शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

दुष्काळी गावांतही जगली ९८ टक्के रोपे

By admin | Updated: January 28, 2017 01:10 IST

वृक्षलागवड अभियान : पर्जन्यराजाची वृक्षारोपणावर कृपा

नाशिक : राज्य शासनाच्या वतीने १ जुलै २०१६ रोजी दोन कोटी वृक्षलागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राज्यभर राबविण्यात आला. नाशिक जिल्ह्यातही वनविभागासह इतर सर्व शासकीय कार्यालयाच्या वतीने सदर मोहीम राबविण्यात आली. परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग हा वनविभागाचा होता. या उपक्रमांतर्गत वनविभागाने मागीलवर्षी केलेल्या वृक्षारोपणाचा आढावा घेतला असता ६२ गावांमध्ये करण्यात आलेल्या वृक्षारोपणातील सुमारे ९८ टक्के वृक्ष जिवंत असल्याचे सर्वेक्षणांतर्गत समोर आले आहे. विशेष म्हणजे ९० टक्के गावे ही दुष्काळी आहेत. वनविभागाच्या वतीने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून राज्यभर दोन कोटी वृक्षलागवड करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम गेल्या १ जुलै २०१६ रोजी राबविण्यात आला. यामध्ये शासनाच्या सर्व खात्यांनी सहभाग नोंदविला होता. वनविभागाच्या पूर्व विभागात सात दुष्काळी तालुक्यांतील ६२ गावांमध्ये वृक्षारोपण करण्याचे आणि लावलेली रोपे जगविण्याचे शिवधनुष्य वनविभागाने पेलले आहे. नियोजन, निगराणी आणि नियमावलीच्या त्रिसूत्रीतून वृक्षारोपणाचे संगोपन करण्यात आल्याने रोपांना संजीवनी मिळाली आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सिन्नर, नाशिक, सुरगाणा आणि दिंडोरी यासारख्या आदिवासी आणि दुष्काळी भागातील दुर्गम क्षेत्रात वनविभागाने व्यापक वृक्षारोपण मोहीम राबविली होती. या मोहिमेत वनविभागाने ९ लाख ३७ हजार ७९ वृक्षांची लागवड केली होती. त्यामध्ये ९ लाख २५ हजार ९५१ इतकी रोपे जगल्याच्या माहितीची नोंद करण्यात आली आहे. रोपे जगण्याची ही टक्केवारी ९८.८० टक्के इतकी आहे. तर याच तालुक्यांमध्ये संयुक्त वनव्यवस्थापन समितीने लागवड केलेल्या ९ लाख ४५ हजार ७९ रोपांपैकी ९ लाख ३३ हजार ६२५ इतकी रोपे जगल्याची गणना करण्यात आलेली आहे. रोपे जगण्याची ही टक्केवारी ९८.७९ टक्के इतकी आहे. (प्रतिनिधी)