शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

५६ शिक्षकांचे बेकायदा अडवले पगार

By admin | Updated: July 30, 2016 01:41 IST

शिक्षण मंडळ : माजी प्रशासन अधिकाऱ्याची करामत

 नाशिक : शासनाने शिक्षक मान्यतेप्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर महापालिका शिक्षण मंडळाचे माजी प्रशासनाधिकारी उमेश डोंगरे यांनी शहरातील ५६ प्राथमिक शिक्षकांचे वेतनच सहा महिन्यांपासून बंद केले आहे. विशेष म्हणजे, यासंदर्भात माहितीच्या अधिकारात चौकशी केल्यानंतर राज्य शासनाचे असे कोणतेही निर्देश नसल्याचे नव्या प्रशासन अधिकाऱ्यांनी मान्य केले असून, त्यामुळे आता या शिक्षकांना वेतन मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिक्षण मंडळाचे माजी प्रशासन अधिकारी उमेश डोंगरे यांनी गेल्या जानेवारीपासून या शिक्षकांचे वेतन देणे बंद केले होते. राज्यात २०१२ मध्ये ज्या शिक्षकांना मान्यता देण्यात आली, त्यात अनियमितता असल्याचा शासनाचा दावा असून त्या अनुषंगाने राज्यभरातील मान्यता देणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. हाच संदर्भ घेऊन डोंगरे यांनी या शिक्षकांचे वेतन बंद केले. विशेष म्हणजे काही शिक्षकांची मान्यता २०११ या वर्षातील असताना त्यांचेही वेतन बंद केले होते. संबंधित शिक्षकांनी डोंगरे यांच्याशी संपर्क साधला असता वरिष्ठांचे आदेश असल्याचे ते सांगत होते. परंतु लेखी आदेश देत नव्हते. यासंदर्भात निर्भय फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज पिंगळे यांनी माहितीच्या अधिकारात शिक्षण मंडळाला पत्र देऊन वेतन बंद करण्याच्या आदेशाची प्रत मागितली. मात्र, आदेशाची प्रत न देता शासनाचे भलतेच चौकशीचे आदेश आणि शासन निर्णय मंडळाने पाठवून दिले. त्यामुळे थेट प्रशासन अधिकाऱ्यांकडेच पिंगळे यांनी अपील केले. नूतन प्रशासन अधिकारी नितीन उपासनी यांनी अपिलात त्यावर सुनावणी घेऊन शिक्षकांचे वेतन थांबविण्याचे कोणतेही आदेश नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ५६ शिक्षकांचे वेतन बेकायदेशीररीत्या थांबविल्याचे स्पष्ट झाले आहे. वेतन बंद करणे ही शासकीय सेवेतील सर्वात मोठी शिक्षा मानली जाते. असे करण्यापूर्वी संबंधित कर्मचाऱ्यांना नोटीसही दिली जाते. अगदी निलंबित कर्मचाऱ्यांनाही शासन निम्मे वेतन देत असताना शिक्षणाधिकाऱ्यांवरील चौकशीमुळे या कर्मचाऱ्यांनाच वेठीस धरण्याचा प्रयत्न झाल्याचे पिंगळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)