शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

लग्न समारंभात गर्दी जमविली तर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:20 IST

नाशिक: राज्यातील पंधरा जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने राज्य शाससाने सुरक्षितता नियमावलींची कठोर अंमलजबावणी करण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांना ...

नाशिक: राज्यातील पंधरा जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने राज्य शाससाने सुरक्षितता नियमावलींची कठोर अंमलजबावणी करण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याने लग्न समारंभात होणाऱ्या गर्दीवर आता लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. मिशन बिगेन अंतर्गत सभा, समारंभांना शिथिलता देण्यात आली असली तरी गर्दीच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याने यापुढे कारवाई केली जाणाार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रूग्ण पुन्हा आढळून आल्याने मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यांचा आढावा घेतला. याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी सांिगतले की, इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिक जिल्ह्याची परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. कोरोना नियंत्रणातासाठी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून लग्न समारंभांना परवानगी देण्यात आलेली आहे. सोहळ्याला शंभर पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, मास्क वापरण्यात यावा, शारीरीक अंतर राखले जावे, सॅनिटायझरचा वापर करण्यात यावा असे नियम घालून देण्यात आलेेले आहे. मात्र त्याचे पालन होत नसल्याने आता यासाठी कठोर कारवाईची भुमिका घेण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याने जिल्ह्यात काटेकरोर अंमलबाजवणीसाठी कारवाई केली जाणार असल्याचे मांढरे यांनी सांगितले.

स्थानिक प्रशासन, पोलीस आयुक्त, पोलीस अधिक्षक यांना देखील याबाबतच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. गर्दी मुळे कोरोना पसरणार नाही याची खबरदारी घेतली जाणार असून नियमांचे पालन न करणाऱ्ंयांवर कारवाई केली जाणार आहे. सध्या लग्ससराई असल्याने अनेक ठिकाणी मोठी गर्दी केली जाते. त्यामुळे लॉन्स, हॉल्स येथे आता नजर ठेवली जाणार आहे. क्षमतेपेक्षा जास्त वऱ्हाडी असल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

नियमांचे पालन न करणारी मंगलकार्यालयेन, लॉन्स, बन्क्वेंट हॉल यांच्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. ज्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन केले जाईल त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. अनलॉकच्या प्रक्रीेयेनंतर सर्वकाही सुरळीत झाल्याच्या अर्विभावात लोक वावरत आहेत.वास्तविक प्रत्येकाला मार्गदर्शक नियमावलींचे पालन करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. मात्र नियमांचे पालन कुणीही करतांना दिसत नाही. मास्क वापराकडे देखील दुर्लक्ष झाल्याची गंभीर बाब शासनाच्या निदर्शनास आल्याने शासनाने विनाकास्क फिरणाऱ्यांवर देखील कारवाईच्या सुचना दिलेल्या आहेत.त्यामुळे आता विनामास्क, सुरक्षिततेचे अंतर या नियमांचा भंग करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.