शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

नाशिकहून २३ दिवसांचा पायी प्रवास करत उंटांचा कळप पोहचला राजस्थानात!

By अझहर शेख | Updated: June 13, 2023 14:52 IST

चुंचाळे पांजरापोळ येथून पाहुणचार घेतल्यानंतर १९ मे रोजी सकाळी ९५ उंटांचा कळप मार्गस्थ झाला.

नाशिक : येथील चुंचाळे व मालेगावच्या गोशाळेतून २३ दिवसांपूर्वी मरुभूमी राजस्थानच्या दिशेने सात रायकांसोबत निघालेल्या १५३ उंटांपैकी १२३ उंटांचा कळप सोमवारी (दि.१२) संध्याकाळी मायभूमीत पोहोचला. धरमपूरपासून पुढील प्रवासात २५ उंटांची प्रकृती खालावल्याने त्यांना गुजरातच्या वाझदामध्येच थांबविण्यात आले. त्यामधील दोन उंट मृत्युमुखी पडले असून उर्वरित उंटाची प्रकृती स्थिर आहे. त्यांनाही लवकरच सिरोहीला नेले जाणार असल्याचे महावीर कॅमल सेन्च्युरीचे सचिव सुरेंद्र भंडारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

चुंचाळे पांजरापोळ येथून पाहुणचार घेतल्यानंतर १९ मे रोजी सकाळी ९५ उंटांचा कळप मार्गस्थ झाला. या कळपाने रविवारीच (दि. २१) महाराष्ट्राची बॉर्डर ओलांडली खरी; मात्र येथूनच पुढे मार्ग भरकटला होता. २३ मे रोजी उंटांचा हा कळप वाझद्याहून पुढे रात्री आठ वाजता धरमपूरस्थित श्रीमद राजचंद्र मिशनच्या प्राणी निवारागृहात (जीवमैत्रीधाम) पोहोचला होता. सुरुवातीपासून ‘लाेकमत’ने उंटांबाबत पाठपुरावा सुरू ठेवला होता.मालेगाव येथील गोशाळेतून २१ मे रोजी दुपारी धरमपूरच्या दिशेने निघालेले ५३ उंट २४ मे रोजी संध्याकाळी जीवमैत्रीधाममध्ये पोहोचले.

याठिकाणी पशूंच्या दवाखान्यातील २० पशुवैद्यक व त्यांच्या सहायकांकडून उंटांवर आवश्यक ते औषधोपचार करण्यात आले. दोन दिवसानंतर तेथून २६ मे रोजी पुढील प्रवासाला प्रारंभ करण्यात आला. दरम्यान, काही अंतर चालल्यानंतर वाझदामध्ये एक प्राणी प्रेमी संस्थेकडे २५उंटांना थांबून ठेवण्यात आले आहे. उर्वरित उंटांच्या कळपाने राजस्थानच्या सिरोहीपर्यंतचे लांब पल्ल्याचे शेकडो किलोमीटरचे अंतर यशस्वीरित्या कापले. सोमवारी संध्याकाळी १२३ उंट सिरोहीमध्ये दाखल झाल्याचे तेथील उंट संवर्धनासाठी काम करणाऱ्या लोकहित पशुपालक संस्थेचे संस्थापक हनुमंतसिंग राठोड यांनी सांगितले.

एकूण १६ उंटांनी गमावले प्राण

गुजरातमार्गे नाशिकमध्ये उंटांचा कळप दाखल झाल्यानंतर पांजरापोळमध्ये १९ मेपर्यंत १३ तर मालेगावात १ आणि नाशिक- राजस्थान प्रवासादरम्यान वाझदामध्ये २ असे एकूण १६ उंट मृत्युमुखी पडले आहेत. तसेच मालेगावात उंटाच्या मादीने (सांडणी) एका ‘टोडिया’ला जन्म दिला होता.

७ रायकांनी पोहोचविले १२३उंट

नाशिक ते थेट राजस्थानपर्यंत १२३उंटांना सुखरूपपणे अवघ्या सात ‘रायकां’कडून पोहोचविण्यात आले. उंटांच्या कळपासोबत लोकहित पशुपालक संस्थेचे हे सर्व ‘रायका’पायी चालले. अत्यंत आव्हानात्मक व खडतर प्रवास त्यांनी पूर्ण करत येणाऱ्या विविध अडचणींवर मात केली.