शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकहून २३ दिवसांचा पायी प्रवास करत उंटांचा कळप पोहचला राजस्थानात!

By अझहर शेख | Updated: June 13, 2023 14:52 IST

चुंचाळे पांजरापोळ येथून पाहुणचार घेतल्यानंतर १९ मे रोजी सकाळी ९५ उंटांचा कळप मार्गस्थ झाला.

नाशिक : येथील चुंचाळे व मालेगावच्या गोशाळेतून २३ दिवसांपूर्वी मरुभूमी राजस्थानच्या दिशेने सात रायकांसोबत निघालेल्या १५३ उंटांपैकी १२३ उंटांचा कळप सोमवारी (दि.१२) संध्याकाळी मायभूमीत पोहोचला. धरमपूरपासून पुढील प्रवासात २५ उंटांची प्रकृती खालावल्याने त्यांना गुजरातच्या वाझदामध्येच थांबविण्यात आले. त्यामधील दोन उंट मृत्युमुखी पडले असून उर्वरित उंटाची प्रकृती स्थिर आहे. त्यांनाही लवकरच सिरोहीला नेले जाणार असल्याचे महावीर कॅमल सेन्च्युरीचे सचिव सुरेंद्र भंडारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

चुंचाळे पांजरापोळ येथून पाहुणचार घेतल्यानंतर १९ मे रोजी सकाळी ९५ उंटांचा कळप मार्गस्थ झाला. या कळपाने रविवारीच (दि. २१) महाराष्ट्राची बॉर्डर ओलांडली खरी; मात्र येथूनच पुढे मार्ग भरकटला होता. २३ मे रोजी उंटांचा हा कळप वाझद्याहून पुढे रात्री आठ वाजता धरमपूरस्थित श्रीमद राजचंद्र मिशनच्या प्राणी निवारागृहात (जीवमैत्रीधाम) पोहोचला होता. सुरुवातीपासून ‘लाेकमत’ने उंटांबाबत पाठपुरावा सुरू ठेवला होता.मालेगाव येथील गोशाळेतून २१ मे रोजी दुपारी धरमपूरच्या दिशेने निघालेले ५३ उंट २४ मे रोजी संध्याकाळी जीवमैत्रीधाममध्ये पोहोचले.

याठिकाणी पशूंच्या दवाखान्यातील २० पशुवैद्यक व त्यांच्या सहायकांकडून उंटांवर आवश्यक ते औषधोपचार करण्यात आले. दोन दिवसानंतर तेथून २६ मे रोजी पुढील प्रवासाला प्रारंभ करण्यात आला. दरम्यान, काही अंतर चालल्यानंतर वाझदामध्ये एक प्राणी प्रेमी संस्थेकडे २५उंटांना थांबून ठेवण्यात आले आहे. उर्वरित उंटांच्या कळपाने राजस्थानच्या सिरोहीपर्यंतचे लांब पल्ल्याचे शेकडो किलोमीटरचे अंतर यशस्वीरित्या कापले. सोमवारी संध्याकाळी १२३ उंट सिरोहीमध्ये दाखल झाल्याचे तेथील उंट संवर्धनासाठी काम करणाऱ्या लोकहित पशुपालक संस्थेचे संस्थापक हनुमंतसिंग राठोड यांनी सांगितले.

एकूण १६ उंटांनी गमावले प्राण

गुजरातमार्गे नाशिकमध्ये उंटांचा कळप दाखल झाल्यानंतर पांजरापोळमध्ये १९ मेपर्यंत १३ तर मालेगावात १ आणि नाशिक- राजस्थान प्रवासादरम्यान वाझदामध्ये २ असे एकूण १६ उंट मृत्युमुखी पडले आहेत. तसेच मालेगावात उंटाच्या मादीने (सांडणी) एका ‘टोडिया’ला जन्म दिला होता.

७ रायकांनी पोहोचविले १२३उंट

नाशिक ते थेट राजस्थानपर्यंत १२३उंटांना सुखरूपपणे अवघ्या सात ‘रायकां’कडून पोहोचविण्यात आले. उंटांच्या कळपासोबत लोकहित पशुपालक संस्थेचे हे सर्व ‘रायका’पायी चालले. अत्यंत आव्हानात्मक व खडतर प्रवास त्यांनी पूर्ण करत येणाऱ्या विविध अडचणींवर मात केली.