शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
2
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
3
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
4
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
5
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
6
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
7
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
8
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
9
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
10
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
11
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
12
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
13
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
14
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
15
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
16
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
17
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
18
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
19
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
20
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर

८३ तीव्र तर २५० मध्यम कुपोषित बालके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:19 IST

त्र्यंबकेश्वर : अंगणवाड्यांच्या दिशाहीन कारभारामुळे व पर्यवेक्षिकांच्या दुर्लक्षामुळे तालुक्यात कुपोषितांचे प्रमाण वाढत असून, असाच कारभार सुरू राहिला तर त्र्यंबक तालुक्याचे पालघर झाल्याशिवाय राहणार नाही. तालुक्यात वाढीस लागलेल्या कुपोषणाला आळा घालण्यात व त्यावर काम करणाऱ्या यंत्रणेला अद्याप यश आलेले नाही. तालुक्यात तीव्र कुपोषित बालके ८३, तर मध्यम कुपोषित बालके २५० असल्याने शासन यंत्रणा त्या सोबत या यंत्रणेतील प्रमुख घटक अंगणवाडी याबाबत गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे तालुक्यातील सरसकट चित्र आहे.

ठळक मुद्दे त्र्यंबकेश्वर : अंगणवाड्यांचा दिशाहीन कारभार पर्यवेक्षिकांचे दुर्लक्ष

वसंत तिवडे ।त्र्यंबकेश्वर : अंगणवाड्यांच्या दिशाहीन कारभारामुळे व पर्यवेक्षिकांच्या दुर्लक्षामुळे तालुक्यात कुपोषितांचे प्रमाण वाढत असून, असाच कारभार सुरू राहिला तर त्र्यंबक तालुक्याचे पालघर झाल्याशिवाय राहणार नाही. तालुक्यात वाढीस लागलेल्या कुपोषणाला आळा घालण्यात व त्यावर काम करणाऱ्या यंत्रणेला अद्याप यश आलेले नाही.तालुक्यात तीव्र कुपोषित बालके ८३, तर मध्यम कुपोषित बालके २५० असल्याने शासन यंत्रणा त्या सोबत या यंत्रणेतील प्रमुख घटक अंगणवाडी याबाबत गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे तालुक्यातील सरसकट चित्र आहे.तालुक्यात आयसीडीसीचे दोन प्रकल्प आहेत. त्र्यंबकेश्वर व हरसूल प्रकल्पात तीव्र कपोषित बालके ४३, तर मध्यम कुपोषित १२१ व हरसूल प्रकल्पात तीव्र कुपोषित ४०, तर मध्यम कुपोषित १२९ बालके आहेत. म्हणजेच तालुक्यात तीव्र कुपोषित बालके ८३, तर मध्यम कुपोषित बालके २५० आहेत. अर्थात प्रत्येक महिन्याला हे प्रमाण कमी अधिक होत असते हा भाग वेगळा !आदिवासी भागात व पेसा कायदा लागू असलेल्या अंगणवाड्या कधी चालू तर कधी बंद असल्याने बालके व गरोदर माता तसेच स्तनदा माता यांना पोषण आहार वेळेवर मिळत नसेल तर पोषण आहाराअभावी त्यांची वजने कमी होतील नाही तर काय होणार? पुरेसा आहार मिळत नसल्याने आहाराअभावी कमी वजनाच्या बालकांचे जन्माला येण्याचे प्रमाण वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. शासनाने आदिवासी भागात अमृत आहार योजना चालू केली. मात्र असंवेदनशील सुस्त यंत्रणा कागदोपत्री आहार देण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. कुपोषणाच्या या गंभीर प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टिकोन पाहता तालुक्यात अनेक ठिकाणी योजना फक्त कागदावरच व कम्प्युटर डाटामध्ये दिसूनयेतो. शासनाची प्रभावी अंमलबजावणी रखडलीतालुक्यात अंगणवाड्या वेळेवर न उघडणे, बालकांचा पोषण आहार कागदोपत्री दाखविणे व प्रत्यक्षात कमी प्रमाणात देणे तसेच अमृत आहाराचे नियोजनदेखील ढासळलेले दिसते. कारण आज दिला तर उद्या नाही अशा परिस्थितीवरून अंगणवाड्यांचा दिशाहीन कारभार व पर्यवेक्षिकांच्या कारभाराकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. कुपोषण निवारणाच्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी रखडल्याचे चिन्ह दिसत आहे. शासनाने आदिवासी भागात अमृत आहार योजना चालू केली. मात्र असंवेदनशील सुस्त यंत्रणा कागदोपत्री आहार देण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.