शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
7
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
8
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
9
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
11
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
12
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
13
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
14
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
15
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
16
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
17
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
18
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
19
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
20
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!

७५० एकरवरील डाळींब बागा धोक्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 14:12 IST

पाटोदा (गोरख घुसळे ) : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांमागे लागलेली संकटांची मालिका सुरूच आहे. आक्टोबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसाच्या थैमानाने पाटोदा परिसरातील सुमारे साडेसातशे एकर डाळिंब बागा बाधित झाल्याने धोक्यात आल्या आहे. त्यामुळे डाळिंब बागांसाठी केलेला लाखो रूपयांचा खर्च पाण्यात गेला आहे.

ठळक मुद्देलाखोंचा फटका, अवकाळीचा झटका : येवला तालुक्यातील शेतकरी हवालदिल

पाटोदा (गोरख घुसळे ) : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांमागे लागलेली संकटांची मालिका सुरूच आहे. आक्टोबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसाच्या थैमानाने पाटोदा परिसरातील सुमारे साडेसातशे एकर डाळिंब बागा बाधित झाल्याने धोक्यात आल्या आहे. त्यामुळे डाळिंब बागांसाठी केलेला लाखो रूपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी हतबल झाला असून शासनाने भरीव मदत करावी अशी शेतकऱ्यांनी केली आहे.येवला तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून फळबाग पिकाकडे वळल्याने डाळिंब व द्राक्ष बागांच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झालेली आहे. पाटोदा कृषी मंडळात सुमारे साडेसातशे एकर डाळिंब बागा आहेत. मात्र परतीच्या पावसाने डाळिंब बागांना मोठा फटका बसला आहे. बहार धरलेल्या डाळिंब बागांची मोठया प्रमाणात फुलगळ, फळगळ, फळकुज व फळ तडकण्याच्या समस्येत वाढ झालेली आहे. तर सेटिंग झालेल्या बागेवर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सध्या तर दुपारी ऊन आणि पहाटे थंडी व धुके अशा लहरी हवामानामुळे डाळिंबावर रोगराई वाढल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.त्यामुळे बागा जगविण्यासाठी सकाळ संध्याकाळ महागडी औषधे फवारणी करावी लागत असल्याने आर्थिक गणित कोलमडून पडले असून शेतकरी कर्जबाजारी होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक