शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

संशयास्पद प्रमाणपत्र प्रकरणी कारवाई शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 00:16 IST

नाशिक : आदिवासी जमातीचे पडताळणी प्रमाणपत्र मिळावे म्हणून सादर करण्यात आलेल्या अर्जासोबत कुटुंबातील अन्य कुणाचे पडताळणी प्रमाणपत्र जोडले असेल तर ते संशयास्पद म्हणजेच चुकीचे असल्याचे गृहित धरूनच प्रकरणे चौकशीच्या फेऱ्यात अडकवली जातात. मात्र ज्या कालावधीत प्रमाणपत्रे वितरित झाली त्या संबंधित अधिकाऱ्यांवर एकदाही कारवाई का होऊ शकली नाही? हा प्रश्न अनुत्तरित आहे.

ठळक मुद्देदोष कुणाचा : विस्कळीत कामगिरीला पडताळणी विभागच जबाबदार

नाशिक : आदिवासी जमातीचे पडताळणी प्रमाणपत्र मिळावे म्हणून सादर करण्यात आलेल्या अर्जासोबत कुटुंबातील अन्य कुणाचे पडताळणी प्रमाणपत्र जोडले असेल तर ते संशयास्पद म्हणजेच चुकीचे असल्याचे गृहित धरूनच प्रकरणे चौकशीच्या फेऱ्यात अडकवली जातात. मात्र ज्या कालावधीत प्रमाणपत्रे वितरित झाली त्या संबंधित अधिकाऱ्यांवर एकदाही कारवाई का होऊ शकली नाही? हा प्रश्न अनुत्तरित आहे.आदिवासी विभागातील जात पडताळणी समितीसमोर आलेले विशिष्ट जाती समूहाचे प्रकरण खरे आणि खोट्या कागदपत्रांच्या चौकशीच्या फेºयात रखडले जात असताना दुसरीकडे मात्र अशा संवर्गातील पडताळणी प्रमाणपत्रे निमुटपणे दिली गेल्याची उदाहरणेदेखील आहेत. केवळ यापूर्वीच म्हणजे सन ९०-९५ मध्येच अशा प्रकारचे प्रमाणपत्र दिली गेली आहेत असे नाही तर सन २०१२ मध्येदेखील नियमांचे उल्लंघन करून काही तासांत पडताळणी प्रमाणपत्र दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. परंतु ज्यांनी संशयास्पद दाखले दिले त्यांच्यावर अधिनियम पोटकल १० व १२ नुसार गुन्हा दाखल होणे अपेक्षित आहे. या कलामान्वये शिक्षेचीदेखील तरतूद आहे. मात्र चुकीचे दाखले दिल्याचे मान्य करूनही दाखले देणाऱ्यांचा मात्र शोध घेण्याबाबत आदिवासी जात पडताळणी समितीने कधीही भूमिका घेतली नसल्याचे दिसून आले आहे. चुकीच्या प्रमाणपत्रांमुळे पडताळणी समिती बदनाम होणार असेल तर मग यातून दोषी यंत्रणा उघडकीस कधी येणार हाही मुद्दा अद्याप स्पष्ट झालेले नाही.गेल्या २५ ते ३० वर्षांत वितरित झालेल्या हजारो दाखले अवैध मानले जात असेल तर मग आदिवासी विभागाच्याच ‘स्पेशल लीगल सेल’कडून संबंधित अधिकाºयांवर कारवाईचा बडगा का उगारण्यात आलेला नाही? असा प्रश्न आजही विचारला जात आहे. पडताळणीसाठी दाखल करण्यात आलेले प्रकरण अवैध ठरविण्यासाठी या विभागाकडे अनेक कारणे आहेत. काही चालीरिती, बोलीभाषा, रुढी-परंपरा आणि आप्तभाव जुळून येत नसल्याचे कारण हमखास दिले जाते. मात्र आपल्याच खात्याने दिलेले प्रमाणपत्रही जर नाकारले जाणार असेल तर येथील कारभाराची किती बोजवारा उडाला आहे हेही दिसून येते.(समाप्त)शिस्तभंग आणि कबुलीनामाअनुसूचित जमाती जात पडताळणी समितीची कारभार हा मनमानी आणि बेकायदा असल्याचा ठपका न्यायालयाने गेल्यावर्षी आॅगस्टमध्ये ठेवला होता. तत्कालीन समिती उपाध्यक्ष, सदस्य सचिव यांचा कारभार हा राज्य शासनाच्या प्रतिमेला काळे फासणारा असल्याचे सांगून न्यायालयाने तत्कालीन समितीच बरखास्त करण्याचे आदेश दिले होते. विशेष म्हणजे संबंधिताना एक लाखांचा दंडही ठोठावण्यात आलेला होता. यावरून समितीच्या चुका, दिरंगाई आणि मनमानी समोर आलेली आहे.