शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

सिव्हिलमध्ये ४७ टक्के बालके खासगी रुग्णालयातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:08 IST

नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या अर्भकांपैकी साधारणत: ७६१ म्हणजे ४७ टक्के बालके ही खासगी रुग्णालयातील असून, नवजात कक्षात दाखल करण्यात आलेल्या ९० टक्के बालकांचे वजन कमी असते व त्यातील ३० टक्के बालके ही एक किलोपेक्षाही कमी वजनाची असतात, त्यामुळे त्यांच्यात संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याने मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली आहे.

नाशिक : नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या अर्भकांपैकी साधारणत: ७६१ म्हणजे ४७ टक्के बालके ही खासगी रुग्णालयातील असून, नवजात कक्षात दाखल करण्यात आलेल्या ९० टक्के बालकांचे वजन कमी असते व त्यातील ३० टक्के बालके ही एक किलोपेक्षाही कमी वजनाची असतात, त्यामुळे त्यांच्यात संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याने मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली आहे.राज्यातील बालमृत्यू, अर्भक मृत्यू, उपजत मृत्यू यांचे प्रमाण आटोक्यात असले तरी, यात आणखी घट कशी होईल याकडे आरोग्य खाते लक्ष ठेवून असल्याची माहितीही डॉ. सावंत यांनी दिली. एनआयसीयूमध्ये अर्भकांची विशेष काळजी कशी घेतली जाईल, जंतू संसर्ग नियंत्रित करण्यासाठी आणखी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे तसेच उपजत मृत्यू कसे कमी होतील, याबाबत निओनॅटॅलॉजिस्ट तज्ज्ञांचा समावेश असलेल्या डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात येत असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे. राज्यातील कार्यरत ३६ एनआयसीयूमध्ये जव्हार, गडचिरोली व नाशिक यांचादेखील समावेश आहे. यात ६०० ते १००० ग्रॅम वजनापर्यंतच्या गुंतागुंतीच्या आजाराने त्रस्त असलेल्या बालकांना बरे करण्यात शासकीय रुग्णालयांना यश प्राप्त झाले आहे. तथापि, यामध्ये अकाली जन्मलेली, कमी वजनाची बालके, रोगशक्ती प्रतिबंध कमी असल्यामुळे अशा अर्भकांना पटकन जंतू संसर्ग होतो. अनेकदा खासगी रुग्णालयातून अशा प्रकारची ‘क्रिटिकल इल’ बालके शेवटच्या क्षणी संदर्भित केली जातात व त्यामुळे मृत्यूच्या संख्येत वाढ होते, असेही डॉ. सावंत यांनी सांगितले. नाशिक जिल्हा रुग्णालयात जन्मलेल्या बालकांची संख्या ८६५ म्हणजे ५६ टक्के इतकी आहे. विशेष नवजात कक्षात दाखल करण्यात आलेल्या ९० टक्के बालकांचे वजन कमी असते. त्यातील ३० टक्के बालके ही एक किलो वजनाची असतात, त्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते. बºयाचदा गर्भामध्ये अर्भकाकडून मिकोनियम स्त्राव गिळल्यामुुळे आणि तो फुप्फुसात गेल्याने त्याला फुप्फुसाचा संसर्ग होतो त्यामुळे अशा बालकांची श्वसनक्षमता आणि हृदय क्षमता ही बेताचीच असते. बाहेरून संदर्भित केलेल्या अर्भकांमध्ये संसर्गाचे प्रमाण जास्त असल्याने मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्याचे आढळून आल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.