शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

पाणी टंचाईमुळे खाजगी विहीरीकेल्या अधिग्रहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 18:49 IST

नांदगाव : तालुक्यातील जातेगाव येथे मागील वर्षी पुर्ण पावसाळ्यात एकच पाऊस झाल्याने डिसेंबर महिन्यात तलावातील पाणी आटल्याने जानेवारी महिन्यात या परिसरात असलेल्या दोन्ही विहिरींने तळ गाठल्याने ग्रामपालीकेने गावातील काहिंच्या विहीरी अधिग्रहित केल्या.

नांदगाव : तालुक्यातील जातेगाव येथे मागील वर्षी पुर्ण पावसाळ्यात एकच पाऊस झाल्याने डिसेंबर महिन्यात तलावातील पाणी आटल्याने जानेवारी महिन्यात या परिसरात असलेल्या दोन्ही विहिरींने तळ गाठल्याने ग्रामपालीकेने गावातील काहिंच्या विहीरी अधिग्रहित केल्या.पाणी टंचाईवर उपाय म्हणून कारभारी महादु पवार, भाटु छोटु चव्हाण (गट नंबर २१) आणि बद्री महादु चव्हाण यांच्या (गट नंबर २३) विहीरी दि.९ जानेवारी ते ३० जुन २०१९ या कालावधीसाठी अधिग्रहित केल्या आहे. सध्या या तीनही विहिरींचे पाणी एकत्र करून नंतर पाणी पुरवठा योजनेद्वारे (रोटेशन) चक्र पध्दतीने आठ दिवसातुन एकदा नळपाणी पुरवठा योजनेअंतर्गत सोडण्यात येत आहे.अधिग्रहित केलेल्या विहिरीच्या मालकांना शासननिर्णयानुसार त्यांच्या परिवारातील सदस्यांना आणि पाळीव प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी ३० टक्के पाणी आणि उर्वरित सर्व ७० टक्के पाणी हे ग्रामपंचायतीने नागरिकांना विहिरीतून काढून सार्वजनिक पाणी पुरवठा करणे असे परिपत्रक असते. परंतु येथील शेतकरी कारभारी महादु पवार आणि त्यांचा मुलगा किशोर हे यांच्या गट नंबर २१ मधील विहिरीतून आठवड्यातून गुरु वार आणि रविवार या दोन दिवसांव्यतिरिक्त इतर दिवशी रात्री अपरात्री जाऊन तसेच दिवसाही मनमानी करु न पाणी पुरवठा कर्मचारी रज्जाक भेनुभाई शेख, सोपान विश्वनाथ खिरडकर आणि लाला रज्जाक शेख दमदाटी करून शासन निर्णयाची पायमल्ली करु न त्यांच्या गरजे व्यतीरीक्त पाणी उपसा करु न शासनाचे विहीर अधिग्रहित भाडे सहाशे रु पये घेऊन या कडाक्याच्या उन्हाळ्यात सगळीकडे दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असतांना सुमारे तीन एकर कांदे आणि डोंगळे भाजीपाल्यासाठी व इतर पिकांसाठी पाणी उपसा करत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणी प्रश्न भेडसावत आहे.गावातील सार्वजनिक पाणी पुरवठा करणे आवश्यक असून त्यास अडथळा करु नका, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे. यापूर्वी तीन वेळा तोंडी समाज देण्यात आली आहे. तरीसुद्धा सदर विहीर मालक अडथळा आणत असतील तर तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि नांदगाव पोलीसांकडे पत्र देऊन कारवाई करावी लागेल.- जयश्री लाठेसरपंच, जातेगाव.