शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

६६४ उमेदवारी अर्ज दाखल

By admin | Updated: April 4, 2016 00:20 IST

६६४ उमेदवारी अर्ज दाखल

 पेठ : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उत्साहपेठ : तालुक्यातील पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत ३६ ग्रामपंचायतींच्या २९६ जागांसाठी ६६४ उमेदवारांनी नामनिर्देशपत्र दाखल केले असून, त्यापैकी सावळघाट, मांगोणे, म्हसगण, गोंदे या ग्रामपंचायती बिनविरोध होणार असल्याचे चित्र आहे. अनेक ग्रामपंचायतींच्या काही प्रभागात दुरंगी व तिरंगी सामन्याचे चित्र पाहावयास मिळत असले तरीही छाननी व माघारीनंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींपैकी काही ग्रामपंचायतींमध्ये असलेल्या जागांसाठी तितक्याच उमेदवारांनी नामनिर्देशपत्र दाखल केले असल्याने त्या बिनविरोध बिनविरोध होण्याचे संकेत आहे. गावनिहाय दाखल झालेले उमेदवारी अर्ज पुढीलप्रमाणे-कुंभारबारी- ७ जागांसाठी १६ नामनिर्देशपत्र, भुवन- ९ जागांसाठी १९, आडगाव भु.- ९ जागांसाठी १६, धोंडमाळ- ११ जागांसाठी २ , शिवशेत- ७ जागांसाठी १९, सावळघाट- ७ जागांसाठी ८, जांबविहीर- ७ जागांसाठी १४, कायरे- ९ जागांसाठी १६, कुंभाळे- ९ जागांसाठी २६, वांगणी- ७ जागांसाठी २१, करंजाळी- ९ जागांसाठी २५, कोहोर- ११ जागांसाठी ३३, कोपुर्ली खुर्द- ७ जागांसाठी २३, मांगोणे- ७ जागांसाठी ७, पाटे- ९ जागांसाठी २४, कापुर्णे- ९ जागांसाठी १२, म्हसगण- ९ जागांसाठी ९, डोल्हारमाळ- ७ जागांसाठी ११, राजबारी- ९ जागांसाठी १६, खोकरतळे- ७ जागांसाठी २, आड बुद्रूक- ७ जागांसाठी १६, कोटंबी क.- ७ जागांसाठी १५, कोपुर्ली बुदू्रक- ९ जागांसाठी २२, उंबरपाडा क.- ७ जागांसाठी १८, कळमबारी- ७ जागांसाठी १५, करंजखेड- ९ जागांसाठी २०, भायगाव- ७ जागांसाठी १६, देवगाव- ७ जागांसाठी १६, गोंदे- ७ जागांसाठी ८, आंबे- ९ जागांसाठी २०, पाहुचीबारी- ९ जागांसाठी १७, जोगमोडी- ९ जागांसाठी २४, बोरवट- ७ जागांसाठी १९, माळेगाव- ९ जागांसाठी २७ असे नामनिर्देशपत्र दाखल झाले असून, त्यापैकी छाननी व माघारीनंतर म्हसगण, सावळघाट, मांगोणे, गोंदे या ग्रामपंचायती बिनविरोध होणार असल्याचे बोबले जात आहे. ग्रामसेवकांनी दिलेल्या शौचालय वापर दाखल्यावरील होय/नाही यापैकी कोणत्याही पर्यायावर काट न मारल्याने अनेक उमेदवारांची उमेदवारी धोक्यात आली असल्याचे चित्र आहे. (वार्ताहर )ंदुष्काळामुळे द्राक्षबागा संकटातनिफाड : तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने भयाण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे तालुक्यातील डाळींब व द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. परिणामी शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला असून, बागा कशा जगवाव्यात हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. यंदा सर्वच जलस्रोत कोरडेठाक पडल्याने बागांना पाणी नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. पिण्यासाठीच पाणी उपलब्ध होत नसल्याने पिकांना व पशुधनास कुठून आणावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. काही भांडवलदार शेतकऱ्यांचा १००/१५० किमी अंतरावरून टॅँकरने पाणी आणून बागा जगविण्याचा आटापिटा सुरू आहे. (प्रतिनिधी)