शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

बागांमध्ये ४० टक्के द्राक्षे शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 00:01 IST

द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात उशिरा छाटणी केलेल्या बागांवर ४० टक्के द्राक्षे शिल्लक असल्याने अशा बागांची लॉकडाउनमुळे व्यापाऱ्यांनी खरेदी - विक्री बंद केल्याने उत्पादक शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देलॉकडाउनचा परिणाम : निफाड तालुक्यात खरेदी-विक्री बंद झाल्याने उत्पादकांचे नुकसान

बाजीराव कमानकर ।सायखेडा : द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात उशिरा छाटणी केलेल्या बागांवर ४० टक्के द्राक्षे शिल्लक असल्याने अशा बागांची लॉकडाउनमुळे व्यापाऱ्यांनी खरेदी - विक्री बंद केल्याने उत्पादक शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले आहे.यंदाच्या द्राक्ष हंगामात हजारो कोटींचा तोटा शेतकºयांना झाला आहे. आॅक्टोबर महिन्यात अवकाळी पाऊस सुरू होता त्यामुळे शेतकºयांनी द्राक्षबागांची छाटणी पुढे ढकलली होती. पावसामुळे गोड बारची छाटणी लांबणीवर गेल्याने द्राक्ष हंगामदेखील लांबला. दरवर्षी मार्च महिन्यात येणारे द्राक्षे एप्रिल महिन्यात विक्रीसाठी परिपूर्ण झाले. एप्रिल महिन्यात उन्हाळा सुरू होतो त्यामुळे द्राक्षबागांना चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकºयांना होती. झालेही तसेच. मार्च महिन्यातच द्राक्ष बाजार भाव वाढू लागले. ३५ ते ४० रुपये किलो दराने विक्री होण्यास सुरुवात झाली असतानाच अचानक जगभरात कोरोनाने थैमान घातले. भारतातही या रोगाने थैमान घातल्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारने संचारबंदी लागू केली. त्यामुळे अनेक व्यापाºयांनी द्राक्ष खरेदी बंद केली. आंतरराष्ट्रीय व्यापार बंद झाले. देशांतर्गत राज्या-राज्यातील सीमा बंद केल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला. त्यामुळे व्यापाºयांनी द्राक्ष बागांची खरेदी बंद केली. काही व्यापारी खरेदी करत होते, मात्र द्राक्ष घेण्यासाठी ग्राहक घर सोडून बाहेर येत नसल्याने द्राक्षांना कवडीमोल किंमत आली. अशा परिस्थितीमध्ये व्यापाºयांनी पूर्णपणे व्यवहार बंद केले. त्याचा फटका शेतकºयांना बसला.नुकसानभरपाई देण्याची मागणीअवकाळी पावसामुळे प्रचंड प्रमाणात शेतकºयांना द्राक्षबागा टिकवण्यासाठी खर्च करावा लागला. खर्च केलेल्या बागांना किमान ४० ते ५० रुपये दर मिळणे अपेक्षित होते; मात्र कवडीमोल भावामध्ये कोणी घेत नसल्याने शेतकºयांना तोटा सहन करावा लागत आहे. सरकारी यंत्रणा द्राक्ष निर्यात करू शकतो, असे सांगत असले तरी प्रत्यक्ष द्राक्ष खाणारा वर्ग हा शहरी भागातील असल्याने तो घराच्या बाहेर पडत नाही. त्यामुळे खरेदी केलेला मालक कुणी घेत नसल्याने व्यापारी तोट्यात जाऊ लागल्याने खरेदी बंद केली आहे. संपूर्णपणे अशा नुकसान झालेल्या बागांना शासनाने नुकसानभरपाई द्यावी. शेतकºयांचा झालेला लाखो रुपयांचा खर्च किमान मिळावा, अशी अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे.कोल्ड स्टोरेज महागडेबागांवर शिल्लक असलेल्या द्राक्षांचे काय करावे, असा प्रश्न शेतकºयांच्या समोर निर्माण झाला आहे. अनेक शेतकºयांनी कोल्ड स्टोरेजचा पर्याय निवडला. तो खर्च परवडणारा नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेक शेतकºयांनी द्राक्षे तोडून जमिनीवर वाळत घातली आहेत तर काही स्वत: बेदाणा प्रक्रिया राबवत असले तरी त्यासाठी लागणारी सर्व औषधं, गंधक, धुणी देणे ही किचकट प्रक्रिया असल्यामुळे त्याचा किती फायदा होणार हे बेदाणा निर्मितीनंतर ठरणार आहे.हंगाम तोट्यातअनेक शेतकरी आपल्या द्राक्ष मण्यांचा बेदाणा तयार करत असल्याने बेदाणानिर्मिती वाढणार असल्याने त्याचा परिणाम बाजारभावावर होणार आहे. परिणामी यंदाचा द्राक्ष हंगाम पूर्णपणे तोट्यात गेला आहे. आधीच उत्पादकांनी बागांवर लाखो रुपयांचा खर्च करून ठेवला आहे.आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसात लाखो रुपये खर्च करून द्राक्षबागा वाचवल्या. या द्राक्षबागांना किमान ४० ते ५० रुपये बाजारभाव मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र कोरोना रोगाचा परिणाम या द्राक्षबागांवर झाला. निफाड तालुक्यात आज हजारो हेक्टर क्षेत्र हे बागांच्या असल्याने जवळपास ८० टक्के शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ज्या शेतकºयांच्या द्राक्षबागा खाली झाल्या नाही, अशा शेतकºयांना शासनाने त्वरित नुकसनभरपाई द्यावी. - धोंडीराम रायते, उपसरपंच, शिंगवे

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी