शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सिव्हिलमध्ये ४७ टक्के बालके खासगी रुग्णालयातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:08 IST

नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या अर्भकांपैकी साधारणत: ७६१ म्हणजे ४७ टक्के बालके ही खासगी रुग्णालयातील असून, नवजात कक्षात दाखल करण्यात आलेल्या ९० टक्के बालकांचे वजन कमी असते व त्यातील ३० टक्के बालके ही एक किलोपेक्षाही कमी वजनाची असतात, त्यामुळे त्यांच्यात संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याने मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली आहे.

नाशिक : नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या अर्भकांपैकी साधारणत: ७६१ म्हणजे ४७ टक्के बालके ही खासगी रुग्णालयातील असून, नवजात कक्षात दाखल करण्यात आलेल्या ९० टक्के बालकांचे वजन कमी असते व त्यातील ३० टक्के बालके ही एक किलोपेक्षाही कमी वजनाची असतात, त्यामुळे त्यांच्यात संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याने मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली आहे.राज्यातील बालमृत्यू, अर्भक मृत्यू, उपजत मृत्यू यांचे प्रमाण आटोक्यात असले तरी, यात आणखी घट कशी होईल याकडे आरोग्य खाते लक्ष ठेवून असल्याची माहितीही डॉ. सावंत यांनी दिली. एनआयसीयूमध्ये अर्भकांची विशेष काळजी कशी घेतली जाईल, जंतू संसर्ग नियंत्रित करण्यासाठी आणखी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे तसेच उपजत मृत्यू कसे कमी होतील, याबाबत निओनॅटॅलॉजिस्ट तज्ज्ञांचा समावेश असलेल्या डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात येत असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे. राज्यातील कार्यरत ३६ एनआयसीयूमध्ये जव्हार, गडचिरोली व नाशिक यांचादेखील समावेश आहे. यात ६०० ते १००० ग्रॅम वजनापर्यंतच्या गुंतागुंतीच्या आजाराने त्रस्त असलेल्या बालकांना बरे करण्यात शासकीय रुग्णालयांना यश प्राप्त झाले आहे. तथापि, यामध्ये अकाली जन्मलेली, कमी वजनाची बालके, रोगशक्ती प्रतिबंध कमी असल्यामुळे अशा अर्भकांना पटकन जंतू संसर्ग होतो. अनेकदा खासगी रुग्णालयातून अशा प्रकारची ‘क्रिटिकल इल’ बालके शेवटच्या क्षणी संदर्भित केली जातात व त्यामुळे मृत्यूच्या संख्येत वाढ होते, असेही डॉ. सावंत यांनी सांगितले. नाशिक जिल्हा रुग्णालयात जन्मलेल्या बालकांची संख्या ८६५ म्हणजे ५६ टक्के इतकी आहे. विशेष नवजात कक्षात दाखल करण्यात आलेल्या ९० टक्के बालकांचे वजन कमी असते. त्यातील ३० टक्के बालके ही एक किलो वजनाची असतात, त्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते. बºयाचदा गर्भामध्ये अर्भकाकडून मिकोनियम स्त्राव गिळल्यामुुळे आणि तो फुप्फुसात गेल्याने त्याला फुप्फुसाचा संसर्ग होतो त्यामुळे अशा बालकांची श्वसनक्षमता आणि हृदय क्षमता ही बेताचीच असते. बाहेरून संदर्भित केलेल्या अर्भकांमध्ये संसर्गाचे प्रमाण जास्त असल्याने मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्याचे आढळून आल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.