शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

APMC कायदा रद्द करा, नाशिक घाऊक व्यापारी संघटनेची मागणी

By नामदेव भोर | Updated: September 18, 2022 18:23 IST

केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना घातले साकडे

लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक: व्यापाऱ्यांनी जीएसटी कर स्वीकारला असला तरी राज्यात अजूनही अनेक उपकर आहे. एपीएमसी अंतर्गत अजूनही १ टक्क बाजार शुल्क आकारले जात असून एपीएमसीचे सर्व नियम जुनेच असल्याने व्यापाऱ्यांसाठी जाचक ठरणारा एपीएमसी कायदा रद्द करण्याची मागणी नाशिक धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी नाशिक शहरातील व्यापारी, डॉक्टर व उद्योजक यांच्याशी संवाद साधला. यावेळी व्यापाऱ्यांनी त्यांना दिलेल्या निवेदनातून एपीएमसीचा कायदा हटविण्याची मागणी केली. व्यापाऱ्यांनी वन इंडिया वन टॅक्सअंतर्गत जीएसटी स्वीकारला असताना राज्यातील इतर उपकर हटवण्याची मागणी व्यापारी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली. दरम्यान, डॉ. भारती पवार यांनी लवकरच मुंबई येथे यासंदर्भात बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याचे घाऊक नाशिक धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटनेतर्फे देण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांनी दिली आहे.

देशातील एकूण नोंदणीकृत व्यापाऱ्यांपैकी ५० टक्के व्यापारी अन्नधान्याचा व्यापार करीत असून हे व्यापारी संपूर्णत: संगणकीकृत नाहीत. त्यामुळे अशा व्यपाऱ्यांसाठी जीएसटी आणि टीडीएस कर प्रणाली क्लिष्ट असून व्यापाऱ्यांना त्यासाठी संपूर्णत: सीए व कर सल्लागारांवर अवलंबून राहावे लागत असल्याचेही व्यापाऱ्यांनी डॉ. भारती पवार यांना दिलेल्या निवदेनात नमूद केले आहे, तसेच सरकारच्या धोरणानुसार अन्नधान्य नियमनमुक्त असताना राज्यात एपीएमसीचे नियम जुने असून शहरातील सर्व जकात नाक्यांवर अजूनही मालाच्या गाड्या अडवून धान्याच्या किमतीचा एक टक्का बाजार शुल्क वसूल केला जात असून अन्य राज्यातून येणाऱ्या धान्यमालावरही बाजार शुल्क आकारला जात असल्याने त्याचा बोजा व्यापऱ्यांवर आणि पर्यायाने नागरिकांवरही पडत असल्याचे घाऊक व्यापारी संघटनेने डॉ. भारती पवार यांच्या निदर्शनास आणून देत एपीएमसीच्या बाजार शुल्कातून व्यापाऱ्यांची सुटका करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकfoodअन्न