शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

आदिवासी विकासच्या संचालकांचे उपोषण निष्क्रियतेचा आरोप : मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 01:31 IST

नाशिक : आदिवासी विकास महामंडळाचे अध्यक्ष, आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा तसेच महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि महाव्यवस्थापक यांनीच आदिवासी समाजासाठी असलेल्या सर्व योजना बंद केल्या.

ठळक मुद्दे महामंडळ निष्क्रिय झाल्याचा आरोप संचालक मंडळाने केलासंचालक आणि महाव्यवस्थापकच या व्यवस्थेला जबाबदार असल्याचा आरोप

नाशिक : आदिवासी विकास महामंडळाचे अध्यक्ष, आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा तसेच महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि महाव्यवस्थापक यांनीच आदिवासी समाजासाठी असलेल्या सर्व योजना बंद केल्या असून, महामंडळ निष्क्रिय झाल्याचा आरोप संचालक मंडळाने केला आहे. महाराष्टÑ राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या संचालकांनी आदिवासी महामंडळाच्या कारभारावर टीका करीत उपोेषणाला प्रारंभ केला आहे. आदिवासी महामंडळाच्या अनेक योजना बंद करून महामंडळ गुंडाळण्याचा डाव असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. एकाधिकार योजनेत खरेदी झालेला कोट्यवधी रकमेचा कृषिउपज माल मागील तीन वर्षांपासून विक्री झालेला नाही. महामंडळाचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि महाव्यवस्थापकच या व्यवस्थेला जबाबदार असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. द्वार वितरण योजना फायद्यात राबविली जात असतानाही ही योजनादेखील महामंडळाकडून काढून खासगी संस्थेला दिली गेली आहे. संचालक मंडळाचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगून संचालक मंडळाने ठराव करूनही निलंबित कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेतले जात नाही. मर्जीतील अधिकाºयांना मात्र विनाचौकशी क्लीन चिट दिली जात असून, सर्व अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. २०१४ मधील कर्मचारी भरती प्रकरणी गैरप्रकार झाल्याचे सिद्ध होऊनही संबंधितांवर कारवाई करण्यात आलेली नाही असे अनेक आरोप करीत संचालकांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. निवेदनावर भारतसिंग दुशनाग, देवीदास पाटील, मीनाक्षी वट्टी, धनराज महाले, विकास वळवी, मधुकर काठे, विठ्ठल देशमुख, सुनील भुसारा, अशोक मंगाम, मगनदास वळवी, प्रकाश दडमल, जयश्री तळपे, ताराबाई माळेकर आदी उपस्थित होते. महामंडळाच्या निष्क्रिय कारभारामुळे खावटी योजनेचे शंभर कोटी शासनाला परत करावे लागले आहेत. आदिवासी मंत्री तथा अध्यक्ष सावरा यांनी दर तीन महिन्यांनी संचालक मंडळाची बैठक घेणे अपेक्षित असताना अशी बैठकच घेण्यात आलेली नाही. संचालक मंडळाची मान्यता नसतानाही बारदान खरेदी करणे, बिले अदा करणे असे गैरप्रकार झाल्याचा आरोप संचालकांनी केला आहे.