शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

कामगार उपायुक्त कार्यालयात ६९ टक्के पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 02:03 IST

सातपूर : असंघटित क्षेत्रातील कामगारांची वाढती संख्या, औद्योगिक वसाहतीतील वाढता कामगार कलह पाहता गेल्या अनेक वर्षांपासून कामगार उपायुक्त कार्यालयातील सरकारी कामगार अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे नाशिक विभागातील कामगारांच्या समस्या सुटण्यास अडचणी निर्माण होत असून, विभागात १३ पैकी ९ पदे म्हणजेच जवळपास ६९ टक्के सरकारी कामगार अधिकाºयांची पदे रिक्त आहेत.

ठळक मुद्देतारेवरची कसरत : कामगारांचे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित

सातपूर : असंघटित क्षेत्रातील कामगारांची वाढती संख्या, औद्योगिक वसाहतीतील वाढता कामगार कलह पाहता गेल्या अनेक वर्षांपासून कामगार उपायुक्त कार्यालयातील सरकारी कामगार अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे नाशिक विभागातील कामगारांच्या समस्या सुटण्यास अडचणी निर्माण होत असून, विभागात १३ पैकी ९ पदे म्हणजेच जवळपास ६९ टक्के सरकारी कामगार अधिकाºयांची पदे रिक्त आहेत.नाशिक विभागातील अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांचे कामगार उपायुक्त कार्यालयाचे कामकाज नाशिक येथून चालते. नाशिक कार्यालयासाठी एक कामगार उपायुक्त, दोन सहायक कामगार आयुक्त, जळगाव, धुळे, नंदुरबारसाठी एक सहायक कामगार आयुक्त अशी अधिकाºयांची मंजूर पदे आहेत. त्यात गेल्या चार वर्षांपासून जळगावसाठीचे सहायक कामगार आयुक्त हे पद रिक्त आहे. त्यामुळे नाशिक कार्यालयातील अधिकाºयावर अतिरिक्त जबाबदारी दिली जाते. त्यामुळे साहजिकच कामाचा आणि वादविवादाच्या अनेक प्रकरणांचा निपटारा करण्यास अडचणी निर्माण होत आहे. रिक्त असलेल्या अधिकाºयाची अतिरिक्त जबाबदारी आणि स्वत:ची जबाबदारी पार पाडताना संबंधित अधिकारी नाकीनव येत असून, जळगाव आणि नाशिकची जबाबदारी पेलताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.त्याचबरोबर नाशिक विभागासाठी सरकारी कामगार अधिकाºयांची १३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी नऊ पदे रिक्त आहेत. म्हणजेच ६९ टक्के जागा रिक्त आहेत. नाशिक कार्यालयात सहा पदे मंजूर असून, प्रत्यक्षात फक्त २ अधिकारी काम करीत आहेत. उर्वरित चार पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत.अहमदनगरसाठी ५ पदे मंजूर असून तेथेही दोन अधिकारी कामाचा गाडा ओढत आहेत. धुळे जिल्ह्यासाठी १ अधिकारी मंजूर असला तरी तिही जागा रिक्तच आहे. जळगाव जिल्ह्यासाठी एक सरकारी कामगार अधिकारी मंजूर असला तरी ते अधिकारी गेल्या अनेक दिवसांपासून रजेवर आहेत. म्हणजेच १३ सरकारी कामगार अधिकाºयांची कामे चार अधिकाºयांना करावी लागत आहेत.न्याय मिळण्यास अडचणीनाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांतील औद्योगिक क्षेत्रात शांतता अबाधित ठेवण्याबरोबरच कामगार कलह मिटविण्यासाठी कामगार उपायुक्त कार्यालयाची भूमिका महत्त्वाची ठरत असते. त्यात आता असंघटित क्षेत्र वाढत असल्याने त्यांच्या समस्या आणि वाददेखील वाढत आहेत. शिवाय आता इमारत बांधकाम कामगार, घरेलू महिला कामगार, माथाडी बोर्ड, सुरक्षा रक्षक बोर्ड यांसह इतर क्षेत्रांची जबाबदारी कामगार उपायुक्त कार्यालयावर सोपविण्यात आली आहे. रिक्त पदांमुळे कामगारांना वेळीच न्याय मिळण्यास अडचणी येत आहेत.

टॅग्स :Governmentसरकार