शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

संस्थेसाठी त्याग करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 00:33 IST

कुटुंब आणि गाव हे एक म्हणून कुंदेवाडी हे आदर्श गाव आहे. खऱ्या अर्थाने पुरोगामी असलेल्या या गावातील मविप्र संस्थेची शाळा आज ५० वर्षं पूर्ण करते ही मी गावचा या नात्याने अभिमानाची असून, माजी विद्यार्थ्यांनी संस्था ही आपली आई आहे याची जाणीव ठेवून त्यागाची भावना ठेवावी आवाहन माजी मंत्री विनायकदादा पाटील यांनी केले.

ठळक मुद्देविनायकदादा पाटील : कुंदेवाडी शाळेचा सुवर्णमहोत्सव

निफाड : कुटुंब आणि गाव हे एक म्हणून कुंदेवाडी हे आदर्श गाव आहे. खऱ्या अर्थाने पुरोगामी असलेल्या या गावातील मविप्र संस्थेची शाळा आज ५० वर्षं पूर्ण करते ही मी गावचा या नात्याने अभिमानाची असून, माजी विद्यार्थ्यांनी संस्था ही आपली आई आहे याची जाणीव ठेवून त्यागाची भावना ठेवावी आवाहन माजी मंत्री विनायकदादा पाटील यांनी केले.कुंदेवाडी, ता. निफाड येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयाच्या सुवर्णमहोत्सव वर्षानिमित्त माजी विद्यार्थी मेळावा कार्यक्र मात ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, चिटणीस सुनील ढिकले, सभापती माणिकराव बोरस्ते, सुरेशबाबा पाटील, रायभान काळे, सचिन पिंगळे, राघो आहिरे, भाऊसाहेब खताळे, प्रशांत देवरे, विश्राम निकम, विश्वास मोरे, नानासाहेब दाते, नंदा सोनवणे, शिक्षणाधिकारी डी. डी. काजळे, एस. के. शिंदे, शिवाजी भालेराव, मुख्याध्यापक एम.टी. पाटील आदी मान्यवर होते.यावेळी विनायकदादा पाटील यांनी १९५२ साली कुंदेवाडी येथून कोलंबोला कांदा एक्स्पोर्ट होत असल्याची माहिती दिली.कृषी संशोधन केंद्र, वीज केंद्र, रेल्वे स्टेशन, माध्यमिक शाळा अशा अनेक मोठ्या संस्था गावात उभ्या राहिल्या त्यात या गावच्या लोकांचा त्याग असल्याची आठवण करून देत ज्या ठिकाणी बोट क्लब सुरू होतोय तिथे पूर्वी डोह होता आणि त्यात मगरी असल्याची जुनी माहिती दिली. यावेळी शाळेने सुवर्णमहोत्सवा-निमित्त काढलेल्या स्वामी या स्मरणिकेचे प्रकाशन व कादवा नदीतील बोट क्लबच्या शुभारंभाचा कार्यक्रम झाला. स्वागताध्यक्ष संचालक प्रल्हाद गडाख यांनी प्रास्ताविक केले. नीलिमा पवार, सभापती माणिकराव बोरस्ते तसेच नंदू गायकवाड, रावसाहेब घेगडे, सीमा पाटील या माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच विनोद मोरे, वैकुंठ पाटील, कांतिलाल अलिझाड, सुनील शिंदे, अभय बलदोटा, अशोक शिंदे, माधव गिते, संदीप शिंदे, योगेश शिंदे, सुनील घेगडे, प्रभाकर वाघ, शिवाजी ढेपले, अविनाश पवार, जानकीराम धारराव यांच्यासह माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. गेल्या दोन महिन्यांपासून या मेळाव्याची तयारी सुरू होती. गेल्या ५० वर्षातील शाळेचे माजी विद्यार्थी एकत्र आले होते. त्यामुळे शाळेच्या प्रांगणात एकमेकांना अनेक वर्षांनी भेटलेले मित्रमैत्रिणी गप्पामध्ये रंगले होते. या कार्यक्र मानिमित्ताने आलेल्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला देणगी म्हणून एका दिवसात ९८ हजार रु पये जमा झाले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी