शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
3
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
4
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
5
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
6
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
7
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
8
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
9
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
10
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
11
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
12
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
13
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
14
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
15
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
16
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
17
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
18
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?
19
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे
20
खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO)

५० खालसेच उरले मुक्कामी

By admin | Updated: September 22, 2015 00:05 IST

५० खालसेच उरले मुक्कामी

नाशिक : साधुग्राममध्ये तिसऱ्या पर्वणीनंतर बहुतांश खालशांनी बस्तान गुंडाळले आहे. पावसामुळे खालशांमध्ये पाणी साचल्याने निवासाची परिस्थिती बिकट झाली आहे. मात्र सेक्टर एक व दोनमधील बहुतांश ठिकाणी रामकथा, भागवत कथा शुक्रवारपर्यंत असल्याने ५० पेक्षा जास्त खालशांचा मुक्काम कथेच्या समारोपापर्यंत राहणार आहे. सध्या पावसामुळे साधुग्राममध्ये खालशांनी आवरासावर करण्याला सुरुवात केली आहे. पावसाचे पाणी खालशाच्या मंडपात साचल्याने साधूंसह भक्तगणांचा राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाच्या संततधारेमुळे थांबणे शक्य नसल्याचे सांगत खालशांनी सभा मंडपासह सर्व साहित्य रवाना करण्यास सुरुवात केली आहे. मात्र रिपरिप पाऊस सुरू असल्याने सभामंडप सोडण्यास अडचणी येत असल्याचे साधूंच्या भक्तांनी सांगितले. कुंभमेळ्यातील तिन्ही पर्वण्या पूर्ण झाल्याने आता साधूंना वापसीचे वेध लागले आहेत. साधूंनी आपल्या खालशातील सामान मिळेल त्या वाहनाने आश्रमात पोहचविण्याला प्राधान्य दिले आहे. सोमवारनंतर कथा काही मोजक्याच खालशांमध्ये सुरू राहणार आहेत. खालशामधील साधू-महंतांनी तिसऱ्या पर्वणीनंतर आश्रमाकडे धाव घेतल्याने भाविकांची गर्दीही तपोवनात कमी झाली आहे. पर्वणी काळात भाविकांनी गजबजणारी साधुग्रामच्या रस्त्यांवरील वाहतूक कमी झाली आहे. मात्र साधूंच्या खालशात थांबलेले भक्त, भाविकांनी परतण्यासाठीची धावपळ दिसून येत आहे. (प्रतिनिधी)