शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

ऐतिहासिक शहजहांनी ईदगाह मैदानातून जातीय सलोखा व एकात्मतेचा संदेश

By अझहर शेख | Updated: April 22, 2023 12:33 IST

हजारो मुस्लीम बांधवांकडून नमाज अदा

अझहर शेख, नाशिक: आपापसांत प्रेम, बंधुभाव, करुणा व माणुसकीची शिकवण देणारी ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद नाशिक शहर व परिसरात मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने शनिवारी (दि.22) साजरी करण्यात आली. येथील ऐतिहासिक शहाजहांनी ईदगाह मैदानात विशेष नमाजपठणाचा सोहळा पार पडला. शहर ए खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी सोहळ्याचे नेतृत्व केले.

गेल्या महिनाभरापासून मुस्लीम बांधवांचा रमजान पर्व सुरू होते. यानिमित्ताने समाजबांधवांनी महिनाभर निर्जली उपवास (रोजे) केले. अल्लाह च्या उपासनेत स्वतःला अधिकाधिक व्यस्त ठेवण्यास प्राधान्य दिले. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत सर्वच मशिदींमध्ये वर्दळ पहावयास मिळत होती. शुक्रवारी संध्याकाळी चंद्रदर्शन घडले आणि रमजान पर्वाची सांगता झाली.

शनिवारी ईदगाह मैदानात नमाजपठण सोहळ्याला सकाळी 9 वाजता सुरुवात झाली. आठ वाजेपासून समाजबांधव ईदगाहकडे येण्यास सुरवात झाली. मैदानाकडे येणारे सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते. पारंपरिक नवीन पठाणी कुर्ता, डोक्यावर इस्लामी फेटा, टोपी पायात अशा पोशाखात नागरिक हजारोंच्या संख्येने जमले होते. मैदानाच्या दोन्ही प्रवेशद्वारांभोवती शुचिर्भूत (वजु) होण्यासाठी पाण्याचे नळ तात्पुरते बसविण्यात आले होते.

सकाळी सव्वा नऊ वाजता मौलाना जफर यांनी प्रवचनाला प्रारंभ केला. त्यांनी रमजान ईद चे महत्व, ईदच्या दिवशी करावयाचे कर्तव्ये, जबाबदाऱ्याविषयी प्रकाश टाकला. दरम्यान, नमाज अदा करण्याअगोदर नागरिकांनी जकात, फित्राची (धान्यदान) रक्कम दान केली. 

सकाळी सव्वा दहा वाजता खतीब ए शहर हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी नमाजपठणाची पद्धत समजावून सांगितली आणि नमाज पठणास सुरुवात केली. विशेष दोन रकात नमाज अदा केल्यानंतर अरबी भाषेतून खतीब यांनी विशेष 'खुतबा' वाचला. यावेळी उपस्थितांनी मौन ठेवत एकाग्रतेने खुतबा ऐकला. यानंतर संपुर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी व भारताच्या उत्तरोत्तर सर्वांगीण प्रगतीकरिता दुवा करण्यात आली. प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्यावर आधारित दरुदोसलामचे उपस्थितांनी सामूहिक पठण केले आणि सोहळ्याची सांगता झाली. 

छत्र्यांचा घेतला आधार

उन्हाची तीव्रता वाढू लागताच जेष्ठ नागरिकांनी मैदानात छत्र्यांचा आधार घेतल्याचे चित्र पहावयास मिळाले. वाढत्या उष्म्यामुळे नागरिकांनी सोबत पिण्याचे पाणीही बाळगले होते.

राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश

ईदगाह मैदानातून नमाजपठणाच्या सोहळ्यादरम्यान राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. भारताविषयीचे आपले प्रेम अधिकाधिक वृद्धिंगत करा, देशात अमन, शांती कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन करण्यात आले.

टॅग्स :Eid e miladईद ए मिलाद