शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

नांदगावी अनधिकृत पाणीउपसा करणाऱ्या २५० वीज पंपांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 12:30 IST

नांदगाव : पाऊस पडत नसल्याने नांदगाव तालुक्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची लक्षणे दिसू लागली असली तरी ठिकठिकाणी पाणीसाठ्यातून शेतीसाठी बेकायदेशीर पाणी उपसा सुरु आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष आमदार पंकज भुजबळ यांनी टंचाई बैठकीत वेधल्यानंतर तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी अखेर नाग्यासाक्या धरणातील अनधिकृतरित्या पाणी उपसणाºया सुमारे २५० वीज पंपांवर कारवाई केली आहे.

नांदगाव : पाऊस पडत नसल्याने नांदगाव तालुक्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची लक्षणे दिसू लागली असली तरी ठिकठिकाणी पाणीसाठ्यातून शेतीसाठी बेकायदेशीर पाणी उपसा सुरु आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष आमदार पंकज भुजबळ यांनी टंचाई बैठकीत वेधल्यानंतर तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी अखेर नाग्यासाक्या धरणातील अनधिकृतरित्या पाणी उपसणाºया सुमारे २५० वीज पंपांवर कारवाई केली आहे. दरम्यान दरवर्षी जुलै अखेर भरून वाहण्याचा इतिहास असलेल्या माणिकपुंज धरणात केवळ मृत जलसाठा शिल्लक असून या धरणातून नांदगावला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असतो. बेकायदा पाणी उपश्यामुळे तळ गाठत असलेल्या, पाण्याचा उपसा करतांना नांदगाव शहर पाणी पुरवठा योजनेत अडथळे निर्माण झाले असून. आठ दिवसांनी होणारा पाणी पुरवठा १८ ते २० दिवसांवर येऊन ठेपला आहे. मार्च अखेर पर्यंत पाणी उचलण्याची परवानगी असतांना नियम धाब्यावर ठेवून संबंधित विभागाशी असलेले साटेलोटे यामुळे धरणातले पाणी उपसले गेले आहे. नाग्या साक्या धरणातील वीज पंपांवर कारवाई केल्यानंतर माणिकपुंज धरणाच्या क्षेत्रातील पंप काढून घेण्याच्या सुचना तहसीलदारांनी दिल्या आहेत. मात्र त्यांच्या सूचनेची काटेकोर अंमलबजावणी महत्वाची आहे. पूर्वानुभवावरून अशा सूचना व आदेशांचे पालन होत नसल्याचा इतिहास आहे. प्रत्येक आवर्तन लेट होउ लागल्याने नांदगावकरांनी रस्ता रोको, मोर्चाचे हत्यार उपसले आहे. धरणातून पाणी उपसण्याची अधिकृत मुदत फेब्रुवारीतच संपते. मात्र गेले तीन महिने प्रशासनाने काहीच केले नव्हते. अखेर पंकज भुजबळ यांच्या बैठकीत सदर निर्णय झाला. दरम्यान पाणी टंचाई संदर्भात जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी नांदगांवला काल दुपारी १ वा भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला व पाणी टंचाईच्या अडचणी समजुन घेतल्या. नांदगांव येथील भेटीत त्यांच्या समवेत तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, गटविकास अधिकारी जे टी सुर्यवंशी व टंचाई विभागाचे कर्मचारी होते. मात्र राज्य कर्मचाºयांचा संप सुरु असल्याने नांदगांव पंचायत समीती व तहसिल विभागात शुक शुकाट होता तसेच नांदगांव पालिकेच्या कर्मचाºयांनी काळ्याफिती लावून कामकाजात भाग घेतला. नरेश गिते यांनी बैठकीत पाणी प्रश्नावर धरणातील पाणी उपसा प्रकणावर कडक कारवाईच्या सुचना स्थानिक प्रशासनाला दिल्या.

टॅग्स :Nashikनाशिक