शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

८३ तीव्र तर २५० मध्यम कुपोषित बालके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:19 IST

त्र्यंबकेश्वर : अंगणवाड्यांच्या दिशाहीन कारभारामुळे व पर्यवेक्षिकांच्या दुर्लक्षामुळे तालुक्यात कुपोषितांचे प्रमाण वाढत असून, असाच कारभार सुरू राहिला तर त्र्यंबक तालुक्याचे पालघर झाल्याशिवाय राहणार नाही. तालुक्यात वाढीस लागलेल्या कुपोषणाला आळा घालण्यात व त्यावर काम करणाऱ्या यंत्रणेला अद्याप यश आलेले नाही. तालुक्यात तीव्र कुपोषित बालके ८३, तर मध्यम कुपोषित बालके २५० असल्याने शासन यंत्रणा त्या सोबत या यंत्रणेतील प्रमुख घटक अंगणवाडी याबाबत गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे तालुक्यातील सरसकट चित्र आहे.

ठळक मुद्दे त्र्यंबकेश्वर : अंगणवाड्यांचा दिशाहीन कारभार पर्यवेक्षिकांचे दुर्लक्ष

वसंत तिवडे ।त्र्यंबकेश्वर : अंगणवाड्यांच्या दिशाहीन कारभारामुळे व पर्यवेक्षिकांच्या दुर्लक्षामुळे तालुक्यात कुपोषितांचे प्रमाण वाढत असून, असाच कारभार सुरू राहिला तर त्र्यंबक तालुक्याचे पालघर झाल्याशिवाय राहणार नाही. तालुक्यात वाढीस लागलेल्या कुपोषणाला आळा घालण्यात व त्यावर काम करणाऱ्या यंत्रणेला अद्याप यश आलेले नाही.तालुक्यात तीव्र कुपोषित बालके ८३, तर मध्यम कुपोषित बालके २५० असल्याने शासन यंत्रणा त्या सोबत या यंत्रणेतील प्रमुख घटक अंगणवाडी याबाबत गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे तालुक्यातील सरसकट चित्र आहे.तालुक्यात आयसीडीसीचे दोन प्रकल्प आहेत. त्र्यंबकेश्वर व हरसूल प्रकल्पात तीव्र कपोषित बालके ४३, तर मध्यम कुपोषित १२१ व हरसूल प्रकल्पात तीव्र कुपोषित ४०, तर मध्यम कुपोषित १२९ बालके आहेत. म्हणजेच तालुक्यात तीव्र कुपोषित बालके ८३, तर मध्यम कुपोषित बालके २५० आहेत. अर्थात प्रत्येक महिन्याला हे प्रमाण कमी अधिक होत असते हा भाग वेगळा !आदिवासी भागात व पेसा कायदा लागू असलेल्या अंगणवाड्या कधी चालू तर कधी बंद असल्याने बालके व गरोदर माता तसेच स्तनदा माता यांना पोषण आहार वेळेवर मिळत नसेल तर पोषण आहाराअभावी त्यांची वजने कमी होतील नाही तर काय होणार? पुरेसा आहार मिळत नसल्याने आहाराअभावी कमी वजनाच्या बालकांचे जन्माला येण्याचे प्रमाण वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. शासनाने आदिवासी भागात अमृत आहार योजना चालू केली. मात्र असंवेदनशील सुस्त यंत्रणा कागदोपत्री आहार देण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. कुपोषणाच्या या गंभीर प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टिकोन पाहता तालुक्यात अनेक ठिकाणी योजना फक्त कागदावरच व कम्प्युटर डाटामध्ये दिसूनयेतो. शासनाची प्रभावी अंमलबजावणी रखडलीतालुक्यात अंगणवाड्या वेळेवर न उघडणे, बालकांचा पोषण आहार कागदोपत्री दाखविणे व प्रत्यक्षात कमी प्रमाणात देणे तसेच अमृत आहाराचे नियोजनदेखील ढासळलेले दिसते. कारण आज दिला तर उद्या नाही अशा परिस्थितीवरून अंगणवाड्यांचा दिशाहीन कारभार व पर्यवेक्षिकांच्या कारभाराकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. कुपोषण निवारणाच्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी रखडल्याचे चिन्ह दिसत आहे. शासनाने आदिवासी भागात अमृत आहार योजना चालू केली. मात्र असंवेदनशील सुस्त यंत्रणा कागदोपत्री आहार देण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.