शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

कामगार उपायुक्त कार्यालयात ६९ टक्के पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 02:03 IST

सातपूर : असंघटित क्षेत्रातील कामगारांची वाढती संख्या, औद्योगिक वसाहतीतील वाढता कामगार कलह पाहता गेल्या अनेक वर्षांपासून कामगार उपायुक्त कार्यालयातील सरकारी कामगार अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे नाशिक विभागातील कामगारांच्या समस्या सुटण्यास अडचणी निर्माण होत असून, विभागात १३ पैकी ९ पदे म्हणजेच जवळपास ६९ टक्के सरकारी कामगार अधिकाºयांची पदे रिक्त आहेत.

ठळक मुद्देतारेवरची कसरत : कामगारांचे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित

सातपूर : असंघटित क्षेत्रातील कामगारांची वाढती संख्या, औद्योगिक वसाहतीतील वाढता कामगार कलह पाहता गेल्या अनेक वर्षांपासून कामगार उपायुक्त कार्यालयातील सरकारी कामगार अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे नाशिक विभागातील कामगारांच्या समस्या सुटण्यास अडचणी निर्माण होत असून, विभागात १३ पैकी ९ पदे म्हणजेच जवळपास ६९ टक्के सरकारी कामगार अधिकाºयांची पदे रिक्त आहेत.नाशिक विभागातील अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांचे कामगार उपायुक्त कार्यालयाचे कामकाज नाशिक येथून चालते. नाशिक कार्यालयासाठी एक कामगार उपायुक्त, दोन सहायक कामगार आयुक्त, जळगाव, धुळे, नंदुरबारसाठी एक सहायक कामगार आयुक्त अशी अधिकाºयांची मंजूर पदे आहेत. त्यात गेल्या चार वर्षांपासून जळगावसाठीचे सहायक कामगार आयुक्त हे पद रिक्त आहे. त्यामुळे नाशिक कार्यालयातील अधिकाºयावर अतिरिक्त जबाबदारी दिली जाते. त्यामुळे साहजिकच कामाचा आणि वादविवादाच्या अनेक प्रकरणांचा निपटारा करण्यास अडचणी निर्माण होत आहे. रिक्त असलेल्या अधिकाºयाची अतिरिक्त जबाबदारी आणि स्वत:ची जबाबदारी पार पाडताना संबंधित अधिकारी नाकीनव येत असून, जळगाव आणि नाशिकची जबाबदारी पेलताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.त्याचबरोबर नाशिक विभागासाठी सरकारी कामगार अधिकाºयांची १३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी नऊ पदे रिक्त आहेत. म्हणजेच ६९ टक्के जागा रिक्त आहेत. नाशिक कार्यालयात सहा पदे मंजूर असून, प्रत्यक्षात फक्त २ अधिकारी काम करीत आहेत. उर्वरित चार पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत.अहमदनगरसाठी ५ पदे मंजूर असून तेथेही दोन अधिकारी कामाचा गाडा ओढत आहेत. धुळे जिल्ह्यासाठी १ अधिकारी मंजूर असला तरी तिही जागा रिक्तच आहे. जळगाव जिल्ह्यासाठी एक सरकारी कामगार अधिकारी मंजूर असला तरी ते अधिकारी गेल्या अनेक दिवसांपासून रजेवर आहेत. म्हणजेच १३ सरकारी कामगार अधिकाºयांची कामे चार अधिकाºयांना करावी लागत आहेत.न्याय मिळण्यास अडचणीनाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांतील औद्योगिक क्षेत्रात शांतता अबाधित ठेवण्याबरोबरच कामगार कलह मिटविण्यासाठी कामगार उपायुक्त कार्यालयाची भूमिका महत्त्वाची ठरत असते. त्यात आता असंघटित क्षेत्र वाढत असल्याने त्यांच्या समस्या आणि वाददेखील वाढत आहेत. शिवाय आता इमारत बांधकाम कामगार, घरेलू महिला कामगार, माथाडी बोर्ड, सुरक्षा रक्षक बोर्ड यांसह इतर क्षेत्रांची जबाबदारी कामगार उपायुक्त कार्यालयावर सोपविण्यात आली आहे. रिक्त पदांमुळे कामगारांना वेळीच न्याय मिळण्यास अडचणी येत आहेत.

टॅग्स :Governmentसरकार