शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बागांमध्ये ४० टक्के द्राक्षे शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 00:01 IST

द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात उशिरा छाटणी केलेल्या बागांवर ४० टक्के द्राक्षे शिल्लक असल्याने अशा बागांची लॉकडाउनमुळे व्यापाऱ्यांनी खरेदी - विक्री बंद केल्याने उत्पादक शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देलॉकडाउनचा परिणाम : निफाड तालुक्यात खरेदी-विक्री बंद झाल्याने उत्पादकांचे नुकसान

बाजीराव कमानकर ।सायखेडा : द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात उशिरा छाटणी केलेल्या बागांवर ४० टक्के द्राक्षे शिल्लक असल्याने अशा बागांची लॉकडाउनमुळे व्यापाऱ्यांनी खरेदी - विक्री बंद केल्याने उत्पादक शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले आहे.यंदाच्या द्राक्ष हंगामात हजारो कोटींचा तोटा शेतकºयांना झाला आहे. आॅक्टोबर महिन्यात अवकाळी पाऊस सुरू होता त्यामुळे शेतकºयांनी द्राक्षबागांची छाटणी पुढे ढकलली होती. पावसामुळे गोड बारची छाटणी लांबणीवर गेल्याने द्राक्ष हंगामदेखील लांबला. दरवर्षी मार्च महिन्यात येणारे द्राक्षे एप्रिल महिन्यात विक्रीसाठी परिपूर्ण झाले. एप्रिल महिन्यात उन्हाळा सुरू होतो त्यामुळे द्राक्षबागांना चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकºयांना होती. झालेही तसेच. मार्च महिन्यातच द्राक्ष बाजार भाव वाढू लागले. ३५ ते ४० रुपये किलो दराने विक्री होण्यास सुरुवात झाली असतानाच अचानक जगभरात कोरोनाने थैमान घातले. भारतातही या रोगाने थैमान घातल्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारने संचारबंदी लागू केली. त्यामुळे अनेक व्यापाºयांनी द्राक्ष खरेदी बंद केली. आंतरराष्ट्रीय व्यापार बंद झाले. देशांतर्गत राज्या-राज्यातील सीमा बंद केल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला. त्यामुळे व्यापाºयांनी द्राक्ष बागांची खरेदी बंद केली. काही व्यापारी खरेदी करत होते, मात्र द्राक्ष घेण्यासाठी ग्राहक घर सोडून बाहेर येत नसल्याने द्राक्षांना कवडीमोल किंमत आली. अशा परिस्थितीमध्ये व्यापाºयांनी पूर्णपणे व्यवहार बंद केले. त्याचा फटका शेतकºयांना बसला.नुकसानभरपाई देण्याची मागणीअवकाळी पावसामुळे प्रचंड प्रमाणात शेतकºयांना द्राक्षबागा टिकवण्यासाठी खर्च करावा लागला. खर्च केलेल्या बागांना किमान ४० ते ५० रुपये दर मिळणे अपेक्षित होते; मात्र कवडीमोल भावामध्ये कोणी घेत नसल्याने शेतकºयांना तोटा सहन करावा लागत आहे. सरकारी यंत्रणा द्राक्ष निर्यात करू शकतो, असे सांगत असले तरी प्रत्यक्ष द्राक्ष खाणारा वर्ग हा शहरी भागातील असल्याने तो घराच्या बाहेर पडत नाही. त्यामुळे खरेदी केलेला मालक कुणी घेत नसल्याने व्यापारी तोट्यात जाऊ लागल्याने खरेदी बंद केली आहे. संपूर्णपणे अशा नुकसान झालेल्या बागांना शासनाने नुकसानभरपाई द्यावी. शेतकºयांचा झालेला लाखो रुपयांचा खर्च किमान मिळावा, अशी अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे.कोल्ड स्टोरेज महागडेबागांवर शिल्लक असलेल्या द्राक्षांचे काय करावे, असा प्रश्न शेतकºयांच्या समोर निर्माण झाला आहे. अनेक शेतकºयांनी कोल्ड स्टोरेजचा पर्याय निवडला. तो खर्च परवडणारा नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेक शेतकºयांनी द्राक्षे तोडून जमिनीवर वाळत घातली आहेत तर काही स्वत: बेदाणा प्रक्रिया राबवत असले तरी त्यासाठी लागणारी सर्व औषधं, गंधक, धुणी देणे ही किचकट प्रक्रिया असल्यामुळे त्याचा किती फायदा होणार हे बेदाणा निर्मितीनंतर ठरणार आहे.हंगाम तोट्यातअनेक शेतकरी आपल्या द्राक्ष मण्यांचा बेदाणा तयार करत असल्याने बेदाणानिर्मिती वाढणार असल्याने त्याचा परिणाम बाजारभावावर होणार आहे. परिणामी यंदाचा द्राक्ष हंगाम पूर्णपणे तोट्यात गेला आहे. आधीच उत्पादकांनी बागांवर लाखो रुपयांचा खर्च करून ठेवला आहे.आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसात लाखो रुपये खर्च करून द्राक्षबागा वाचवल्या. या द्राक्षबागांना किमान ४० ते ५० रुपये बाजारभाव मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र कोरोना रोगाचा परिणाम या द्राक्षबागांवर झाला. निफाड तालुक्यात आज हजारो हेक्टर क्षेत्र हे बागांच्या असल्याने जवळपास ८० टक्के शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ज्या शेतकºयांच्या द्राक्षबागा खाली झाल्या नाही, अशा शेतकºयांना शासनाने त्वरित नुकसनभरपाई द्यावी. - धोंडीराम रायते, उपसरपंच, शिंगवे

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी