शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

५० एकर शेती पूरपाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 00:17 IST

कसबे सुकेणे : मुसळधार पावसामुळे आडगाव, सय्यदपिंप्री शिवारातील ओढा-नाल्यांचे पूरपाणी निफाड तालुक्यातील खेरवाडीच्या हनुमाननगर शिवारात जमा होत असल्याने सुमारे पन्नास एकरहून अधिक शेती पूरपाण्याखाली आली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देगोदाकाठी कोसळधार : भाजीपाला पिकांना लाखोंचा फटका; द्राक्षबागांमध्ये साचले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्ककसबे सुकेणे : मुसळधार पावसामुळे आडगाव, सय्यदपिंप्री शिवारातील ओढा-नाल्यांचे पूरपाणी निफाड तालुक्यातील खेरवाडीच्या हनुमाननगर शिवारात जमा होत असल्याने सुमारे पन्नास एकरहून अधिक शेती पूरपाण्याखाली आली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.मृग नक्षत्राच्या कोसळधारेमुळे नाशिकच्या आडगाव, सिद्धपिंप्री या पूर्व भागातील ओढे-नाल्यांना दररोज पूर येत असल्याने हे पूरपाणी खेरवाडी, चितेगाव व चांदोरी शिवारात जमा होत आहे. त्यामुळे या शिवारात पूरस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील पेरणी केलेले बियाणे वाहून गेले असून, द्राक्षबागांमध्ये गुडघ्यावर पाणी आहे. ऊस, कोथिंबीर, भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जगन्नाथ जाधव, बाळासाहेब संगमनेरे, दत्तात्रय संगमनेरे, माणिक जाधव, रमेश संगमनेरे, निवृत्ती संगमनेरे, लालाजी संगमनेरे, ज्ञानेश्वर संगमनेरे, शांताराम संगमनेरे, विश्वनाथ संगमनेरे, बाळासाहेब संगमनेरे यांसह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.शेतकºयांची मागणी आडगाव-सय्यदपिंप्री-खेरवाडी-सुकेणे असा हा प्रमुख जिल्हा मार्ग आहे. या रस्त्यावर पिंप्री ते ओणेदरम्यान चार ओहळ असून, ओहळाला पावसाळ्यात पूर येऊन रस्ता बंद होत आहे. या नाल्यावरील फरशी पुलांची उंची वाढवून ओहळांचे खोलीकरण केले तर शेतपिकात पूरपाणी घुसणार नाही, याकडे शासनाने व लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.पूरपरिस्थितीने शेतकरी हवालदिल गेल्या पाच दिवसांपासून ओढे-नालेलगतच्या शेतात व द्राक्षबागेत पूरपाणी असून, शेतकामे ठप्प झाली आहेत. मुख्य रस्त्यावरून वस्तीवर येणारे रस्ते पाण्यात असल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्यात या शिवाराला पूरपाण्याचा तडाखा बसत आहे.नव्याने लागवड केलेल्या कोबी, कोथिंबीर, मेथी, टमाटा, वांगे, भेंडी, गवार, सोयाबीन यांसारखी पिके शेतकºयांच्या हाताबाहेर जात आहे. महागडी बियाणे आणि रोपे खरेदी करून शेतकºयांनी लागवड केली होती; परंतु पूरपाण्याने नुकसान केले असल्याची माहिती शेतकºयांनी दिली. मुसळधार पावसामुळे ओढा-नाल्याचे पूरपाणी शेतात साचल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. या भागातील ५० एकर अधिक पिके व बागांचे नुकसान झाले आहे.- समाधान संगमनेरे, शेतकरी, खेरवाडी.