शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना नाडणा-या बॅँका, विक्रेत्यांवर प्रसंगी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 18:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : शेतक-यांचे उत्पन्न वाढवून त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यासाठी सर्वांनी शेतक-यांनी सहकार्य करणे अपेक्षित असले ...

ठळक मुद्देअनिल बोंडे : कृषी दिनानिमित्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतक-यांचे उत्पन्न वाढवून त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यासाठी सर्वांनी शेतक-यांनी सहकार्य करणे अपेक्षित असले तरी, काही बॅँकांकडून शेतक-यांना पीककर्ज देण्यासाठी अडवणूक केली जात असल्याच्या तक्रारी आहेत, तसेच बि-बियाण्यांमधून शेतक-यांची फसवणूक केली जात असल्याने शेतक-यांना नाडणा-यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिला आहे.माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंती तथा कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेतील रावसाहेब सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. बोंडे पुढे म्हणाले, शेतक-यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतक-यांनी गट शेती करण्यावर भर द्यावा. ज्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन शेतक-यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे शेती उत्पादनाला योग्य बाजारपेठ मिळण्यासाठी गटशेतीच्या माध्यमातून अधिक चांगल्या पद्धतीने प्रयत्न करता येतील. शेतक-यांसाठी असलेल्या योजनांची अंमलबजावणी करताना त्यातील नियमामध्ये लवचिकता आणून शेतक-यांना काही प्रमाणात स्वातंत्र्य देणे आवश्यक आहे. गावपातळीवर काम करणा-या कृषी सहायकाला ग्रामपंचायत कार्यालयात कामासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल, तसेच जिल्हा कृषी अधीक्षक व तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये विमा एजंट यांची सेवा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली.यावेळी बोलताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे, उपाध्यक्ष नयना गावित, कृषी आयुक्त शिवाजी धिवसे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रारंभी माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच कृषी विभागामार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या कृषी योजनांच्या पुस्तकाचे व घडीपत्रकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत श्रीमती सुमन माधव कु-हाडे यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.चौकट====शेतकºयांचा सत्कारयावेळी जिल्ह्यातील शेतकºयांचा विविध पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्यात मोतीराम लक्ष्मण गावित (सुरगाणा) सुरेश एकनाथ कळमकर, हेमंत पंडलिक पिंगळे, सागर सुरेश डोखळे (दिंडोरी), रवींद्र धनसिंग पवार, मनोहर प्रकाश खैरनार (मालेगाव), सुरेश नामदेव भोये, रामनाथ गोविंद वाघेरे (पेठ), विमल जगन आचारी, सुंदराबाई दामोधर वाघेरे (त्र्यंबकेश्वर), भाऊसाहेब गोविंद जाधव, कैलास बाबूराव बेंडकोळी, रामचंद्र पाहुजी गांगुर्डे (नाशिक), शिवनाथ भिकाजी बोरसे (चांदवड), वामन किसन भोये (त्र्यंबकेश्वर), अरुण बबनराव पवार (मालेगाव), उत्तमराव भागूजी ठोंबरे, शिवाजी पंडितराव बस्ते (चांदवड) व गणेश दामू मिसाळ (नाशिक), अरुण सखाराम दळवी (बागलाण), संदीप कारभारी आहेर (कळवण), रमेश शिवराम सरोदे (नांदगाव), प्रताप शिवाजी दाभाडे (येवला), हेमंत वसंत आहेर (देवळा), सोपान प्रतापराव वाघ (निफाड), कुणाल बाशोक घुमरे (सिन्नर), एकनाथ कचरू महाले (इगतपुरी) आदींना आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासोबतच विविध पीकस्पर्धेत अंतर्गत साधारण ६९ शेतक-यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्तराजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, अर्थ व बांधकाम समिती सभापती मनीषा पवार, कृषी सहसंचालक रमेश भताने, जिल्हा कृषी अधीक्षक संजीव पडवळ आदी उपस्थित होते. 

टॅग्स :agricultureशेतीnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद