शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
3
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
4
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
5
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
6
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
7
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
8
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
9
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
10
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
12
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
13
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
14
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
15
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
16
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
17
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
18
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
19
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
20
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...

ऊसतोड कामगारांच्या धर्तीवर आदिवासी मजूरांनाही लागली घरची ओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 14:33 IST

पेठ : लॉक डाऊनमुळे राज्यातल्या विविध भागात ऊसतोडणी कामगार अडकून पडल्याने त्यांना गावाकडे परतण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र आदेश काढल्याने याच धर्तीवर विविध जिल्हयात रोजगारानिमित्त स्थलांतरीत झालेल्या नाशिक व ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी शेतमजूरांना घरी परतण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

ठळक मुद्देपेठ : उपासमारीचा करतायत सामना -शासनाने परवानगी देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपेठ : लॉक डाऊनमुळे राज्यातल्या विविध भागात ऊसतोडणी कामगार अडकून पडल्याने त्यांना गावाकडे परतण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र आदेश काढल्याने याच धर्तीवर विविध जिल्हयात रोजगारानिमित्त स्थलांतरीत झालेल्या नाशिक व ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी शेतमजूरांना घरी परतण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.पेठ, सुरगाणा, त्र्यंबक, ईगतपूरी, जव्हार, मोखाडा, पालघर या भागातील भूमीहिन शेतमजूर दरवर्षी मार्च महिन्यात मोठया प्रमाणावर राज्यभर स्थलांतर करत असतात. या वर्षी अचानक झालेल्या लॉक डाऊनमुळे हजारो मजूर अडकून पडले असून त्यांच्याकडील जीवनावश्यक साहित्य संपल्याने उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. हाताला काम नाही व खिशात दमडी शिल्लक न राहिल्याने अनेक मजूरांनी मुलां बाळांसह जीव धोक्यात घालून शेकडो किलोमीटर पायी प्रवास करून गाव गाठले तर लॉक डाऊन मुळे संचारबंदी कडक केल्याने अजूनही हजारो शेतमजूर शेतात, गावाच्या आजूबाजूला, उघड्यावर अडकून पडले आहेत.सर्वांना मिळावा समान न्याय !राज्यात अडकून पडलेल्या ऊस तोड कामगारांना स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामूळे शासनाने आदेश काढून त्यांचा गावी जाण्याचा मार्ग मोकळा केला असतांना दुसरीकडे आदिवासी मजूर मात्र गावाची आस धरून आहेत. आदिवासी भागातील लोकप्रतिनिधींनी शासनस्तरावर पाठपूरावा करून राज्यात अडकलेल्या शेतमजूरांची माहिती संकलन करून शासनाला साकडे घालावे अशी मागणी करण्यात येत असून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ एका आदिवासी मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करत असल्याने मजूरांची त्यांच्याकडून अशा प्रकारच्या आदेशासाठी अपेक्षा वाढल्या आहेत.टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी मुलां-बाळासह स्थलांतरीत झालेल्या शेतमजूरांचा लॉक डाऊन कालावधी वाढल्याने अंत सुटत चालला असून शासनाने ऊस तोड कामगारांच्या धर्तीवर नियमांचे पालन व शासकिय नियमांची व आरोग्य तपासणीची पूर्तता करून आदिवासी मजूरांना गावी पोहचते करावे.- राकेश दळवी, सामाजिक कार्यकर्ता.