शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

सनातन धर्माच्या प्रसारासाठी नाशिकसह स्थापणार ५१ मठ

By admin | Updated: September 10, 2015 00:13 IST

संतसंमेलन : शंकराचार्य अधोक्षजानंद यांची घोषणा

पंचवटी : अध्यात्मिक संपदा कोणाला कमजोर करण्यासाठी, तसेच छळण्यासाठी नव्हे तर सर्वांना शक्तिशाली बनविण्यासाठी आहे. भारतीय संस्कृती टिकविण्याची जबाबदारी सर्वांचीच असून, सनातन धर्माच्या प्रचारासाठी नाशिकसह ५१ शंकराचार्य मठ स्थापन करणार आहे, असे प्रतिपादन जगद्गुरू शंकराचार्य अधोक्षजानंद महाराज यांनी केले.शंकराचार्य मठात धार्मिक आणि सामाजिक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी संतसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अरुणाचलचे माजी मुख्यमंत्री गेगांग अपांग, झेंडाबाबा, भागवताचार्य अनुरागकृष्णशास्त्री आदिंसह मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना शंकराचार्य अधोक्षजानंद यांनी पुढे असे सांगितले की, देशात अराजकता व भयावह परिस्थिती उदभवू नये यासाठी नागरिकांनी आपल्या कर्तव्याचे पालन करावे. सनातन धर्माचा प्रचार केल्यास भारतीय संस्कृती टिकून राहील आणि यासाठीच नाशिकमध्ये १ तर आसाम, अरुणाचल, मेघालय, मिझोराम या राज्यांच्या सीमारेषेवर १५, जम्मू-काश्मीरमध्ये १0 आणि उर्वरित पंजाब, गुजरात, राजस्थान व पाकिस्तानच्या सीमारेषेवर १६ व अन्य राज्य मिळून जवळपास ५१ शंकराचार्य मठाच्या शाखा स्थापन करून संस्कार निर्मितीसाठी शिक्षण, अध्यात्माच्या माध्यमातून नवीन पिढी घडविणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.या संतसंमेलनाला बिहार काँग्रेसचे माजी अध्यक्ष अनिलकुमार शर्मा, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर, माजी नगरसेवक लक्ष्मण मंडाले, सरदारसिंग गुरुजी आदिंसह साधू-महंत व भाविक उपस्थित होते. (वार्ताहर)