शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेशापासून ८२७ आदिवासी विद्यार्थी वंचित

By admin | Updated: September 12, 2016 00:36 IST

इंग्रजी माध्यमाच्या शाळा : विद्यार्थ्यांचे नुकसान, अपर आयुक्तांच्या पत्रामुळे पालक संतप्त

कळवण : इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेतील प्रवेशापासून कळवण, सुरगाणा, बागलाण, देवळा, मालेगाव, चांदवड व नांदगाव या सात तालुक्यांतील ८२७ आदिवासी विद्यार्थी वंचित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात असताना, अपर आयुक्तांच्या पत्रामुळे आदिवासी पालकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ न देता अन्य नामांकित शाळेत या आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी शासनस्तरावरु न उपाययोजना करावी, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याकडे केली आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कळवण अंतर्गत असलेल्या कळवण, सुरगाणा, सटाणा, मालेगाव, चांदवड, देवळा, नांदगाव या सात तालुक्यांतील आदिवासी मुलांना इयत्ता पहिली व पाचवीत इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाची संधी आदिवासी विकास विभागाने उपलब्ध करून दिली आहे. आदिवासी विकास विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे कळवण प्रकल्पातील ८२७ आदिवासी विद्यार्थी, विद्यार्थिनी आजही इंग्रजी माध्यम शाळेत प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. नामांकित इंग्रजी माध्यम शाळांचे शैक्षणिक सत्र सुरू होऊन तब्बल चार महिने झाले असून, अजूनही ८२७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नसल्याने आदिवासी विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. नाशिक येथील अपर आयुक्त कार्यालयाकडून नुकतेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाला पत्र प्राप्त झाले आहे. यात त्यांनी नामांकित शाळेत प्रवेश देण्यास असमर्थता दर्शविल्याने आदिवासी विकास विभागाचे वेळकाढू धोरण अन् दुर्लक्षामुळे आदिवासी बांधवांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.नाशिक, कोकमठाण, पुरणगाव, विठेवाडी येथील नामांकित इंग्रजी माध्यम शाळेत इयत्ता पहिली व पाचवीसाठी आदिवासी विकास विभागाने विद्यार्थ्यांना प्रवेश दिला असून, शैक्षणिक सत्र सुरू होऊन तब्बल चार महिन्याचा कालावधी होत आला आहे. पहिल्या शैक्षणिक सत्रातील कामकाज सुरू झाले असून, या नामांकित इंग्रजी माध्यम शाळेत ८२७ विद्यार्थी, विद्यार्थिनी प्रवेश मिळणार असल्याच्या अपेक्षेने या विद्यार्थ्यांनी कुठल्याही अन्य शाळेत प्रवेश घेतला नाही. अशा शेकडो विद्यार्थ्यांच्या पालकांना आदिवासी विकास विभाग शासनाने प्रवेशप्रक्रि या बंद केल्याचे यंत्रणा सांगत असल्याने पालकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील शिक्षण विभागाच्या यंत्रणेकडून आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांना योग्य सुचना व मार्गदर्शन न झाल्यामुळे व सापत्न वागणूक दिली गेल्याने ८२७ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला प्रकल्प कार्यालयातील शिक्षण विस्तार अधिकारी महाजन यांनाच जबाबदार धरावे अशी भूमिका पालकांनी घेतली आहे. कळवण तालुका आदिवासी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी. एम. गायकवाड, भाईदास महाले, भीमराव ठाकरे, मधुकर चौधरी, यशवंत गावित यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. (वार्ताहर)