शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

६२४ विद्यार्थ्यांना काही शाळांनी प्रवेश नाकारला

By admin | Updated: May 6, 2015 01:37 IST

६२४ विद्यार्थ्यांना काही शाळांनी प्रवेश नाकारला

नाशिक : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिक दुर्बल घटकातील वंचित विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेत पात्र असूनही ६२४ विद्यार्थ्यांना काही शाळांनी प्रवेश नाकारला असल्याचे निदर्शनास आले असून, अशा शाळासंबंधीचा अहवाल पुढील कारवाईसाठी शासनाकडे पाठविला जाणार आहे. या प्रवेशप्रक्रियेच्या माध्यमातून काही खासगी शाळांची मुजोरी समोर आली आहे. शासनाने शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात सामील करून घेण्यासाठी एकूण प्रवेशक्षमतेच्या २५ टक्के प्रवेशप्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने राबविली होती. महापालिका शिक्षण मंडळामार्फत शहरातील १०१ शाळांमध्ये ही प्रक्रिया राबविण्यात आली. सदर विद्यार्थ्यांना प्रवेश देताना संबंधित शाळांनी त्यांच्याकडून कोणतेही शुल्क घ्यायचे नाही, असे बंधनकारक करण्यात आले होते. प्रवेश दिलेल्या संबंधित विद्यार्थ्यांचे पहिली ते आठवीपर्यंतचे शुल्क स्वत: शासन अदा करणार आहे. त्यामुळे खासगी शाळांकडून त्याला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, अनेक शाळांनी या प्रवेशप्रक्रियेस विरोध दर्शवित अडचणींचे कारण पुढे करत विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले. शिक्षण मंडळाच्या प्रभारी प्रशासनाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांनी सदर प्रवेशप्रक्रियेसाठी दोनदा मुदतवाढही दिली होती. २ मे रोजी अंतिम मुदत संपल्यानंतर एकूण १७११ पैकी केवळ ५१६ विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळाला असून, ६२४ पात्र विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कारणास्तव संबंधित शाळांनी प्रवेश नाकारला आहे. २१२ विद्यार्थ्यांचे पालक संबंधित शाळांपर्यंत जाऊन पोहोचलेच नाहीत, तर ३५९ विद्यार्थ्यांसंबंधी काही तांत्रिक अडचणी असल्याचे सांगण्यात आले. आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेसाठी शहरातून १२९० विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले होते. शिक्षण मंडळाकडून पात्र विद्यार्थ्यांची यादी संबंधित शाळांना पाठविण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी प्रवेश द्यायचे होते; परंतु अनेक शाळांनी वेगवेगळ्या तांत्रिक अडचणी सांगत ६२४ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संबंधित शाळांची मुजोरी समोर आली असून, समाजातील वंचित घटकांबद्दल त्यांचे असलेले उत्तरदायित्वही त्यांनी नाकारल्याने संतापाची भावना पालकवर्गात आहे. (प्रतिनिधी)