शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

५० एकर शेती पूरपाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 00:17 IST

कसबे सुकेणे : मुसळधार पावसामुळे आडगाव, सय्यदपिंप्री शिवारातील ओढा-नाल्यांचे पूरपाणी निफाड तालुक्यातील खेरवाडीच्या हनुमाननगर शिवारात जमा होत असल्याने सुमारे पन्नास एकरहून अधिक शेती पूरपाण्याखाली आली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देगोदाकाठी कोसळधार : भाजीपाला पिकांना लाखोंचा फटका; द्राक्षबागांमध्ये साचले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्ककसबे सुकेणे : मुसळधार पावसामुळे आडगाव, सय्यदपिंप्री शिवारातील ओढा-नाल्यांचे पूरपाणी निफाड तालुक्यातील खेरवाडीच्या हनुमाननगर शिवारात जमा होत असल्याने सुमारे पन्नास एकरहून अधिक शेती पूरपाण्याखाली आली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.मृग नक्षत्राच्या कोसळधारेमुळे नाशिकच्या आडगाव, सिद्धपिंप्री या पूर्व भागातील ओढे-नाल्यांना दररोज पूर येत असल्याने हे पूरपाणी खेरवाडी, चितेगाव व चांदोरी शिवारात जमा होत आहे. त्यामुळे या शिवारात पूरस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील पेरणी केलेले बियाणे वाहून गेले असून, द्राक्षबागांमध्ये गुडघ्यावर पाणी आहे. ऊस, कोथिंबीर, भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जगन्नाथ जाधव, बाळासाहेब संगमनेरे, दत्तात्रय संगमनेरे, माणिक जाधव, रमेश संगमनेरे, निवृत्ती संगमनेरे, लालाजी संगमनेरे, ज्ञानेश्वर संगमनेरे, शांताराम संगमनेरे, विश्वनाथ संगमनेरे, बाळासाहेब संगमनेरे यांसह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.शेतकºयांची मागणी आडगाव-सय्यदपिंप्री-खेरवाडी-सुकेणे असा हा प्रमुख जिल्हा मार्ग आहे. या रस्त्यावर पिंप्री ते ओणेदरम्यान चार ओहळ असून, ओहळाला पावसाळ्यात पूर येऊन रस्ता बंद होत आहे. या नाल्यावरील फरशी पुलांची उंची वाढवून ओहळांचे खोलीकरण केले तर शेतपिकात पूरपाणी घुसणार नाही, याकडे शासनाने व लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.पूरपरिस्थितीने शेतकरी हवालदिल गेल्या पाच दिवसांपासून ओढे-नालेलगतच्या शेतात व द्राक्षबागेत पूरपाणी असून, शेतकामे ठप्प झाली आहेत. मुख्य रस्त्यावरून वस्तीवर येणारे रस्ते पाण्यात असल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्यात या शिवाराला पूरपाण्याचा तडाखा बसत आहे.नव्याने लागवड केलेल्या कोबी, कोथिंबीर, मेथी, टमाटा, वांगे, भेंडी, गवार, सोयाबीन यांसारखी पिके शेतकºयांच्या हाताबाहेर जात आहे. महागडी बियाणे आणि रोपे खरेदी करून शेतकºयांनी लागवड केली होती; परंतु पूरपाण्याने नुकसान केले असल्याची माहिती शेतकºयांनी दिली. मुसळधार पावसामुळे ओढा-नाल्याचे पूरपाणी शेतात साचल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. या भागातील ५० एकर अधिक पिके व बागांचे नुकसान झाले आहे.- समाधान संगमनेरे, शेतकरी, खेरवाडी.