शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

६३८ लाभार्थींपुढे मनपा हतबल

By admin | Updated: September 10, 2016 01:02 IST

स्वच्छ भारत अभियान : शौचालय उभारणीत टाळाटाळ

 नाशिक : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेमार्फत ७२९४ लाभार्थींना शौचालय उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आखण्यात आले आहे. आतापर्यंत ४४०६ शौचालयांची उभारणी झाली आहे, मात्र ६३८ लाभार्थींनी महापालिकेला पुरते जेरीस आणले आहे. सदर लाभार्थी अनुदानाचे पैसेही परत करत नाहीत आणि शौचालयही उभारत नाहीत, अशी स्थिती आहे. महापालिकेमार्फत शौचालय उभारणीचे काम सुरू आहे. आतापर्यंत ७२६४ लाभार्थींपैकी ४४०६ लाभार्थींनी शौचालय उभारले आहे. ११०५ लाभार्थींकडून शौचालय उभारणीचे काम सुरू आहे. वैयक्तिक शौचालयासाठी प्रतीलाभार्थी १२ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. पहिला हप्ता सहा हजार रुपयांचा अदा केला जातो. शौचालय उभारल्यानंतर उर्वरित सहा हजारांचे अनुदान लाभार्थींच्या बॅँक खात्यात जमा केले जाते. त्यानुसार आतापर्यंत ६६६३ लाभार्थींच्या बॅँक खात्यात अनुदान जमा झालेले आहे. काही लाभार्थींकडे शौचालय उभारण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने ३०२ लाभार्थींनी पैसे महापालिकेला परत केले आहेत; मात्र ६३८ लाभार्थींच्या बॅँक खात्यात पहिला हप्ता जमा करूनही त्यांनी शौचालय उभारणीस प्रतिसाद दिलेला नाही आणि पैसेही परत केले नसल्याने त्यांच्याकडून वसुली कशी करावी, याबाबत महापालिकेचे अधिकारी हतबल झाले आहेत. सदर लाभार्थींना शौचालयांचे महत्त्व पटवून देण्यासाठी महापालिकेने स्वयंसेवी संस्थांचीही मदत घेण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु त्यालाही दाद देत नसल्याने मनपा पेचात सापडली आहे. (प्रतिनिधी)