शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

लग्न समारंभात गर्दी जमविली तर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:20 IST

नाशिक: राज्यातील पंधरा जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने राज्य शाससाने सुरक्षितता नियमावलींची कठोर अंमलजबावणी करण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांना ...

नाशिक: राज्यातील पंधरा जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने राज्य शाससाने सुरक्षितता नियमावलींची कठोर अंमलजबावणी करण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याने लग्न समारंभात होणाऱ्या गर्दीवर आता लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. मिशन बिगेन अंतर्गत सभा, समारंभांना शिथिलता देण्यात आली असली तरी गर्दीच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याने यापुढे कारवाई केली जाणाार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रूग्ण पुन्हा आढळून आल्याने मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यांचा आढावा घेतला. याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी सांिगतले की, इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिक जिल्ह्याची परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. कोरोना नियंत्रणातासाठी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून लग्न समारंभांना परवानगी देण्यात आलेली आहे. सोहळ्याला शंभर पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, मास्क वापरण्यात यावा, शारीरीक अंतर राखले जावे, सॅनिटायझरचा वापर करण्यात यावा असे नियम घालून देण्यात आलेेले आहे. मात्र त्याचे पालन होत नसल्याने आता यासाठी कठोर कारवाईची भुमिका घेण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याने जिल्ह्यात काटेकरोर अंमलबाजवणीसाठी कारवाई केली जाणार असल्याचे मांढरे यांनी सांगितले.

स्थानिक प्रशासन, पोलीस आयुक्त, पोलीस अधिक्षक यांना देखील याबाबतच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. गर्दी मुळे कोरोना पसरणार नाही याची खबरदारी घेतली जाणार असून नियमांचे पालन न करणाऱ्ंयांवर कारवाई केली जाणार आहे. सध्या लग्ससराई असल्याने अनेक ठिकाणी मोठी गर्दी केली जाते. त्यामुळे लॉन्स, हॉल्स येथे आता नजर ठेवली जाणार आहे. क्षमतेपेक्षा जास्त वऱ्हाडी असल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

नियमांचे पालन न करणारी मंगलकार्यालयेन, लॉन्स, बन्क्वेंट हॉल यांच्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. ज्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन केले जाईल त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. अनलॉकच्या प्रक्रीेयेनंतर सर्वकाही सुरळीत झाल्याच्या अर्विभावात लोक वावरत आहेत.वास्तविक प्रत्येकाला मार्गदर्शक नियमावलींचे पालन करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. मात्र नियमांचे पालन कुणीही करतांना दिसत नाही. मास्क वापराकडे देखील दुर्लक्ष झाल्याची गंभीर बाब शासनाच्या निदर्शनास आल्याने शासनाने विनाकास्क फिरणाऱ्यांवर देखील कारवाईच्या सुचना दिलेल्या आहेत.त्यामुळे आता विनामास्क, सुरक्षिततेचे अंतर या नियमांचा भंग करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.