शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

नाशिकहून २३ दिवसांचा पायी प्रवास करत उंटांचा कळप पोहचला राजस्थानात!

By अझहर शेख | Updated: June 13, 2023 14:52 IST

चुंचाळे पांजरापोळ येथून पाहुणचार घेतल्यानंतर १९ मे रोजी सकाळी ९५ उंटांचा कळप मार्गस्थ झाला.

नाशिक : येथील चुंचाळे व मालेगावच्या गोशाळेतून २३ दिवसांपूर्वी मरुभूमी राजस्थानच्या दिशेने सात रायकांसोबत निघालेल्या १५३ उंटांपैकी १२३ उंटांचा कळप सोमवारी (दि.१२) संध्याकाळी मायभूमीत पोहोचला. धरमपूरपासून पुढील प्रवासात २५ उंटांची प्रकृती खालावल्याने त्यांना गुजरातच्या वाझदामध्येच थांबविण्यात आले. त्यामधील दोन उंट मृत्युमुखी पडले असून उर्वरित उंटाची प्रकृती स्थिर आहे. त्यांनाही लवकरच सिरोहीला नेले जाणार असल्याचे महावीर कॅमल सेन्च्युरीचे सचिव सुरेंद्र भंडारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

चुंचाळे पांजरापोळ येथून पाहुणचार घेतल्यानंतर १९ मे रोजी सकाळी ९५ उंटांचा कळप मार्गस्थ झाला. या कळपाने रविवारीच (दि. २१) महाराष्ट्राची बॉर्डर ओलांडली खरी; मात्र येथूनच पुढे मार्ग भरकटला होता. २३ मे रोजी उंटांचा हा कळप वाझद्याहून पुढे रात्री आठ वाजता धरमपूरस्थित श्रीमद राजचंद्र मिशनच्या प्राणी निवारागृहात (जीवमैत्रीधाम) पोहोचला होता. सुरुवातीपासून ‘लाेकमत’ने उंटांबाबत पाठपुरावा सुरू ठेवला होता.मालेगाव येथील गोशाळेतून २१ मे रोजी दुपारी धरमपूरच्या दिशेने निघालेले ५३ उंट २४ मे रोजी संध्याकाळी जीवमैत्रीधाममध्ये पोहोचले.

याठिकाणी पशूंच्या दवाखान्यातील २० पशुवैद्यक व त्यांच्या सहायकांकडून उंटांवर आवश्यक ते औषधोपचार करण्यात आले. दोन दिवसानंतर तेथून २६ मे रोजी पुढील प्रवासाला प्रारंभ करण्यात आला. दरम्यान, काही अंतर चालल्यानंतर वाझदामध्ये एक प्राणी प्रेमी संस्थेकडे २५उंटांना थांबून ठेवण्यात आले आहे. उर्वरित उंटांच्या कळपाने राजस्थानच्या सिरोहीपर्यंतचे लांब पल्ल्याचे शेकडो किलोमीटरचे अंतर यशस्वीरित्या कापले. सोमवारी संध्याकाळी १२३ उंट सिरोहीमध्ये दाखल झाल्याचे तेथील उंट संवर्धनासाठी काम करणाऱ्या लोकहित पशुपालक संस्थेचे संस्थापक हनुमंतसिंग राठोड यांनी सांगितले.

एकूण १६ उंटांनी गमावले प्राण

गुजरातमार्गे नाशिकमध्ये उंटांचा कळप दाखल झाल्यानंतर पांजरापोळमध्ये १९ मेपर्यंत १३ तर मालेगावात १ आणि नाशिक- राजस्थान प्रवासादरम्यान वाझदामध्ये २ असे एकूण १६ उंट मृत्युमुखी पडले आहेत. तसेच मालेगावात उंटाच्या मादीने (सांडणी) एका ‘टोडिया’ला जन्म दिला होता.

७ रायकांनी पोहोचविले १२३उंट

नाशिक ते थेट राजस्थानपर्यंत १२३उंटांना सुखरूपपणे अवघ्या सात ‘रायकां’कडून पोहोचविण्यात आले. उंटांच्या कळपासोबत लोकहित पशुपालक संस्थेचे हे सर्व ‘रायका’पायी चालले. अत्यंत आव्हानात्मक व खडतर प्रवास त्यांनी पूर्ण करत येणाऱ्या विविध अडचणींवर मात केली.