शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

संशयास्पद प्रमाणपत्र प्रकरणी कारवाई शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 00:16 IST

नाशिक : आदिवासी जमातीचे पडताळणी प्रमाणपत्र मिळावे म्हणून सादर करण्यात आलेल्या अर्जासोबत कुटुंबातील अन्य कुणाचे पडताळणी प्रमाणपत्र जोडले असेल तर ते संशयास्पद म्हणजेच चुकीचे असल्याचे गृहित धरूनच प्रकरणे चौकशीच्या फेऱ्यात अडकवली जातात. मात्र ज्या कालावधीत प्रमाणपत्रे वितरित झाली त्या संबंधित अधिकाऱ्यांवर एकदाही कारवाई का होऊ शकली नाही? हा प्रश्न अनुत्तरित आहे.

ठळक मुद्देदोष कुणाचा : विस्कळीत कामगिरीला पडताळणी विभागच जबाबदार

नाशिक : आदिवासी जमातीचे पडताळणी प्रमाणपत्र मिळावे म्हणून सादर करण्यात आलेल्या अर्जासोबत कुटुंबातील अन्य कुणाचे पडताळणी प्रमाणपत्र जोडले असेल तर ते संशयास्पद म्हणजेच चुकीचे असल्याचे गृहित धरूनच प्रकरणे चौकशीच्या फेऱ्यात अडकवली जातात. मात्र ज्या कालावधीत प्रमाणपत्रे वितरित झाली त्या संबंधित अधिकाऱ्यांवर एकदाही कारवाई का होऊ शकली नाही? हा प्रश्न अनुत्तरित आहे.आदिवासी विभागातील जात पडताळणी समितीसमोर आलेले विशिष्ट जाती समूहाचे प्रकरण खरे आणि खोट्या कागदपत्रांच्या चौकशीच्या फेºयात रखडले जात असताना दुसरीकडे मात्र अशा संवर्गातील पडताळणी प्रमाणपत्रे निमुटपणे दिली गेल्याची उदाहरणेदेखील आहेत. केवळ यापूर्वीच म्हणजे सन ९०-९५ मध्येच अशा प्रकारचे प्रमाणपत्र दिली गेली आहेत असे नाही तर सन २०१२ मध्येदेखील नियमांचे उल्लंघन करून काही तासांत पडताळणी प्रमाणपत्र दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. परंतु ज्यांनी संशयास्पद दाखले दिले त्यांच्यावर अधिनियम पोटकल १० व १२ नुसार गुन्हा दाखल होणे अपेक्षित आहे. या कलामान्वये शिक्षेचीदेखील तरतूद आहे. मात्र चुकीचे दाखले दिल्याचे मान्य करूनही दाखले देणाऱ्यांचा मात्र शोध घेण्याबाबत आदिवासी जात पडताळणी समितीने कधीही भूमिका घेतली नसल्याचे दिसून आले आहे. चुकीच्या प्रमाणपत्रांमुळे पडताळणी समिती बदनाम होणार असेल तर मग यातून दोषी यंत्रणा उघडकीस कधी येणार हाही मुद्दा अद्याप स्पष्ट झालेले नाही.गेल्या २५ ते ३० वर्षांत वितरित झालेल्या हजारो दाखले अवैध मानले जात असेल तर मग आदिवासी विभागाच्याच ‘स्पेशल लीगल सेल’कडून संबंधित अधिकाºयांवर कारवाईचा बडगा का उगारण्यात आलेला नाही? असा प्रश्न आजही विचारला जात आहे. पडताळणीसाठी दाखल करण्यात आलेले प्रकरण अवैध ठरविण्यासाठी या विभागाकडे अनेक कारणे आहेत. काही चालीरिती, बोलीभाषा, रुढी-परंपरा आणि आप्तभाव जुळून येत नसल्याचे कारण हमखास दिले जाते. मात्र आपल्याच खात्याने दिलेले प्रमाणपत्रही जर नाकारले जाणार असेल तर येथील कारभाराची किती बोजवारा उडाला आहे हेही दिसून येते.(समाप्त)शिस्तभंग आणि कबुलीनामाअनुसूचित जमाती जात पडताळणी समितीची कारभार हा मनमानी आणि बेकायदा असल्याचा ठपका न्यायालयाने गेल्यावर्षी आॅगस्टमध्ये ठेवला होता. तत्कालीन समिती उपाध्यक्ष, सदस्य सचिव यांचा कारभार हा राज्य शासनाच्या प्रतिमेला काळे फासणारा असल्याचे सांगून न्यायालयाने तत्कालीन समितीच बरखास्त करण्याचे आदेश दिले होते. विशेष म्हणजे संबंधिताना एक लाखांचा दंडही ठोठावण्यात आलेला होता. यावरून समितीच्या चुका, दिरंगाई आणि मनमानी समोर आलेली आहे.