शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

८७ धान मिलर्सविरुद्ध दहा वर्षांनंतर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 01:18 IST

आदिवासींकडून खरेदी केलेले धान भरड्यासाठी दिल्यानंतर लाखो क्विंटल तांदूळ आदिवासी विकास महामंडळास परत करण्यास तब्बल दहा वर्षे टाळाटाळ करणाऱ्या ८७ मिलर्सविरुद्ध महामंडळाने कारवाईचा बडगा उगारला असून, या संदर्भात ५१ मिलर्सविरुद्ध पोलिसात फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याबरोबरच ६३ कोटींपैकी ३२ कोटी रुपये वसूल करण्यास महामंडळाला यश आले आहे. आक्रमक झालेल्या महामंडळामुळे मिलर्सचे धाबे दणाणले आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या इतिहासात अशा प्रकारची कारवाई पहिल्यांदाच करण्यात आली आहे.

ठळक मुद्देआदिवासी विकास महामंडळ ३२ कोटींची वसुली; इतिहासात प्रथमच झाली कारवाई

नाशिक : आदिवासींकडून खरेदी केलेले धान भरड्यासाठी दिल्यानंतर लाखो क्विंटल तांदूळ आदिवासी विकास महामंडळास परत करण्यास तब्बल दहा वर्षे टाळाटाळ करणाऱ्या ८७ मिलर्सविरुद्ध महामंडळाने कारवाईचा बडगा उगारला असून, या संदर्भात ५१ मिलर्सविरुद्ध पोलिसात फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याबरोबरच ६३ कोटींपैकी ३२ कोटी रुपये वसूल करण्यास महामंडळाला यश आले आहे. आक्रमक झालेल्या महामंडळामुळे मिलर्सचे धाबे दणाणले आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या इतिहासात अशा प्रकारची कारवाई पहिल्यांदाच करण्यात आली आहे.आदिवासी विकास महामंडळामार्फत आदिवासींकडून दरवर्षी धान खरेदी केले जाते. जमा झालेले धान भरडण्यासाठी तांदूळ मिलर्सकडे दिले जाते. भरडल्यानंतर सदरचा तांदूळ मिलर्सने आदिवासी विकास महामंडळाला परत करणे अपेक्षित असते. हा तांदूळनंतर आदिवासी विकास विभागाकडून अन्नधान्य महामंडळाला व तेथून तो पुरवठा विभागाला पाठविला जातो. महामंडळाने खरेदी केलेली दोन लाख, ९५ हजार क्विंटल धान २००९ मध्ये विदर्भातील भंडारा, अहेरी, गडचिरोली येथील ८७ मिलर्सकडे भरडण्यासाठी दिली असता, त्यांनी भरडलेल्या धानापासून तयार झालेला तांदूळ आदिवासी विकास विभागाला परत केला नाही. सुमारे ६३ कोटी रुपये किमतीच्या या तांदळाच्या परतीसाठी महामंडळाने अनेक प्रयत्न करूनही मिलर्सने त्याला दाद दिली नाही. या संदर्भात झालेल्या लेखा परीक्षणात आदिवासी विकास मंडळावर ताशेरे ओढण्यात आले होते.४६ मिलर्सविरुद्ध वसुलीची कारवाई करण्यासाठी महामंडळाने थेट त्यांच्या मालमत्ता जप्तीची पावले उचलली असून, त्याबाबतचे पत्र त्या त्या जिल्हाधिकाºयांना देण्यात येऊन आरआरसी (रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट) तयार करण्यात आली आहे.आदिवासी विकास महामंडळाकडून आजवर पहिल्यांदाच अशा प्रकारची कारवाई करण्यात आल्याने राज्यातील मिलर्सचे धाबे दणाणले आहे.५१ मिलर्सविरुद्ध फौजदारी गुन्हेमहामंडळाचे महाव्यवस्थापक विनय गोसावी यांनी या बाबीची गंभीर दखल घेऊन ताळमेळ बैठका घेत थेट मिलर्सविरुद्ध कारवाईचा पवित्रा घेतला. सर्व मिलर्सना अगोदर नोटिसा बजावून त्यांचे म्हणणे जाणून घेण्यात आल्यावर ५१ मिलर्सविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला व तसे आदेश प्रादेशिक व्यवस्थापकांना देण्यात आले. त्यावरून शासकीय रकमेचा अपहार करणे, फसवणूक करणे अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले तर या कारवाईमुळे काही मिलर्सने पैसे भरण्याची तयारी दर्शविली, त्यातून ३२ कोटी रुपये वसूल करण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार