शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मका खरेदीला बारदानाचे ग्रहण !

By श्याम बागुल | Updated: December 1, 2018 18:19 IST

गेल्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे बंपर उत्पादन देणा-या मक्याच्या उत्पादनात यंदा निम्म्याने घट झाली आहे. गेल्या वर्षी सुमारे दीड लाख क्विंटल मक्याची खरेदी करण्यात येऊनही शेवटच्या टप्प्यात काही शेतक-यांना खरेदीपासून वंचित राहावे लागले होते. ते टाळण्यासाठी यंदा १ नोव्हेंबरपासून शेतक-यांना आॅनलाइन

ठळक मुद्देपाच हजार शेतकऱ्यांची नोंदणी : चार केंद्रे सुरू

नाशिक : जिल्ह्यात हमीभावात मका खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली असून, यंदाही शेतकºयांना आॅनलाइन नोंदणी करण्याची सक्ती केल्याने जिल्ह्यातील ४९८३ शेतक-यांनी आपल्याकडील सुमारे एक लाख क्विंटल मक्याची नोंदणी केली आहे. परंतु खरेदी केलेला मका साठवणुकीसाठी खरेदी-विक्री संघांकडे बारदानाची कमतरता भासू लागल्याने आजवर फक्त ३७ शेतक-यांचा मका खरेदी करावा लागला आहे.गेल्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे बंपर उत्पादन देणा-या मक्याच्या उत्पादनात यंदा निम्म्याने घट झाली आहे. गेल्या वर्षी सुमारे दीड लाख क्विंटल मक्याची खरेदी करण्यात येऊनही शेवटच्या टप्प्यात काही शेतक-यांना खरेदीपासून वंचित राहावे लागले होते. ते टाळण्यासाठी यंदा १ नोव्हेंबरपासून शेतक-यांना आॅनलाइन नोंदणीची सुविधा व दुसºया आठवड्यापासूनच मका खरेदी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय पणन महामंडळाने घेतला. त्यानुसार जिल्ह्यात ३० नोव्हेंबरअखेर ४,९८३ शेतक-यांनी नोंदणी केली असून, ३१ डिसेंबरपर्यंत नोंदणीची मुदत देण्यात आली आहे. दिवाळीनंतर शेतकºयांनी मका काढणीला घेतल्यामुळे खुल्या बाजारातही व्यापाºयांनी मका खरेदीला सुरुवात केली असून, त्यासाठी १५०० ते १६०० रुपये क्विंटलमागे दर देण्यात आला आहे, तर केंद्र सरकारने हमीभावाने १७०० रुपये दर निश्चित केला आहे.जिल्ह्यात मका खरेदीसाठी सिन्नर, येवला, मालेगाव व चांदवड या चार खरेदी-विक्री केंद्रांवर खरेदी सुरू केली असून, आजवर ३७ शेतकºयांचा ९३० क्विंटल मका खरेदी करण्यात आला आहे. पुढच्या आठवड्यात सटाणा, देवळा, लासलगाव आदी ठिकाणी केंद्रे सुरू करण्याची तयारी जिल्हा मार्केट फेडरेशनने केली आहे. तथापि, खरेदी केलेला मका साठवणुकीसाठी यंदा शासकीय गुदामे उपलब्ध असली तरी, मका भरण्यासाठी बारदानाची कमतरता भासू लागली आहे. खरेदी केंद्रांकडे पडून असलेल्या बारदानामध्ये तूर्त उपलब्ध मका साठवणूक करून वेळ मारून नेली जात असताना खरेदी केंद्रावर आलेल्या शेतकºयांना बारदानाअभावी परत पाठविणे योग्य नसल्यामुळे काहीशा मंदगतीने खरेदी केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार पणन महामंडळाकडून संपूर्ण राज्यासाठी बारदानाची खरेदी केली जाते, परंतु अजुनही खरेदीची प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्यामुळे बारदानाचा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्हा मार्केट फेडरेशनने या संदर्भात बारदानाची मागणी केली असून, येत्या दोन दिवसांत २० हजार बारदान उपलब्ध होतील, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी इंगळे यांनी दिली.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक