मुंबई-आग्रा महामार्ग आणि पुणे महामार्ग यांना जोडणारा शंभर फुटी रस्ता बनवण्यात आला. राजीवनगर वसाहत, कलानगर, राजसारथी सोसायटी, वडाळागाव, डीजीपीनगर क्र मांक एक या मार्गे हा शंभर फुटी रस्ता तयार करण्यात आल्याने सदर मार्गावर दिवसभर वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरू असते. मात्र वडाळागावातील पांढरीआई चौक ते मांगीरबाबा चौक या शंभर फुटी रस्त्याच्या मधोमध आणि दुतर्फा अनधिकृत झोपड्या असल्याने वाहतुकीस अडथळा होत असे, तसेच लहान-मोठे अपघात होऊन वादविवादाच्याही घटना घडत होत्या. महापालिकेकडे वारंवार निवेदने देऊनही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना होती. अखेर शनिवारी महापालिकेच्या अतिक्र मण निर्मूलन मोहिमेस सकाळी १०.३० वाजता पांढरीआई चौकातून प्रारंभ झाला. शंभर फुटी रस्ता रुंदीकरणासाठी अडथळा ठरणाºया आणि ज्यांना घरकुल योजनेत घर देऊनसुद्धा झोपड्या खाली न करणाºयांवर कारवाई करण्यास सुरु वात करण्यात आली. प्रत्येक घर आणि झोपडीवर जेसीबीचा पंजा मारण्यापूर्वीच संबंधित घरमालक व काही राजकीय पुढारी हस्तक्षेप करून प्रथम यांना घरकुल योजनेत घर द्या मगच कारवाई करा, असे सांगून वारंवार कारवाईस अडथळा निर्माण करत होते. त्यामुळे कारवाईस विलंब होत असल्याने संथगतीने काम सुरू होते. सुमारे सात तास चाललेल्या या मोहिमेत सुमारे १२० पत्र्याच्या शेडचे आणि पक्की बांधकाम केलेली घरे जमीनदोस्त करण्यात आली. दरम्यान, अर्ध्याच्या वर अनधिकृत झोपडीधारकांनी घरे खाली केली नव्हती मात्र, जेव्हा जेसीबी आला तेव्हा घरातील सामान बाहेर काढण्यासाठी रहिवाशांची धावपळ उडाली होती. सदर मोहिमेत पोलीस उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहायक उपायुक्त सचिन गोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुलदास भोये, पोलीस निरीक्षक कुमार चौधरी, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त रोहिदास बहिरम, विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, सुनीता कुमावत यांसह मनपा अधिकारी, पोलीस असे सुमारे १३० कर्मचारी पाच जेसीबी व पाच ट्रक या ताफ्यासह हजर होते. दरम्यान, येत्या सोमवारीही अतिक्रमण विरोधी मोहीम सुरूच राहणार असून, तोपर्यंत रहिवाशांनी आपले बांधकाम स्वत:हून काढून घ्यावे, असे आवाहन मनपाने केले आहे.