शहरं
Join us  
Trending Stories
1
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
2
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
3
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
4
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
5
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
6
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
7
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
8
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
9
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
10
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
11
Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
12
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
13
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
14
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
15
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
16
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
17
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
18
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
19
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
20
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी गावांतही जगली ९८ टक्के रोपे

By admin | Updated: January 28, 2017 01:10 IST

वृक्षलागवड अभियान : पर्जन्यराजाची वृक्षारोपणावर कृपा

नाशिक : राज्य शासनाच्या वतीने १ जुलै २०१६ रोजी दोन कोटी वृक्षलागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राज्यभर राबविण्यात आला. नाशिक जिल्ह्यातही वनविभागासह इतर सर्व शासकीय कार्यालयाच्या वतीने सदर मोहीम राबविण्यात आली. परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग हा वनविभागाचा होता. या उपक्रमांतर्गत वनविभागाने मागीलवर्षी केलेल्या वृक्षारोपणाचा आढावा घेतला असता ६२ गावांमध्ये करण्यात आलेल्या वृक्षारोपणातील सुमारे ९८ टक्के वृक्ष जिवंत असल्याचे सर्वेक्षणांतर्गत समोर आले आहे. विशेष म्हणजे ९० टक्के गावे ही दुष्काळी आहेत. वनविभागाच्या वतीने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून राज्यभर दोन कोटी वृक्षलागवड करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम गेल्या १ जुलै २०१६ रोजी राबविण्यात आला. यामध्ये शासनाच्या सर्व खात्यांनी सहभाग नोंदविला होता. वनविभागाच्या पूर्व विभागात सात दुष्काळी तालुक्यांतील ६२ गावांमध्ये वृक्षारोपण करण्याचे आणि लावलेली रोपे जगविण्याचे शिवधनुष्य वनविभागाने पेलले आहे. नियोजन, निगराणी आणि नियमावलीच्या त्रिसूत्रीतून वृक्षारोपणाचे संगोपन करण्यात आल्याने रोपांना संजीवनी मिळाली आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सिन्नर, नाशिक, सुरगाणा आणि दिंडोरी यासारख्या आदिवासी आणि दुष्काळी भागातील दुर्गम क्षेत्रात वनविभागाने व्यापक वृक्षारोपण मोहीम राबविली होती. या मोहिमेत वनविभागाने ९ लाख ३७ हजार ७९ वृक्षांची लागवड केली होती. त्यामध्ये ९ लाख २५ हजार ९५१ इतकी रोपे जगल्याच्या माहितीची नोंद करण्यात आली आहे. रोपे जगण्याची ही टक्केवारी ९८.८० टक्के इतकी आहे. तर याच तालुक्यांमध्ये संयुक्त वनव्यवस्थापन समितीने लागवड केलेल्या ९ लाख ४५ हजार ७९ रोपांपैकी ९ लाख ३३ हजार ६२५ इतकी रोपे जगल्याची गणना करण्यात आलेली आहे. रोपे जगण्याची ही टक्केवारी ९८.७९ टक्के इतकी आहे. (प्रतिनिधी)