शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

आघाडी सरकारमुळेच जायकवाडीची जबाबदारी नाशिकवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 15:51 IST

२००५ मध्ये तत्कालीन आघाडी सरकारने गोदावरी पाटबंधारे महामंडळाची स्थापना करून समन्यायी पाणी वाटपाचा कायदा संमत केल्यामुळे ४० टी.एम.सी. पाण्याची तूट भरून काढण्याची जबाबदारी नाशिकवर आली

ठळक मुद्देदेवयानी फरांदे : आडगाव ग्रामस्थांतर्फे जाहीर सत्कार समारंभ

नाशिक : जायकवाडी धरण बांधले गेले तेव्हापासून आजपर्यंत फक्त पाच वेळा हे धरण भरले आहे. या धरणाची क्षमता ८१ टी.एम.सी. असली तरी धरणाची वार्षिक सरासरी ४१ टी.एम.सी. इतकी आहे. २००५ मध्ये तत्कालीन आघाडी सरकारने गोदावरी पाटबंधारे महामंडळाची स्थापना करून समन्यायी पाणी वाटपाचा कायदा संमत केल्यामुळे ४० टी.एम.सी. पाण्याची तूट भरून काढण्याची जबाबदारी नाशिकवर आली असल्याचा आरोप आमदार देवयानी फरांदे यांनी केला आहे.गंगापूर व पालखेड धरणांतील पाणी जायकवाडीला जाण्यापासून वाचविल्याबद्दल आडगाव ग्रामस्थांच्या वतीने आमदार देवयानी फरांदे यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. व्यासपीठावर नगरसेवक उद्धव निमसे, नगरसेवक सुरेश खेताडे, नगरसेविका शीतल माळोदे, माजी नगरसेवक मधुकर मते, पोलीस पाटील एकनाथ मते, संजय तुंगार उपस्थित होते. त्यापुढे म्हणाल्या, फक्त पिण्याच्या पाण्याची तरतूद असती तर यदा कदाचित आपल्याला मोठा तोटा झाला नसता पण समन्यायी पाणी वाटपामुळे आपल्याकडील १० तालुके दुष्काळी असूनदेखील आपल्या हक्काचे पाणी सोडावे लागत आहे. सुप्रीम कोर्टाचा आदेश असल्यामुळे सरकारचे हात बांधलेले पण त्यावर मार्ग म्हणून मी गोदावरी पाटबंधारे महामंडळाला मुकणे धरणातून पाणी सोडण्याचे सांगितले तरीही त्यांनी काहीही म्हणणे ऐकून न घेता, धरणातून काही पाणी सोडले पण कोर्टाच्या निकालातील तरतुदीचा आधार घेत आपली बाजू ऐकायला भाग पाडून त्यांना मुकणे धरणात पिण्याचे आरक्षित असलेले पाणी सोडण्याची विनंती केल्यामुळे गंगापूर धरणाचे दरवाजे बंद झाले आणि शेतीसाठी पाणी वाचवू शकले. असे असले तरी ही लढाई एवढ्यात संपणार नसल्याचे सांगत सर्वांनी पाण्यासाठी राजकीय भेद विसरून एक होण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी नगरसेवक उद्धव निमसे, माजी नगरसेवक मधुकर मते, पोलीस पाटील एकनाथ मते यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक