शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

८३ तीव्र तर २५० मध्यम कुपोषित बालके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:19 IST

त्र्यंबकेश्वर : अंगणवाड्यांच्या दिशाहीन कारभारामुळे व पर्यवेक्षिकांच्या दुर्लक्षामुळे तालुक्यात कुपोषितांचे प्रमाण वाढत असून, असाच कारभार सुरू राहिला तर त्र्यंबक तालुक्याचे पालघर झाल्याशिवाय राहणार नाही. तालुक्यात वाढीस लागलेल्या कुपोषणाला आळा घालण्यात व त्यावर काम करणाऱ्या यंत्रणेला अद्याप यश आलेले नाही. तालुक्यात तीव्र कुपोषित बालके ८३, तर मध्यम कुपोषित बालके २५० असल्याने शासन यंत्रणा त्या सोबत या यंत्रणेतील प्रमुख घटक अंगणवाडी याबाबत गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे तालुक्यातील सरसकट चित्र आहे.

ठळक मुद्दे त्र्यंबकेश्वर : अंगणवाड्यांचा दिशाहीन कारभार पर्यवेक्षिकांचे दुर्लक्ष

वसंत तिवडे ।त्र्यंबकेश्वर : अंगणवाड्यांच्या दिशाहीन कारभारामुळे व पर्यवेक्षिकांच्या दुर्लक्षामुळे तालुक्यात कुपोषितांचे प्रमाण वाढत असून, असाच कारभार सुरू राहिला तर त्र्यंबक तालुक्याचे पालघर झाल्याशिवाय राहणार नाही. तालुक्यात वाढीस लागलेल्या कुपोषणाला आळा घालण्यात व त्यावर काम करणाऱ्या यंत्रणेला अद्याप यश आलेले नाही.तालुक्यात तीव्र कुपोषित बालके ८३, तर मध्यम कुपोषित बालके २५० असल्याने शासन यंत्रणा त्या सोबत या यंत्रणेतील प्रमुख घटक अंगणवाडी याबाबत गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे तालुक्यातील सरसकट चित्र आहे.तालुक्यात आयसीडीसीचे दोन प्रकल्प आहेत. त्र्यंबकेश्वर व हरसूल प्रकल्पात तीव्र कपोषित बालके ४३, तर मध्यम कुपोषित १२१ व हरसूल प्रकल्पात तीव्र कुपोषित ४०, तर मध्यम कुपोषित १२९ बालके आहेत. म्हणजेच तालुक्यात तीव्र कुपोषित बालके ८३, तर मध्यम कुपोषित बालके २५० आहेत. अर्थात प्रत्येक महिन्याला हे प्रमाण कमी अधिक होत असते हा भाग वेगळा !आदिवासी भागात व पेसा कायदा लागू असलेल्या अंगणवाड्या कधी चालू तर कधी बंद असल्याने बालके व गरोदर माता तसेच स्तनदा माता यांना पोषण आहार वेळेवर मिळत नसेल तर पोषण आहाराअभावी त्यांची वजने कमी होतील नाही तर काय होणार? पुरेसा आहार मिळत नसल्याने आहाराअभावी कमी वजनाच्या बालकांचे जन्माला येण्याचे प्रमाण वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. शासनाने आदिवासी भागात अमृत आहार योजना चालू केली. मात्र असंवेदनशील सुस्त यंत्रणा कागदोपत्री आहार देण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. कुपोषणाच्या या गंभीर प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टिकोन पाहता तालुक्यात अनेक ठिकाणी योजना फक्त कागदावरच व कम्प्युटर डाटामध्ये दिसूनयेतो. शासनाची प्रभावी अंमलबजावणी रखडलीतालुक्यात अंगणवाड्या वेळेवर न उघडणे, बालकांचा पोषण आहार कागदोपत्री दाखविणे व प्रत्यक्षात कमी प्रमाणात देणे तसेच अमृत आहाराचे नियोजनदेखील ढासळलेले दिसते. कारण आज दिला तर उद्या नाही अशा परिस्थितीवरून अंगणवाड्यांचा दिशाहीन कारभार व पर्यवेक्षिकांच्या कारभाराकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. कुपोषण निवारणाच्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी रखडल्याचे चिन्ह दिसत आहे. शासनाने आदिवासी भागात अमृत आहार योजना चालू केली. मात्र असंवेदनशील सुस्त यंत्रणा कागदोपत्री आहार देण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.