शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

८० टक्के शेतकऱ्यांचा रेल्वे प्रकल्पास विरोध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 01:14 IST

नांदूरवैद्य : शासनाच्या विविध प्रकल्पांसाठी इगतपुरी तालुक्यातून आत्तापर्यंत ५४ हजार हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यात लष्कर, धरणे, महामार्ग, लोहमार्ग, औद्योगिक वसाहत, समृद्धी महामार्ग यांचा समावेश आहे. सद्य:स्थितीत इगतपुरी-मनमाड या प्रस्तावित रेल्वे मार्गाला तालुक्यातील ८० टक्के शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे.

ठळक मुद्दे काही शेतकरी ब्रिटिशकाळातच भूमिहीन झाले

इगतपुरी : आत्तापर्यंत ५४ हजार हेक्टर जमीन प्रकल्पांसाठी संपादित

 

लोकमत न्यूज नेटवर्कनांदूरवैद्य : शासनाच्या विविध प्रकल्पांसाठी इगतपुरी तालुक्यातून आत्तापर्यंत ५४ हजार हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यात लष्कर, धरणे, महामार्ग, लोहमार्ग, औद्योगिक वसाहत, समृद्धी महामार्ग यांचा समावेश आहे. सद्य:स्थितीत इगतपुरी-मनमाड या प्रस्तावित रेल्वे मार्गाला तालुक्यातील ८० टक्के शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे.इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, कुºहेगाव, गोंदे दुमाला, पाडळी देशमुख, मुकणे आदींसह विविध गावांतील शेकडो हेक्टर जमीन केंद्र सरकारच्या रेल्वे विभागामार्फत मालधक्का, लोकल लाइन, मनमाड-इगतपुरी नवीन रेल्वे लाइन आदी प्रकल्पांसाठी अधिग्रहित करण्यात आली असून, भूसंपादन प्रक्रिया काही दिवसातच सुरू होणार आहे.शेतकºयांना भूमिहीन करण्याचा शासनाचा घाट असल्याचा आरोपइगतपुरी तालुक्यातील जवळपास ९० टक्के जमिनींपैकी ५४ हजार हेक्टर जमिनी याआधीच शासनाने विविध प्रकल्पांसाठी संपादित केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एकीकडे शासनस्तरावर शेतकºयांसाठी विविध प्रकारच्या उपाययोजना अंमलात आणल्या जात असताना दुसरीकडे शासन शेतकºयांच्या जमिनी संपादित करून शेतकºयांना भूमिहीन करण्याचा घाट घालत असल्याचे शेतकºयांनी सांगितले. ब्रिटिशकाळात ज्यावेळी लोहमार्गासाठी शेतकºयांच्या जमिनी संपादित केल्या, त्यावेळी १९३९ ते १९५९ सालापर्यंत या जमिनी ब्रिटिश सरकारने भाडेतत्त्वावर घेतल्या होत्या. त्यानंतर १९५९ साली या जमिनी मूळ मालकांकडून अतिशय कमी दराने एक हजार ते बाराशे रुपये एकर या दराने कायमस्वरूपी खरेदी केल्याचे ज्येष्ठ शेतकºयांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यामध्ये काही शेतकरी ब्रिटिशकाळातच भूमिहीन झाले आहेत.लष्कराच्या गोळीबार प्रशिक्षणासाठीदेखील हजारो हेक्टर जमिनी याआधीच संपादित केल्या आहेत. यामुळेच आता पुन्हा नवीन रेल्वे प्रकल्पासाठी उर्वरित जमिनी शासन संपादित करत असल्यामुळे येथील शेतकºयांच्या पायाखालची जमीन सरकली असून, शेतकºयांनी या नवीन होणाºया प्रकल्पाला तीव्र विरोध केला आहे. जर मूळ मालकांकडून एखाद्या शासकीय प्रकल्पाला ८० टक्के प्रकल्पग्रस्तांचा विरोध असेल तर शासनाने जमिनी संपादितच करू नये असे यावेळी संतप्त शेतकºयांनी सांगितले. त्याचप्रमाणे हा प्रकल्प रद्द करण्यात यावा, याबाबत सर्व शेतकºयांच्या वतीने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार हिरामण खोसकर, तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देऊन मागणी केली आहे. 1959मध्ये जमिनीमूळ मालकांकडून प्रकल्पांसाठी कायमस्वरूपी खरेदीप्रकल्पग्रस्त शेतकºयांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला आहे. कारण याआधीच विविध प्रकल्पांसाठी ५४ हजार हेक्टर जमीन शासनाने संपादित केली असून, आता नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या रुंदीकरण व विद्युतीकरणासाठी पुन्हा जमिनी घेणार असल्याने येथील शेतकरी भूमिहीन होणार असल्यामुळे शेतकरी विरोध करत आहेत.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेigatpuri-acइगतपुरी