शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
3
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
4
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
5
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
6
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
8
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
9
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
10
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
11
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
12
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
13
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
14
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
15
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
17
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
18
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
19
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
20
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

ऐतिहासिक शहजहांनी ईदगाह मैदानातून जातीय सलोखा व एकात्मतेचा संदेश

By अझहर शेख | Updated: April 22, 2023 12:33 IST

हजारो मुस्लीम बांधवांकडून नमाज अदा

अझहर शेख, नाशिक: आपापसांत प्रेम, बंधुभाव, करुणा व माणुसकीची शिकवण देणारी ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद नाशिक शहर व परिसरात मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने शनिवारी (दि.22) साजरी करण्यात आली. येथील ऐतिहासिक शहाजहांनी ईदगाह मैदानात विशेष नमाजपठणाचा सोहळा पार पडला. शहर ए खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी सोहळ्याचे नेतृत्व केले.

गेल्या महिनाभरापासून मुस्लीम बांधवांचा रमजान पर्व सुरू होते. यानिमित्ताने समाजबांधवांनी महिनाभर निर्जली उपवास (रोजे) केले. अल्लाह च्या उपासनेत स्वतःला अधिकाधिक व्यस्त ठेवण्यास प्राधान्य दिले. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत सर्वच मशिदींमध्ये वर्दळ पहावयास मिळत होती. शुक्रवारी संध्याकाळी चंद्रदर्शन घडले आणि रमजान पर्वाची सांगता झाली.

शनिवारी ईदगाह मैदानात नमाजपठण सोहळ्याला सकाळी 9 वाजता सुरुवात झाली. आठ वाजेपासून समाजबांधव ईदगाहकडे येण्यास सुरवात झाली. मैदानाकडे येणारे सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते. पारंपरिक नवीन पठाणी कुर्ता, डोक्यावर इस्लामी फेटा, टोपी पायात अशा पोशाखात नागरिक हजारोंच्या संख्येने जमले होते. मैदानाच्या दोन्ही प्रवेशद्वारांभोवती शुचिर्भूत (वजु) होण्यासाठी पाण्याचे नळ तात्पुरते बसविण्यात आले होते.

सकाळी सव्वा नऊ वाजता मौलाना जफर यांनी प्रवचनाला प्रारंभ केला. त्यांनी रमजान ईद चे महत्व, ईदच्या दिवशी करावयाचे कर्तव्ये, जबाबदाऱ्याविषयी प्रकाश टाकला. दरम्यान, नमाज अदा करण्याअगोदर नागरिकांनी जकात, फित्राची (धान्यदान) रक्कम दान केली. 

सकाळी सव्वा दहा वाजता खतीब ए शहर हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी नमाजपठणाची पद्धत समजावून सांगितली आणि नमाज पठणास सुरुवात केली. विशेष दोन रकात नमाज अदा केल्यानंतर अरबी भाषेतून खतीब यांनी विशेष 'खुतबा' वाचला. यावेळी उपस्थितांनी मौन ठेवत एकाग्रतेने खुतबा ऐकला. यानंतर संपुर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी व भारताच्या उत्तरोत्तर सर्वांगीण प्रगतीकरिता दुवा करण्यात आली. प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्यावर आधारित दरुदोसलामचे उपस्थितांनी सामूहिक पठण केले आणि सोहळ्याची सांगता झाली. 

छत्र्यांचा घेतला आधार

उन्हाची तीव्रता वाढू लागताच जेष्ठ नागरिकांनी मैदानात छत्र्यांचा आधार घेतल्याचे चित्र पहावयास मिळाले. वाढत्या उष्म्यामुळे नागरिकांनी सोबत पिण्याचे पाणीही बाळगले होते.

राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश

ईदगाह मैदानातून नमाजपठणाच्या सोहळ्यादरम्यान राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. भारताविषयीचे आपले प्रेम अधिकाधिक वृद्धिंगत करा, देशात अमन, शांती कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन करण्यात आले.

टॅग्स :Eid e miladईद ए मिलाद