शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

बागांमध्ये ४० टक्के द्राक्षे शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 00:01 IST

द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात उशिरा छाटणी केलेल्या बागांवर ४० टक्के द्राक्षे शिल्लक असल्याने अशा बागांची लॉकडाउनमुळे व्यापाऱ्यांनी खरेदी - विक्री बंद केल्याने उत्पादक शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देलॉकडाउनचा परिणाम : निफाड तालुक्यात खरेदी-विक्री बंद झाल्याने उत्पादकांचे नुकसान

बाजीराव कमानकर ।सायखेडा : द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात उशिरा छाटणी केलेल्या बागांवर ४० टक्के द्राक्षे शिल्लक असल्याने अशा बागांची लॉकडाउनमुळे व्यापाऱ्यांनी खरेदी - विक्री बंद केल्याने उत्पादक शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले आहे.यंदाच्या द्राक्ष हंगामात हजारो कोटींचा तोटा शेतकºयांना झाला आहे. आॅक्टोबर महिन्यात अवकाळी पाऊस सुरू होता त्यामुळे शेतकºयांनी द्राक्षबागांची छाटणी पुढे ढकलली होती. पावसामुळे गोड बारची छाटणी लांबणीवर गेल्याने द्राक्ष हंगामदेखील लांबला. दरवर्षी मार्च महिन्यात येणारे द्राक्षे एप्रिल महिन्यात विक्रीसाठी परिपूर्ण झाले. एप्रिल महिन्यात उन्हाळा सुरू होतो त्यामुळे द्राक्षबागांना चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकºयांना होती. झालेही तसेच. मार्च महिन्यातच द्राक्ष बाजार भाव वाढू लागले. ३५ ते ४० रुपये किलो दराने विक्री होण्यास सुरुवात झाली असतानाच अचानक जगभरात कोरोनाने थैमान घातले. भारतातही या रोगाने थैमान घातल्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारने संचारबंदी लागू केली. त्यामुळे अनेक व्यापाºयांनी द्राक्ष खरेदी बंद केली. आंतरराष्ट्रीय व्यापार बंद झाले. देशांतर्गत राज्या-राज्यातील सीमा बंद केल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला. त्यामुळे व्यापाºयांनी द्राक्ष बागांची खरेदी बंद केली. काही व्यापारी खरेदी करत होते, मात्र द्राक्ष घेण्यासाठी ग्राहक घर सोडून बाहेर येत नसल्याने द्राक्षांना कवडीमोल किंमत आली. अशा परिस्थितीमध्ये व्यापाºयांनी पूर्णपणे व्यवहार बंद केले. त्याचा फटका शेतकºयांना बसला.नुकसानभरपाई देण्याची मागणीअवकाळी पावसामुळे प्रचंड प्रमाणात शेतकºयांना द्राक्षबागा टिकवण्यासाठी खर्च करावा लागला. खर्च केलेल्या बागांना किमान ४० ते ५० रुपये दर मिळणे अपेक्षित होते; मात्र कवडीमोल भावामध्ये कोणी घेत नसल्याने शेतकºयांना तोटा सहन करावा लागत आहे. सरकारी यंत्रणा द्राक्ष निर्यात करू शकतो, असे सांगत असले तरी प्रत्यक्ष द्राक्ष खाणारा वर्ग हा शहरी भागातील असल्याने तो घराच्या बाहेर पडत नाही. त्यामुळे खरेदी केलेला मालक कुणी घेत नसल्याने व्यापारी तोट्यात जाऊ लागल्याने खरेदी बंद केली आहे. संपूर्णपणे अशा नुकसान झालेल्या बागांना शासनाने नुकसानभरपाई द्यावी. शेतकºयांचा झालेला लाखो रुपयांचा खर्च किमान मिळावा, अशी अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे.कोल्ड स्टोरेज महागडेबागांवर शिल्लक असलेल्या द्राक्षांचे काय करावे, असा प्रश्न शेतकºयांच्या समोर निर्माण झाला आहे. अनेक शेतकºयांनी कोल्ड स्टोरेजचा पर्याय निवडला. तो खर्च परवडणारा नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेक शेतकºयांनी द्राक्षे तोडून जमिनीवर वाळत घातली आहेत तर काही स्वत: बेदाणा प्रक्रिया राबवत असले तरी त्यासाठी लागणारी सर्व औषधं, गंधक, धुणी देणे ही किचकट प्रक्रिया असल्यामुळे त्याचा किती फायदा होणार हे बेदाणा निर्मितीनंतर ठरणार आहे.हंगाम तोट्यातअनेक शेतकरी आपल्या द्राक्ष मण्यांचा बेदाणा तयार करत असल्याने बेदाणानिर्मिती वाढणार असल्याने त्याचा परिणाम बाजारभावावर होणार आहे. परिणामी यंदाचा द्राक्ष हंगाम पूर्णपणे तोट्यात गेला आहे. आधीच उत्पादकांनी बागांवर लाखो रुपयांचा खर्च करून ठेवला आहे.आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसात लाखो रुपये खर्च करून द्राक्षबागा वाचवल्या. या द्राक्षबागांना किमान ४० ते ५० रुपये बाजारभाव मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र कोरोना रोगाचा परिणाम या द्राक्षबागांवर झाला. निफाड तालुक्यात आज हजारो हेक्टर क्षेत्र हे बागांच्या असल्याने जवळपास ८० टक्के शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ज्या शेतकºयांच्या द्राक्षबागा खाली झाल्या नाही, अशा शेतकºयांना शासनाने त्वरित नुकसनभरपाई द्यावी. - धोंडीराम रायते, उपसरपंच, शिंगवे

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी