शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

गणेश मंडळांवरील कारवाई बासनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:21 IST

सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सवासाठी उभारलेल्या मंडपावर कारवाईचा बडगा उगारण्यासाठी चार दिवसांपूर्वी सरसावलेल्या अधिकाºयांच्या पथकांनी केलेल्या पाहणीचा अहवाल सादर करण्यात आलेला असला तरी, रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारे मंडप न काढणाºया मंडळांवर गुन्हे दाखल कोण करणार? असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे सार्वजनिक मंडळांना अभय मिळाले आहे.

नाशिक : सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सवासाठी उभारलेल्या मंडपावर कारवाईचा बडगा उगारण्यासाठी चार दिवसांपूर्वी सरसावलेल्या अधिकाºयांच्या पथकांनी केलेल्या पाहणीचा अहवाल सादर करण्यात आलेला असला तरी, रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारे मंडप न काढणाºया मंडळांवर गुन्हे दाखल कोण करणार? असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे सार्वजनिक मंडळांना अभय मिळाले आहे. उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेच्या सुनावणीत सार्वजनिक मित्रमंडळांकडून सण, उत्सव साजरे करताना रहदारीला अडथळा निर्माण करणारे मंडपांची उभारणी केली जात असल्याने ते टाळण्यासाठी राज्य सरकारला मार्गदर्शक तत्त्वे तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत, त्या अनुषंगाने जिल्हाधिकाºयांनी तीन तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका, पोलीस अधिकाºयांचे पथके कार्यान्वित करून सार्वजनिक मंडळांनी अनुमती घेतल्याप्रमाणे मंडपांची उभारणी केली काय, याची पाहणी केली. या पथकांनी केलेल्या पाहणीत अनेक मंडळांनी रस्त्यावरच अनुमतीपेक्षा मोठ्या आकाराच्या मंडपांची उभारणी केल्याचे आढळून आले. काही मंडळांनी अधिकाºयांच्या सांगण्यावरून मंडप काढून टाकले, परंतु काहींनी त्यास नकार दिला. तसा अहवाल तहसीलदारांनी तयार करून तो महापालिकेकडे सुपूर्द केला. मंडळांना मंडप उभारण्यास महापालिकेने अनुमती दिली असल्याने व शहरातील रस्ते महापालिकेच्या मालकीची असल्याने उल्लंघन करणाºया मंडळांवर कारवाई महापालिकेने करावी, अशी शिफारस केली. परंतु महापालिकेने कारवाई करण्यास नकार देत, महसूल विभागानेच पोलिसांत तक्रार द्यावी असा पवित्रा घेतला. या पथकामध्ये पोलिसांचाही समावेश असला तरी, त्यांनी कोणी तक्रार दिली तरच गुन्हे दाखल केली जातील अशी भूमिका घेतली. त्यामुळे गणेश मंडळांवर कारवाई कोणी करावी? असा प्रश्न निर्माण झाल्याने या मंडळांना अभय मिळाल्याचा अर्थ काढला जात आहे.