शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

५० खालसेच उरले मुक्कामी

By admin | Updated: September 22, 2015 00:05 IST

५० खालसेच उरले मुक्कामी

नाशिक : साधुग्राममध्ये तिसऱ्या पर्वणीनंतर बहुतांश खालशांनी बस्तान गुंडाळले आहे. पावसामुळे खालशांमध्ये पाणी साचल्याने निवासाची परिस्थिती बिकट झाली आहे. मात्र सेक्टर एक व दोनमधील बहुतांश ठिकाणी रामकथा, भागवत कथा शुक्रवारपर्यंत असल्याने ५० पेक्षा जास्त खालशांचा मुक्काम कथेच्या समारोपापर्यंत राहणार आहे. सध्या पावसामुळे साधुग्राममध्ये खालशांनी आवरासावर करण्याला सुरुवात केली आहे. पावसाचे पाणी खालशाच्या मंडपात साचल्याने साधूंसह भक्तगणांचा राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाच्या संततधारेमुळे थांबणे शक्य नसल्याचे सांगत खालशांनी सभा मंडपासह सर्व साहित्य रवाना करण्यास सुरुवात केली आहे. मात्र रिपरिप पाऊस सुरू असल्याने सभामंडप सोडण्यास अडचणी येत असल्याचे साधूंच्या भक्तांनी सांगितले. कुंभमेळ्यातील तिन्ही पर्वण्या पूर्ण झाल्याने आता साधूंना वापसीचे वेध लागले आहेत. साधूंनी आपल्या खालशातील सामान मिळेल त्या वाहनाने आश्रमात पोहचविण्याला प्राधान्य दिले आहे. सोमवारनंतर कथा काही मोजक्याच खालशांमध्ये सुरू राहणार आहेत. खालशामधील साधू-महंतांनी तिसऱ्या पर्वणीनंतर आश्रमाकडे धाव घेतल्याने भाविकांची गर्दीही तपोवनात कमी झाली आहे. पर्वणी काळात भाविकांनी गजबजणारी साधुग्रामच्या रस्त्यांवरील वाहतूक कमी झाली आहे. मात्र साधूंच्या खालशात थांबलेले भक्त, भाविकांनी परतण्यासाठीची धावपळ दिसून येत आहे. (प्रतिनिधी)