शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

जायखेड्यात ४७ जण विलगीकरण कक्षात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 00:29 IST

जायखेडा : येथील कोरोनाग्रस्त तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे कुटुंबीय व संपर्कातील अशा ४७ जणांना विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. ...

जायखेडा : येथील कोरोनाग्रस्त तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे कुटुंबीय व संपर्कातील अशा ४७ जणांना विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यातील १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने यंत्रणा चांगलीच सतर्क झाली आहे.बागलाणचे प्रांताधिकारी विजयकुमार भांगरे, गटविकास अधिकारी पी. एस. कोल्हे यांनी परिस्थितीचा आढावा घेत प्रशासनाला सूचना करीत गाव १४ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी (दि. ११) येथील ३२ वर्षीय खासगी वाहनचालकास मालेगाव येथे उपचारासाठी नेत असताना त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. त्याची कोरोना चाचणी केली असता तो पॉझिटिव्ह आढळून आला. यंत्रणेने तातडीने त्याचे कुटुंबीय व त्याच्यावर उपचार करणारे स्थानिक खासगी डॉक्टर,संपर्कातील व्यक्ती अशा ४७ जणांना विलगीकरण केंद्रात दाखल केले आहे. यांच्या स्रावाचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले होते.पैकी दहा जण पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जायखेडा व परिसरात भीतीचे वातावरण निर्माणझाले आहे. प्रातांधिकारी भांगरे, गटविकास अधिकारी कोल्हे, वैद्यकीय अधिकारी उमेश रामोळे, सहायक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, सरपंच शांताराम अहिरे, संदेश मोरे, चंद्रसिंग सूर्यवंशी, सर्कल आॅफिसर एस. के. खरे, तलाठी एस. बी. घोडेराव, ग्रामविकास अधिकारी किशोरभामरे, एस. जी. कापडणीस आदी परिस्थितीवर लक्ष ठेवूनआहेत.

---------------------------अत्यावश्यक सेवा सुरू : गाव १४ दिवस बंद; परिसर सीलजायखेड्यातील पॉझिटिव्ह व संपर्कातील व्यक्तींची यादी तयार करण्याचे काम सुरू असून, ४७ व्यक्तींना विलगीकरण केंद्रात पाठवण्यात आले आहे. यात सोमपूर, जयपूर (मेढीपाडे), वाडीपिसोळ, व जायखेडा येथील व्यक्तींचा समावेश आहे. पॉझिटिव्हच्या संपर्कातील व्यक्तींनी स्वत:हून यंत्रणेशी संपर्कसाधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक