शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
3
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
4
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
5
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
6
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
7
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
8
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
9
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
10
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
11
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
12
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
13
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
14
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
15
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
16
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
17
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
18
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
19
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
20
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान

कळवणला गत सप्ताहात ७७,४३७ क्विंटल कांद्याची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:17 IST

चालू वर्षी कांद्याच्या उपलब्धतेवर परिणाम झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी साठवणुकीवर भर दिला. मात्र, आता आर्थिक गरज ओळखून शेतकरी कांदा ...

चालू वर्षी कांद्याच्या उपलब्धतेवर परिणाम झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी साठवणुकीवर भर दिला. मात्र, आता आर्थिक गरज ओळखून शेतकरी कांदा विक्री करत आहेत.

मालाच्या प्रतवारीनुसार दर मिळत असल्याने, शेतकरी कांदा विक्रीचा निर्णय घेत आहेत. एकीकडे अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसल्याने, काही कांदा चाळी खराब होत असल्याचे कांदा उत्पादक शेतकरी शरद देवरे यांनी सांगितले.

कांद्याची आवक जरी वाढत असली, तरी बाजारभावात थोडी-फारही भाव वाढ झालेली दिसून येत नाही. सरासरी १,५०० ते १,७०० रुपये भाव मिळाला. त्यामुळे कांद्याचे बाजारभाव सध्या तरी स्थिर राहणार, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

कळवण बाजार समितीमध्ये गत सप्ताहात कांद्याची ७७,४३८ क्विंटल आवक होती. त्यात सोमवारी १५,५९७ क्विंटल, मंगळवारी १६,५०५ क्विंटल, बुधवारी ७,१८३ क्विंटल, गुरुवारी १९,४१८ क्विंटल, शुक्रवारी १२,२३५ क्विंटल, शनिवारी ६,५०० क्विंटल आवक होती. कमीतकमी ३०० ते ५०० रुपये प्रति क्विंटल तर जास्तीतजास्त १,७६० ते १,९५५ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला असून, सरासरी १,५०० ते १,७०० क्विंटल भाव मिळाला.

कळवण बाजार समितीमध्ये कळवण (नाकोडा ) अभोणा व कनाशी उपआवारात चांगल्या कांद्याला चांगला दर मिळाला असला, तरी शेतकऱ्यांना यापेक्षा अधिक दर मिळण्याची अपेक्षा आहे. कांद्याचे दर वाढले पाहिजेत, अशी अपेक्षा कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आहे.

कांदा बियाणे टंचाई, बियाणे दरवाढ, कमी झालेले लागवड क्षेत्र, पुढे लागवडीच्या पश्चात अवकाळी पाऊस व गारपीट अशा प्रतिकूल परिस्थितीत कांद्याचे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आले.

परिणामी, नैसर्गिक आपत्तीमुळे गुणवत्ता व उत्पादकतेवर परिणाम झाला . त्यामुळे तालुक्यातही उत्पादन घटले.

त्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामकाज अडचणीत आले. अशा अडचणीच्या काळात आता केंद्र सरकारचे अस्थिर निर्यात धोरण, इंधन दरवाढ, कंटेनर भाडेवाढ यासह दक्षिण भारतातील कांदा उत्पादक पट्ट्यातून होणारी आवक अशा कारणांमुळे ऑगस्ट महिन्यात आवक कमी होऊनही कांदा दर स्थिर आहेत.

कांदा लावताना बीज प्रक्रिया करण्याचे आवाहन-

कांदा म्हटलं की, योग्य नियोजन कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी न केल्यास वांदे होतात. राष्ट्रीय बागवानी अनुसंशोधन केंद्राच्या वतीने पीकपद्धतीत केलेल्या संशोधनातून खरीप हंगामातील कांदा उत्पादन घेताना रोपवाटिकेचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन करण्याची गरज समोर आलीय. नियोजनासोबत बीज प्रक्रिया महत्त्वाची असून, यातून रोगाचा प्रादुर्भाव रोखता येऊन उत्पादन वाढविणे शक्य असल्याने, शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करूनच रोपे टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे.