शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

जिल्ह्यात ७० हजार नवमतदारांची नव्याने भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:48 IST

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये नवमतदारांसाठी राबविलेल्या मतदार नोंदणी मोहिमेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला असून, ७० हजारांहून अधिक मतदारांची नव्याने भर पडली आहे.

नाशिक : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये नवमतदारांसाठी राबविलेल्या मतदार नोंदणी मोहिमेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला असून, ७० हजारांहून अधिक मतदारांची नव्याने भर पडली आहे. आयोगाने दरवर्षाप्रमाणे सप्टेंबरपासून पुन्हा नियमित मतदार नोंदणीचा कार्यक्रमही घोषित केला आहे.या नवीन मतदार नोंदणीत नाशिक, मालेगाव, निफाड व चांदवड या चार तालुक्यांत सर्वाधिक नोंदणी करण्यात आली आहे. १ जूनपासून ही मोहीम सुरू करण्यात आली होती. सन २०११ मध्ये करण्यात आलेल्या जनगणनेनुसार जे नव मतदार जुलैमध्ये वयाची १८ वर्षे पूर्ण करतील त्यांची मतदार म्हणून नोंद करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले होते. नाशिक जिल्ह्यात अशा प्रकारची संख्या सुमारे दोन लाखांच्या आसपास असल्याने त्यादृष्टीने निवडणूक शाखेने नियोजन केले होते. त्यात प्रामुख्याने जून व जुलै महिन्यांत दहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या व पुढील शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांना सक्तीने मतदार करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाच्या प्राचार्यांना समन्वय म्हणून नेमण्यात आले होते व विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज घेतानाच मतदार नोंदणी अर्जही भरून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या याशिवाय नवमतदारांबरोबरच अन्य मतदारांनाही या नोंदणीत सहभागी होता यावे यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार दोन दिवस विशेष मोहीमही मतदान केंद्रनिहाय राबविण्यात आली होती, परंतु जून व जुलै महिन्यांत अनेक महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक प्रवेशाचा घोळ सुरू राहिल्याने मतदार नोंदणीत अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून निवडणूक आयोगाने आॅगस्टअखेरपर्यंत मुदत वाढवून दिली होती. ३१ आॅगस्टअखेर जिल्ह्णात ७० हजार ७३७ मतदारांची नोंदणी करण्यात आली असून, त्यात ३६,७६९ पुरुष व ३३,९६८ महिलांचा समावेश आहे. याशिवाय एकापेक्षा अधिक मतदारसंघात नाव असलेल्या ३४५० दुबार मतदारांनी नाव वगळण्यासाठी अर्ज सादर केले आहेत. नाव, पत्त्यात, लिंगात बदल असल्यास त्यात दुरुस्ती करणारे तसेच एका मतदारसंघातून दुसºया मतदारसंघात स्थलांतरित झालेल्या मतदारांचाही या माहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.