शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

ऊसतोड कामगारांच्या धर्तीवर आदिवासी मजूरांनाही लागली घरची ओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 14:33 IST

पेठ : लॉक डाऊनमुळे राज्यातल्या विविध भागात ऊसतोडणी कामगार अडकून पडल्याने त्यांना गावाकडे परतण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र आदेश काढल्याने याच धर्तीवर विविध जिल्हयात रोजगारानिमित्त स्थलांतरीत झालेल्या नाशिक व ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी शेतमजूरांना घरी परतण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

ठळक मुद्देपेठ : उपासमारीचा करतायत सामना -शासनाने परवानगी देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपेठ : लॉक डाऊनमुळे राज्यातल्या विविध भागात ऊसतोडणी कामगार अडकून पडल्याने त्यांना गावाकडे परतण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र आदेश काढल्याने याच धर्तीवर विविध जिल्हयात रोजगारानिमित्त स्थलांतरीत झालेल्या नाशिक व ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी शेतमजूरांना घरी परतण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.पेठ, सुरगाणा, त्र्यंबक, ईगतपूरी, जव्हार, मोखाडा, पालघर या भागातील भूमीहिन शेतमजूर दरवर्षी मार्च महिन्यात मोठया प्रमाणावर राज्यभर स्थलांतर करत असतात. या वर्षी अचानक झालेल्या लॉक डाऊनमुळे हजारो मजूर अडकून पडले असून त्यांच्याकडील जीवनावश्यक साहित्य संपल्याने उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. हाताला काम नाही व खिशात दमडी शिल्लक न राहिल्याने अनेक मजूरांनी मुलां बाळांसह जीव धोक्यात घालून शेकडो किलोमीटर पायी प्रवास करून गाव गाठले तर लॉक डाऊन मुळे संचारबंदी कडक केल्याने अजूनही हजारो शेतमजूर शेतात, गावाच्या आजूबाजूला, उघड्यावर अडकून पडले आहेत.सर्वांना मिळावा समान न्याय !राज्यात अडकून पडलेल्या ऊस तोड कामगारांना स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामूळे शासनाने आदेश काढून त्यांचा गावी जाण्याचा मार्ग मोकळा केला असतांना दुसरीकडे आदिवासी मजूर मात्र गावाची आस धरून आहेत. आदिवासी भागातील लोकप्रतिनिधींनी शासनस्तरावर पाठपूरावा करून राज्यात अडकलेल्या शेतमजूरांची माहिती संकलन करून शासनाला साकडे घालावे अशी मागणी करण्यात येत असून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ एका आदिवासी मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करत असल्याने मजूरांची त्यांच्याकडून अशा प्रकारच्या आदेशासाठी अपेक्षा वाढल्या आहेत.टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी मुलां-बाळासह स्थलांतरीत झालेल्या शेतमजूरांचा लॉक डाऊन कालावधी वाढल्याने अंत सुटत चालला असून शासनाने ऊस तोड कामगारांच्या धर्तीवर नियमांचे पालन व शासकिय नियमांची व आरोग्य तपासणीची पूर्तता करून आदिवासी मजूरांना गावी पोहचते करावे.- राकेश दळवी, सामाजिक कार्यकर्ता.