शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

७५० एकरवरील डाळींब बागा धोक्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 14:12 IST

पाटोदा (गोरख घुसळे ) : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांमागे लागलेली संकटांची मालिका सुरूच आहे. आक्टोबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसाच्या थैमानाने पाटोदा परिसरातील सुमारे साडेसातशे एकर डाळिंब बागा बाधित झाल्याने धोक्यात आल्या आहे. त्यामुळे डाळिंब बागांसाठी केलेला लाखो रूपयांचा खर्च पाण्यात गेला आहे.

ठळक मुद्देलाखोंचा फटका, अवकाळीचा झटका : येवला तालुक्यातील शेतकरी हवालदिल

पाटोदा (गोरख घुसळे ) : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांमागे लागलेली संकटांची मालिका सुरूच आहे. आक्टोबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसाच्या थैमानाने पाटोदा परिसरातील सुमारे साडेसातशे एकर डाळिंब बागा बाधित झाल्याने धोक्यात आल्या आहे. त्यामुळे डाळिंब बागांसाठी केलेला लाखो रूपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी हतबल झाला असून शासनाने भरीव मदत करावी अशी शेतकऱ्यांनी केली आहे.येवला तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून फळबाग पिकाकडे वळल्याने डाळिंब व द्राक्ष बागांच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झालेली आहे. पाटोदा कृषी मंडळात सुमारे साडेसातशे एकर डाळिंब बागा आहेत. मात्र परतीच्या पावसाने डाळिंब बागांना मोठा फटका बसला आहे. बहार धरलेल्या डाळिंब बागांची मोठया प्रमाणात फुलगळ, फळगळ, फळकुज व फळ तडकण्याच्या समस्येत वाढ झालेली आहे. तर सेटिंग झालेल्या बागेवर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सध्या तर दुपारी ऊन आणि पहाटे थंडी व धुके अशा लहरी हवामानामुळे डाळिंबावर रोगराई वाढल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.त्यामुळे बागा जगविण्यासाठी सकाळ संध्याकाळ महागडी औषधे फवारणी करावी लागत असल्याने आर्थिक गणित कोलमडून पडले असून शेतकरी कर्जबाजारी होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक