शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

६६० मेगावॉट प्रकल्प रखडला

By admin | Updated: November 29, 2015 22:51 IST

इच्छाशक्तीचा अभाव : अनुकूल वातावरण, पाण्याची उपलब्धता असतानाही दिरंगाई

योगेश मानकर,सामनगावमराठवाड्यात पाण्याचा प्रश्न गंभीर असताना केवळ प्रभावी नेतृत्वाच्या जोरावर आतापर्यंत त्याठिकाणी विजेचे आठ संच तयार झालेले आहेत. मात्र पाण्याची उपलब्धता असतानाही नाशिकच्या एकलहरे येथील ६६० मेगावॉट प्रकल्पाबाबत शासनाकडून चालढकल सुरू असून, राजकीय इच्छाशक्ती आणि प्राबल्य नसल्याने हा प्रकल्प गुंडाळला जाण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. पाण्याची समस्या असतानाही भुसावळ येथील बंद केलेला संच क्रमांक दोन पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आला आहे. तर एकलहरे येथे प्रस्तावित असलेल्या ६६० मेगावॉटच्या प्रकल्पाचे घोडे अजूनही अडलेलेच आहे. निर्मितीचे अनेक रेकॉर्ड रचणाऱ्या या वीज केंद्राला फक्त राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने विलंब होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. राज्यात सर्व औष्णिक वीज केंद्रांमध्ये नाशिक औष्णिक वीजनिर्मिती केंद्राने २०१५ पर्यंत वीज निर्मितीत सातत्य ठेवत अनेक विक्रम व बचत करीत उद्दिष्ट साध्य करण्यात बाजी मारली आहे. या ठिकाणी ३५ वर्षे जुने वीजनिर्मिती संच आहेत. ते केव्हाही बंद करण्याची सूचना येऊ शकते त्यामुळे ६६० प्रकल्पाला चालना मिळणे अपेक्षित आहे. २०१० पासून मंजुरी मिळालेल्या बदली संचच्या कामाला अद्यापपावेतो सुरुवात होत नाही? पाच वर्ष उलटूनही राजकीय इच्छाशक्ती जागृत का होत नाही? असे प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केले आहे. एकलहरे वीज केंद्राने देशपातळीवर आपली गुणवत्ता सिद्ध केलेली असताना येथील संच पुढे नूतनीकरण करून कार्यान्वित ठेवण्यासाठी विचार का केला जात नाही. वीज महाग पडते या एकमेव कारणावरून गेल्या दोन-चार वर्षांपासून या वीज केंद्राला बंद करण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. कुठलाही कारखाना सुस्थितीत चालण्यासाठी त्याला लागणारे इंधन व पाणी हे चांगले मिळाले तर उत्तम काम करते. येथे उलट परिस्थिती आहे. दूषित पाणी व खराब कोळसा यांच्याद्वारे उचांकी वीजनिर्मिती केली जात आहे. प्रत्येक संचाचे ओव्हरआॅयलिंग दरवर्षी केले जाते ते काम दोन-तीन वर्ष होत नाही तर मग ही निर्मिती महागच पडणार. या बाबींचा विचार होणे गरजेचे असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पाच वर्षांपासून बदली संचाचे काम तसूभरही पुढे सरकले नसल्याने जिल्ह्याचा नावलौकिक वाढविणारे एकलहरे औष्णिक वीज केंद्र केवळ शासनाची इच्छाशक्ती नसल्याने थांबले आहे. येथील वातावरण, भौगोलिक परिस्थिती वीज कामगार, अधिकाऱ्यांचे कौशल्य, संचासाठी लागणारी जागा, पाणी, रेल्वे मार्ग सर्व सुविधा उपलब्ध असताना दिरंगाई का केली जात आहे, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

शासनाकडून निराशाजनक प्रतिसादभुसावळ येथील बंद केलेले संच तेथील खंबीर लोकप्रतिनिधींमुळे सुरू झाले आहेत, तर येथील उत्तम रीतीने चाललेले संच बंद पाडण्याचे कारस्थान सुरू असून, प्रस्तावित संच रखडलेल्या अवस्थेत आहे. या सार्‍या वेळकाढू धोरणाचा वेगळा अर्थ लावला जात आहे. या प्रकल्पाच्या कामात चिमणीच्या उंचीचा अडसर येत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी गेल्या सोमवारी  ऊर्जा मंत्र्यांच्या दालनात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, सरपंच शंकर धनवटे, नवृत्ती चाफळकर, विजय जगताप, विशाल संगमनेरे, शेखर आहेर यांच्यात बैठकीदरम्यान चर्चा झाली. मात्र मंत्री महोदयांकडून या प्रकल्पाबद्दल निराशाजनक प्रतिसाद मिळाल्याचे या लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे.