शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

नाशिकचा स्मार्ट सिटीअंतर्गत सुमारे २३० कोटीचा ‘गोदा प्रकल्प’ फसवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 19:16 IST

शाहू खैरे : विकासाचे चित्र आभासी असल्याचा दावा

ठळक मुद्दे ‘गोदा प्रकल्प’च्या भवितव्याबाबत खैरे यांनी व्यक्त केली चिंताआयुक्तांसह अधिकाºयांची मानसिकताच दिसत नसल्याचा आरोप

नाशिक : नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत सुमारे २३० कोटी रुपये खर्चून साकारण्यात येणारा ‘गोदा प्रकल्प’ फसवा आणि आभासी असल्याचा दावा कॉँग्रेसचे गटनेता शाहू खैरे यांनी केला आहे. गोदापार्कची एकूणच लागलेली वाट पाहता ‘गोदा प्रकल्प’च्या भवितव्याबाबतही खैरे यांनी चिंता व्यक्त केली आहे.गुरुवारी स्मार्ट सिटी कंपनीच्या बैठकीत २३० कोटी रुपयांच्या ‘गोदा प्रकल्प’ला मान्यता देण्यात आली. रेट्रोफिटिंग आणि ग्रीनफिल्ड या दोन प्रकारांत दोन टप्प्यात होणाऱ्या  या प्रकल्पात १८ कामे केली जाणार आहेत. या प्रकल्पाबाबत पत्रकारांशी बोलताना शाहू खैरे यांनी सांगितले, वास्तविक स्मार्ट सिटी अंतर्गत नेमकी कोणती कामे केली पाहिजे, याची समजच संबंधित अधिकाऱ्याना नाही. ‘गोदा प्रकल्प’ हा असाच आभासी आणि स्वप्नवत असा प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत काही चांगली कामे होतील. परंतु, बरीचशी कामे ही फसवी आहेत. जलवाहतुकीचा प्रस्ताव तर हास्यास्पद आहे. मुळात होळकर पूल ते टाळकुटेश्वर पुलापर्यंतच्या गोदाघाट परिसराच्या विकासाकडे अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. रामसेतू आणि गाडगे महाराज पूल या दोन्ही पुलांची मुदत संपलेली आहे. या पुलांच्या पुनर्विकासाकडे लक्ष देण्याची गरज आहे. गोदाघाटावर व्यवसाय करणाऱ्या  व्यावसायिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देऊन घाट मोकळा केला पाहिजे. दशक्रियाविधीकरिता पिंडदानासाठी सुविधा उपलब्ध झाली पाहिजे. मूलभूत गोष्टींकडे लक्षच दिलेले नाही. वास्तविक स्मार्ट सिटी अंतर्गत गोदावरी परिसराचा विकास करताना परिसरातील लोकप्रतिनिधी, नागरिकांना विश्वासात घेतले पाहिजे. परंतु, कोणीही त्याबाबत विचारणा केलेली नाही. कालिदास कलामंदिरसह महात्मा फुले कलादालनाच्या कामांबाबत सूचना करूनही त्याबाबत कार्यवाही सुरू केलेली दिसत नाही. आयुक्तांसह अधिकाऱ्याची मानसिकताच दिसत नसल्याचा आरोपही खैरे यांनी केला आहे.नियमबाह्य कामकाजएसपीव्हीवर संचालकपदी कॉँग्रेसपक्षाकडून माझी निवड झालेली आहे. परंतु, महासभेने विसंगत ठराव मंजूर केलेला आहे. एसपीव्ही स्थापन होऊन १३ महिन्यांचा कालावधी लोटला तरी संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली नाही. सत्ताधारी पक्षाकडून मनमानी कारभार सुरू असून, उर्वरित पक्षांच्या संचालकांची नेमणूक करण्यास टाळाटाळ केली जात आहे. जोपर्यंत इतर पक्षांच्या उतरत्या क्रमानुसार संचालकांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत कंपनीची बैठक घेऊ नये. बैठक घेऊन होणारे कामकाज हे नियमबाह्य असल्याचे शाहू खैरे यांनी म्हटले आहे. तसे पत्रही त्यांनी कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांना दिले आहे.