शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

८७ धान मिलर्सविरुद्ध दहा वर्षांनंतर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 01:18 IST

आदिवासींकडून खरेदी केलेले धान भरड्यासाठी दिल्यानंतर लाखो क्विंटल तांदूळ आदिवासी विकास महामंडळास परत करण्यास तब्बल दहा वर्षे टाळाटाळ करणाऱ्या ८७ मिलर्सविरुद्ध महामंडळाने कारवाईचा बडगा उगारला असून, या संदर्भात ५१ मिलर्सविरुद्ध पोलिसात फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याबरोबरच ६३ कोटींपैकी ३२ कोटी रुपये वसूल करण्यास महामंडळाला यश आले आहे. आक्रमक झालेल्या महामंडळामुळे मिलर्सचे धाबे दणाणले आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या इतिहासात अशा प्रकारची कारवाई पहिल्यांदाच करण्यात आली आहे.

ठळक मुद्देआदिवासी विकास महामंडळ ३२ कोटींची वसुली; इतिहासात प्रथमच झाली कारवाई

नाशिक : आदिवासींकडून खरेदी केलेले धान भरड्यासाठी दिल्यानंतर लाखो क्विंटल तांदूळ आदिवासी विकास महामंडळास परत करण्यास तब्बल दहा वर्षे टाळाटाळ करणाऱ्या ८७ मिलर्सविरुद्ध महामंडळाने कारवाईचा बडगा उगारला असून, या संदर्भात ५१ मिलर्सविरुद्ध पोलिसात फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याबरोबरच ६३ कोटींपैकी ३२ कोटी रुपये वसूल करण्यास महामंडळाला यश आले आहे. आक्रमक झालेल्या महामंडळामुळे मिलर्सचे धाबे दणाणले आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या इतिहासात अशा प्रकारची कारवाई पहिल्यांदाच करण्यात आली आहे.आदिवासी विकास महामंडळामार्फत आदिवासींकडून दरवर्षी धान खरेदी केले जाते. जमा झालेले धान भरडण्यासाठी तांदूळ मिलर्सकडे दिले जाते. भरडल्यानंतर सदरचा तांदूळ मिलर्सने आदिवासी विकास महामंडळाला परत करणे अपेक्षित असते. हा तांदूळनंतर आदिवासी विकास विभागाकडून अन्नधान्य महामंडळाला व तेथून तो पुरवठा विभागाला पाठविला जातो. महामंडळाने खरेदी केलेली दोन लाख, ९५ हजार क्विंटल धान २००९ मध्ये विदर्भातील भंडारा, अहेरी, गडचिरोली येथील ८७ मिलर्सकडे भरडण्यासाठी दिली असता, त्यांनी भरडलेल्या धानापासून तयार झालेला तांदूळ आदिवासी विकास विभागाला परत केला नाही. सुमारे ६३ कोटी रुपये किमतीच्या या तांदळाच्या परतीसाठी महामंडळाने अनेक प्रयत्न करूनही मिलर्सने त्याला दाद दिली नाही. या संदर्भात झालेल्या लेखा परीक्षणात आदिवासी विकास मंडळावर ताशेरे ओढण्यात आले होते.४६ मिलर्सविरुद्ध वसुलीची कारवाई करण्यासाठी महामंडळाने थेट त्यांच्या मालमत्ता जप्तीची पावले उचलली असून, त्याबाबतचे पत्र त्या त्या जिल्हाधिकाºयांना देण्यात येऊन आरआरसी (रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट) तयार करण्यात आली आहे.आदिवासी विकास महामंडळाकडून आजवर पहिल्यांदाच अशा प्रकारची कारवाई करण्यात आल्याने राज्यातील मिलर्सचे धाबे दणाणले आहे.५१ मिलर्सविरुद्ध फौजदारी गुन्हेमहामंडळाचे महाव्यवस्थापक विनय गोसावी यांनी या बाबीची गंभीर दखल घेऊन ताळमेळ बैठका घेत थेट मिलर्सविरुद्ध कारवाईचा पवित्रा घेतला. सर्व मिलर्सना अगोदर नोटिसा बजावून त्यांचे म्हणणे जाणून घेण्यात आल्यावर ५१ मिलर्सविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला व तसे आदेश प्रादेशिक व्यवस्थापकांना देण्यात आले. त्यावरून शासकीय रकमेचा अपहार करणे, फसवणूक करणे अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले तर या कारवाईमुळे काही मिलर्सने पैसे भरण्याची तयारी दर्शविली, त्यातून ३२ कोटी रुपये वसूल करण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार