शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
4
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
5
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
6
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
7
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
8
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
9
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
10
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
11
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
12
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
13
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
14
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
15
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
16
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
17
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
18
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
19
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
20
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?

बागांमध्ये ४० टक्के द्राक्षे शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 00:01 IST

द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात उशिरा छाटणी केलेल्या बागांवर ४० टक्के द्राक्षे शिल्लक असल्याने अशा बागांची लॉकडाउनमुळे व्यापाऱ्यांनी खरेदी - विक्री बंद केल्याने उत्पादक शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देलॉकडाउनचा परिणाम : निफाड तालुक्यात खरेदी-विक्री बंद झाल्याने उत्पादकांचे नुकसान

बाजीराव कमानकर ।सायखेडा : द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात उशिरा छाटणी केलेल्या बागांवर ४० टक्के द्राक्षे शिल्लक असल्याने अशा बागांची लॉकडाउनमुळे व्यापाऱ्यांनी खरेदी - विक्री बंद केल्याने उत्पादक शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले आहे.यंदाच्या द्राक्ष हंगामात हजारो कोटींचा तोटा शेतकºयांना झाला आहे. आॅक्टोबर महिन्यात अवकाळी पाऊस सुरू होता त्यामुळे शेतकºयांनी द्राक्षबागांची छाटणी पुढे ढकलली होती. पावसामुळे गोड बारची छाटणी लांबणीवर गेल्याने द्राक्ष हंगामदेखील लांबला. दरवर्षी मार्च महिन्यात येणारे द्राक्षे एप्रिल महिन्यात विक्रीसाठी परिपूर्ण झाले. एप्रिल महिन्यात उन्हाळा सुरू होतो त्यामुळे द्राक्षबागांना चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकºयांना होती. झालेही तसेच. मार्च महिन्यातच द्राक्ष बाजार भाव वाढू लागले. ३५ ते ४० रुपये किलो दराने विक्री होण्यास सुरुवात झाली असतानाच अचानक जगभरात कोरोनाने थैमान घातले. भारतातही या रोगाने थैमान घातल्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारने संचारबंदी लागू केली. त्यामुळे अनेक व्यापाºयांनी द्राक्ष खरेदी बंद केली. आंतरराष्ट्रीय व्यापार बंद झाले. देशांतर्गत राज्या-राज्यातील सीमा बंद केल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला. त्यामुळे व्यापाºयांनी द्राक्ष बागांची खरेदी बंद केली. काही व्यापारी खरेदी करत होते, मात्र द्राक्ष घेण्यासाठी ग्राहक घर सोडून बाहेर येत नसल्याने द्राक्षांना कवडीमोल किंमत आली. अशा परिस्थितीमध्ये व्यापाºयांनी पूर्णपणे व्यवहार बंद केले. त्याचा फटका शेतकºयांना बसला.नुकसानभरपाई देण्याची मागणीअवकाळी पावसामुळे प्रचंड प्रमाणात शेतकºयांना द्राक्षबागा टिकवण्यासाठी खर्च करावा लागला. खर्च केलेल्या बागांना किमान ४० ते ५० रुपये दर मिळणे अपेक्षित होते; मात्र कवडीमोल भावामध्ये कोणी घेत नसल्याने शेतकºयांना तोटा सहन करावा लागत आहे. सरकारी यंत्रणा द्राक्ष निर्यात करू शकतो, असे सांगत असले तरी प्रत्यक्ष द्राक्ष खाणारा वर्ग हा शहरी भागातील असल्याने तो घराच्या बाहेर पडत नाही. त्यामुळे खरेदी केलेला मालक कुणी घेत नसल्याने व्यापारी तोट्यात जाऊ लागल्याने खरेदी बंद केली आहे. संपूर्णपणे अशा नुकसान झालेल्या बागांना शासनाने नुकसानभरपाई द्यावी. शेतकºयांचा झालेला लाखो रुपयांचा खर्च किमान मिळावा, अशी अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे.कोल्ड स्टोरेज महागडेबागांवर शिल्लक असलेल्या द्राक्षांचे काय करावे, असा प्रश्न शेतकºयांच्या समोर निर्माण झाला आहे. अनेक शेतकºयांनी कोल्ड स्टोरेजचा पर्याय निवडला. तो खर्च परवडणारा नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेक शेतकºयांनी द्राक्षे तोडून जमिनीवर वाळत घातली आहेत तर काही स्वत: बेदाणा प्रक्रिया राबवत असले तरी त्यासाठी लागणारी सर्व औषधं, गंधक, धुणी देणे ही किचकट प्रक्रिया असल्यामुळे त्याचा किती फायदा होणार हे बेदाणा निर्मितीनंतर ठरणार आहे.हंगाम तोट्यातअनेक शेतकरी आपल्या द्राक्ष मण्यांचा बेदाणा तयार करत असल्याने बेदाणानिर्मिती वाढणार असल्याने त्याचा परिणाम बाजारभावावर होणार आहे. परिणामी यंदाचा द्राक्ष हंगाम पूर्णपणे तोट्यात गेला आहे. आधीच उत्पादकांनी बागांवर लाखो रुपयांचा खर्च करून ठेवला आहे.आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसात लाखो रुपये खर्च करून द्राक्षबागा वाचवल्या. या द्राक्षबागांना किमान ४० ते ५० रुपये बाजारभाव मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र कोरोना रोगाचा परिणाम या द्राक्षबागांवर झाला. निफाड तालुक्यात आज हजारो हेक्टर क्षेत्र हे बागांच्या असल्याने जवळपास ८० टक्के शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ज्या शेतकºयांच्या द्राक्षबागा खाली झाल्या नाही, अशा शेतकºयांना शासनाने त्वरित नुकसनभरपाई द्यावी. - धोंडीराम रायते, उपसरपंच, शिंगवे

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी