शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

‘आनंददायी जीवनशैली’ स्वीकारावी

By admin | Updated: October 12, 2016 23:23 IST

जागतिक हृदय दिन : मान्यवरांनी साधला चर्चासत्रात संवाद

नाशिक : ताणतणाव, चुकीचा आहार, व्यायामाकडे होणारे दुर्लक्ष, धावपळीच्या युगात शरीरात घडून येणाऱ्या रासायनिक बदलांमुळे प्रकृतीवर विपरीत परिणाम होत असून, सगळ्यांनी आनंददायी जीवनशैलीचा अंगीकार करायला हवा, असा सूर दादासाहेब गायकवाड सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात उमटला.जागतिक हृदय दिनानिमित्त दादासाहेब गायकवाड सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या या चर्चासत्रात डॉ. राजीव शारंगपाणी (पुणे), मानसरोगोपचारतज्ज्ञ डॉ. नंदू मुलमुले (नांदेड) आणि हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मनोज चोपडा यांनी सहभाग घेतला होता. यावेळी डॉ. मनोज चोपडा यांनी आरोग्यासाठी शिक्षण आणि रोगप्रतिबंधक उपाययोजना याची समाजाला असलेली गरज, तणावरहित कसे जगावे, बिघडलेले जीवनचक्र, नात्यांमध्ये निर्माण होणार दुरावा, शरीरातील बदलांकडे केले जाणारे दुर्लक्ष तसेच मधुमेह, हृदयरोग, उच्चरक्तदाब आदि विकार कसे जडतात, याबाबत मार्गदर्शन केले.डॉ. राजीव शारंगपाणी यांनी आनंददायी जीवनासाठी शरीर निरोगी असायला हवे, असे आवाहन केले. आनंद शोधण्यासाठीदेखील अलीकडे ताण घेतला जातो असे सांगताना व्यायाम न करणे, उशिरा उठणे, अवेळी जेवण यामुळे शरीरावर कसा परिणाम घडतो आणि आपली जीवनशैली बदलते हे सोदाहरण स्पष्ट केले. व्यायाम करताना वजन उचलणे, सायकल चालवणे, पोहणे, गिर्यारोहण करणे, योगासने आदिंचे सातत्य असायला हवे, असेही डॉ. शारंगपाणी यांनी अधोरेखित केले.डॉ. नंदू मुलमुले यांनी मानवी शरीरावर अंतर्गत आणि वाह्य बाबींवर होणारे परिणाम, निरोगी असतानाही वैद्यांकडे जाऊन आपल्या तब्येतीबाबत तणाव प्रकट क रणे चुकीचे असल्याचे सांगितले. जीवनात खरा आनंद निसर्गापासून मिळत असल्याने आपण अधिकाधिक निसर्गाच्या सान्निध्यात जायला हवे, असे आवाहन मुलमुले यांनी केले. ताणतणावामुळे हृदयविकार आणि मधुमेहाला निमंत्रण मिळत असल्याने तणावविरहित जीवन जगायला हवे, असे आवाहन डॉ. मुलमुले यांनी यावेळी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनील संकलेचा यांनी तर स्वागत डॉ. रश्मी चोपडा यांनी केले. दादासाहेब गायकवाड सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमास मान्यवरांसह रुग्ण तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)