शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर
2
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
3
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
4
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
5
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
6
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
7
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
8
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
9
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
10
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
12
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
13
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
14
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
15
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
16
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
17
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
18
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
19
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
20
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले

५० खालसेच उरले मुक्कामी

By admin | Updated: September 22, 2015 00:05 IST

५० खालसेच उरले मुक्कामी

नाशिक : साधुग्राममध्ये तिसऱ्या पर्वणीनंतर बहुतांश खालशांनी बस्तान गुंडाळले आहे. पावसामुळे खालशांमध्ये पाणी साचल्याने निवासाची परिस्थिती बिकट झाली आहे. मात्र सेक्टर एक व दोनमधील बहुतांश ठिकाणी रामकथा, भागवत कथा शुक्रवारपर्यंत असल्याने ५० पेक्षा जास्त खालशांचा मुक्काम कथेच्या समारोपापर्यंत राहणार आहे. सध्या पावसामुळे साधुग्राममध्ये खालशांनी आवरासावर करण्याला सुरुवात केली आहे. पावसाचे पाणी खालशाच्या मंडपात साचल्याने साधूंसह भक्तगणांचा राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाच्या संततधारेमुळे थांबणे शक्य नसल्याचे सांगत खालशांनी सभा मंडपासह सर्व साहित्य रवाना करण्यास सुरुवात केली आहे. मात्र रिपरिप पाऊस सुरू असल्याने सभामंडप सोडण्यास अडचणी येत असल्याचे साधूंच्या भक्तांनी सांगितले. कुंभमेळ्यातील तिन्ही पर्वण्या पूर्ण झाल्याने आता साधूंना वापसीचे वेध लागले आहेत. साधूंनी आपल्या खालशातील सामान मिळेल त्या वाहनाने आश्रमात पोहचविण्याला प्राधान्य दिले आहे. सोमवारनंतर कथा काही मोजक्याच खालशांमध्ये सुरू राहणार आहेत. खालशामधील साधू-महंतांनी तिसऱ्या पर्वणीनंतर आश्रमाकडे धाव घेतल्याने भाविकांची गर्दीही तपोवनात कमी झाली आहे. पर्वणी काळात भाविकांनी गजबजणारी साधुग्रामच्या रस्त्यांवरील वाहतूक कमी झाली आहे. मात्र साधूंच्या खालशात थांबलेले भक्त, भाविकांनी परतण्यासाठीची धावपळ दिसून येत आहे. (प्रतिनिधी)