शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

दुष्काळी गावांतही जगली ९८ टक्के रोपे

By admin | Updated: January 28, 2017 01:10 IST

वृक्षलागवड अभियान : पर्जन्यराजाची वृक्षारोपणावर कृपा

नाशिक : राज्य शासनाच्या वतीने १ जुलै २०१६ रोजी दोन कोटी वृक्षलागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राज्यभर राबविण्यात आला. नाशिक जिल्ह्यातही वनविभागासह इतर सर्व शासकीय कार्यालयाच्या वतीने सदर मोहीम राबविण्यात आली. परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग हा वनविभागाचा होता. या उपक्रमांतर्गत वनविभागाने मागीलवर्षी केलेल्या वृक्षारोपणाचा आढावा घेतला असता ६२ गावांमध्ये करण्यात आलेल्या वृक्षारोपणातील सुमारे ९८ टक्के वृक्ष जिवंत असल्याचे सर्वेक्षणांतर्गत समोर आले आहे. विशेष म्हणजे ९० टक्के गावे ही दुष्काळी आहेत. वनविभागाच्या वतीने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून राज्यभर दोन कोटी वृक्षलागवड करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम गेल्या १ जुलै २०१६ रोजी राबविण्यात आला. यामध्ये शासनाच्या सर्व खात्यांनी सहभाग नोंदविला होता. वनविभागाच्या पूर्व विभागात सात दुष्काळी तालुक्यांतील ६२ गावांमध्ये वृक्षारोपण करण्याचे आणि लावलेली रोपे जगविण्याचे शिवधनुष्य वनविभागाने पेलले आहे. नियोजन, निगराणी आणि नियमावलीच्या त्रिसूत्रीतून वृक्षारोपणाचे संगोपन करण्यात आल्याने रोपांना संजीवनी मिळाली आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सिन्नर, नाशिक, सुरगाणा आणि दिंडोरी यासारख्या आदिवासी आणि दुष्काळी भागातील दुर्गम क्षेत्रात वनविभागाने व्यापक वृक्षारोपण मोहीम राबविली होती. या मोहिमेत वनविभागाने ९ लाख ३७ हजार ७९ वृक्षांची लागवड केली होती. त्यामध्ये ९ लाख २५ हजार ९५१ इतकी रोपे जगल्याच्या माहितीची नोंद करण्यात आली आहे. रोपे जगण्याची ही टक्केवारी ९८.८० टक्के इतकी आहे. तर याच तालुक्यांमध्ये संयुक्त वनव्यवस्थापन समितीने लागवड केलेल्या ९ लाख ४५ हजार ७९ रोपांपैकी ९ लाख ३३ हजार ६२५ इतकी रोपे जगल्याची गणना करण्यात आलेली आहे. रोपे जगण्याची ही टक्केवारी ९८.७९ टक्के इतकी आहे. (प्रतिनिधी)