शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

महापालिकेकडून कारवाई : सुमारे ३५० झोपड्या जमीनदोस्त, मोहिमेत अडथळा आणण्याचा प्रयत्न वडाळागावातील झोपडपट्टी हटविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 01:38 IST

न्यायालयाच्या निर्देशानुसार मागील महिन्यात वडाळा गावातील पांढरीआई ते मांगीरबाबा चौक या शंभर फुटी रस्त्यावरील धार्मिक स्थळ हटविण्यात आले,

ठळक मुद्दे३५० अनधिकृत झोपड्या हटविण्याची कारवाई संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान टळलेशंभर फुटी रस्ता बनवण्यात आला

इंदिरानगर : न्यायालयाच्या निर्देशानुसार मागील महिन्यात वडाळा गावातील पांढरीआई ते मांगीरबाबा चौक या शंभर फुटी रस्त्यावरील धार्मिक स्थळ हटविण्यात आले, परंतु रस्त्याच्या मधोमध असलेल्या अनधिकृत झोपड्यांबाबतचा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्याचीच दखल घेत महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने शनिवारी (दि.१६) सावित्रीबाई फुलेनगर लगत वसलेल्या झोपडपट्टीतील सुमारे ३५० अनधिकृत झोपड्या हटविण्याची कारवाई पोलीस बंदोबस्तात पार पाडली. दरम्यान, प्रत्येक झोपडी किंवा पक्क्या घरांवर जेसीबी चालवण्यापूर्वी ‘प्रथम आम्हाला घरकुल योजनेत घरकुल द्या, मगच जेसीबीचा पंजा मारा’ असे सांगत रहिवाशांनी मोहिमेस वारंवार अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर काही झोपडीधारकांनी कारवाईपूर्वीच स्वयंस्फूर्तीने झोपड्या काढून घेतल्याने त्यांचे संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान टळले. दरम्यान, येत्या सोमवारीही उर्वरित अतिक्रमण काढण्याची कारवाई केली जाणार असल्याची माहिती महापालिकेने दिली.दहा वर्षांपूर्वी मुंबई-आग्रा महामार्ग आणि पुणे महामार्ग यांना जोडणारा शंभर फुटी रस्ता बनवण्यात आला. राजीवनगर वसाहत, कलानगर, राजसारथी सोसायटी, वडाळागाव, डीजीपीनगर क्र मांक एक या मार्गे हा शंभर फुटी रस्ता तयार करण्यात आल्याने सदर मार्गावर दिवसभर वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरू असते. मात्र वडाळागावातील पांढरीआई चौक ते मांगीरबाबा चौक या शंभर फुटी रस्त्याच्या मधोमध आणि दुतर्फा अनधिकृत झोपड्या असल्याने वाहतुकीस अडथळा होत असे, तसेच लहान-मोठे अपघात होऊन वादविवादाच्याही घटना घडत होत्या. महापालिकेकडे वारंवार निवेदने देऊनही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना होती. अखेर शनिवारी महापालिकेच्या अतिक्र मण निर्मूलन मोहिमेस सकाळी १०.३० वाजता पांढरीआई चौकातून प्रारंभ झाला. शंभर फुटी रस्ता रुंदीकरणासाठी अडथळा ठरणाºया आणि ज्यांना घरकुल योजनेत घर देऊनसुद्धा झोपड्या खाली न करणाºयांवर कारवाई करण्यास सुरु वात करण्यात आली. प्रत्येक घर आणि झोपडीवर जेसीबीचा पंजा मारण्यापूर्वीच संबंधित घरमालक व काही राजकीय पुढारी हस्तक्षेप करून प्रथम यांना घरकुल योजनेत घर द्या मगच कारवाई करा, असे सांगून वारंवार कारवाईस अडथळा निर्माण करत होते. त्यामुळे कारवाईस विलंब होत असल्याने संथगतीने काम सुरू होते. सुमारे सात तास चाललेल्या या मोहिमेत सुमारे १२० पत्र्याच्या शेडचे आणि पक्की बांधकाम केलेली घरे जमीनदोस्त करण्यात आली. दरम्यान, अर्ध्याच्या वर अनधिकृत झोपडीधारकांनी घरे खाली केली नव्हती मात्र, जेव्हा जेसीबी आला तेव्हा घरातील सामान बाहेर काढण्यासाठी रहिवाशांची धावपळ उडाली होती. सदर मोहिमेत पोलीस उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहायक उपायुक्त सचिन गोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुलदास भोये, पोलीस निरीक्षक कुमार चौधरी, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त रोहिदास बहिरम, विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, सुनीता कुमावत यांसह मनपा अधिकारी, पोलीस असे सुमारे १३० कर्मचारी पाच जेसीबी व पाच ट्रक या ताफ्यासह हजर होते. दरम्यान, येत्या सोमवारीही अतिक्रमण विरोधी मोहीम सुरूच राहणार असून, तोपर्यंत रहिवाशांनी आपले बांधकाम स्वत:हून काढून घ्यावे, असे आवाहन मनपाने केले आहे.