शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

हजारे यांच्या आकलनानुसार  प्रश्न सुटणे अशक्य : देसरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 01:07 IST

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल मंजुरीसाठी पुन्हा केलेले आंदोलन यशस्वी झाले नाही. त्याचे कारण लोकपाल हा व्यवस्थेला सर्वोच्च ठरू शकत नाहीत. त्यातच विसाव्या शतकातील आडाख्यानुसार एकविसाव्या शतकात प्रश्न कसे सुटणार, असा थेट प्रश्न अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी उपस्थित केला आहे.

नाशिक : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल मंजुरीसाठी पुन्हा केलेले आंदोलन यशस्वी झाले नाही. त्याचे कारण लोकपाल हा व्यवस्थेला सर्वोच्च ठरू शकत नाहीत. त्यातच विसाव्या शतकातील आडाख्यानुसार एकविसाव्या शतकात प्रश्न कसे सुटणार, असा थेट प्रश्न अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी उपस्थित केला आहे.  वसुंधरा बचाव, मानव बचाव व किसान बचावसाठी आयोजित संवाद यात्रेंतर्गत देसरडा नाशिक दौऱ्यावर आले असून, त्यांनी दुपारी पत्रकार परिषदेत सदरचे मत व्यक्त गेले. अण्णा हजारे यांनी दिल्लीत केलेले आंदोलन संपल्यानंतर त्यावर टीका होत असून, त्यासंदर्भात  प्रश्नांना उत्तर देताना काळानुसार प्रश्नांची समस्यांकडे बघणे  आणि त्या सोडविण्यासाठी उपाय शोधण्यात हजारे यांचे आकलन  कमी पडत असल्याचेही देसरडा म्हणाले.  महाराष्ट दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळाचे कार्याध्यक्ष असलेल्या देसरडा यांनी २०१४ साली केंद्रात आणि त्यापाठोपाठ राज्यात सत्तापालट झाल्यानंतर शेतकरी, आदिवासी आणि असंघटित क्षेत्रातील समस्या सुटण्याची मोठी अपेक्षा होती. परंतु मोदी आणि फडणवीस यांनी दिलेली आश्वासनांची पूर्ती न केल्याने गत चार वर्षांत चार हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत या सरकारने शेतकरी, आदिवासी आणि अन्य कष्टकºयांची आंदोलने केवळ आश्वासने देऊन गारद करण्यात आली आहेत, असे सांगून देसरडा यांनी देशातील विकासाची संकल्पना बदलायला हवी, विशेषत: लोकसहभाग असलेली पर्यावरण-पूरक विकासाची संकल्पना राबविली तरच सर्व घटकांचा विकास शक्य आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारे